शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

काकांना पुतण्याची इतकी भीती कधीपासून वाटतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 05:31 IST

काका राज ठाकरे यांना पुतण्या आदित्यची इतकी भीती कधीपासून वाटू लागली, एखादा युवक राज्याच्या हितासाठी चांगले काम करतोय तर कौतुक करायचे सोडून राजकीय टीका कसली करताय

मुंबई : काका राज ठाकरे यांना पुतण्या आदित्यची इतकी भीती कधीपासून वाटू लागली, एखादा युवक राज्याच्या हितासाठी चांगले काम करतोय तर कौतुक करायचे सोडून राजकीय टीका कसली करताय, अशा शब्दात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. प्लॅस्टिकबंदीविरोधात मनसेने थेट मातोश्रीबाहेर बॅनरबाजी केल्यामुळे रामदास कदम यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली.मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रामदास कदम म्हणाले की, प्लॅस्टिकबंदीचा निर्णय गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये घेतला गेला होता. लोकांना वेळ मिळावा यासाठी सहा महिन्यांचा त्यांना अवधी दिला होता. शिवाय, उच्च न्यायालयानेही आणखी तीन महिने मुदत वाढवून दिली होती. या कालावधीत राज्यभर विविध माध्यमातून प्लॅस्टिकबंदीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. गावखेड्यातील बस स्टँडवरही सरकारने जाहिराती दिल्या. एखाद्या राजकीय नेत्याला, पक्षाला याची माहिती नसेल तर ते त्यांचे अपयश आहे, असेही कदम यांनी सांगितले.राज्यभरातून प्लॅस्टिकबंदीचे स्वागत होत आहे. राज्याच्या हितासाठी सर्वांनाच काही सवयी बदलाव्या लागतील. राज ठाकरे कधी बाजारात जात नाहीत त्यामुळे त्यांना यातले काही दिसत नाही. प्लॅस्टिकला पर्यायी वस्तूंचे १२० स्टॉल वरळीत लागले आहेत, अशा शब्दात रामदास कदम यांनी मनसे आणि राज यांचा समाचार घेतला.दंडाच्या रकमेबाबत बोलताना ्नरामदास कदम म्हणाले की, नाईलाजाने मोठ्या रकमेच्या दंडाची तरतूद करावी लागली. इतके दिवस बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापरासाठी केवळ २००-३०० इतका दंड होता. त्यामुळे कुणाला कायद्याचा धाकच नव्हता. बंदीची प्रभावी अंमलबजावणीच राज्यात झाली नाही. यावर अन्य राज्यांचा अभ्यास करूनच पाच हजार ते २५ हजार इतक्या दंडाची तरतूद करण्यात आल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.नॉन ओव्हन पिशव्यांवरही बंदीकापडी पिशवीच्या नावाखाली सध्या बाजारात नॉन ओव्हन पिशव्या आणल्या जात आहेत. या पिशव्यांवरही बंदी आहे. त्यामुळे कारखानदारांनी ताबडतोब त्यांचे उत्पादन थांबवावे. उद्यापासून अशा कारखानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.रोजगार बुडल्याचा आरोप चुकीचानऊ महिन्यांपासून प्लॅस्टिकबंदीचा विषय सुरू आहे. शिवाय, राज्यातील एकूण प्लॅस्टिकपैकी फक्त २० टक्के प्लॅस्टिकची महाराष्ट्रात निर्मिती होते. उर्वरित प्लॅस्टिक गुजरातमधून महाराष्ट्रात येते. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगार बुडाल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे कदम म्हणाले.