शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीत मोठी गुंतवणूक हवी

By admin | Updated: November 26, 2014 00:03 IST

मुख्यमंत्र्यांचे मत : यशवंत कृषी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

कऱ्हाड : ‘राज्यातील कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने असून वातावरणातील बदल हे सध्या सर्वांत मोठे आव्हान आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, अवर्षण आदी कारणांमुळे शेती धोक्यात आहे. नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे; पण तत्पूर्वी कृषी क्षेत्रासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. येथील बाजार समितीच्या वतीने आयोजित यशवंत कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, डॉ. अतुल भोसले, दाजी पवार, उपसभापती सुनील पाटील उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘शेतकऱ्यांना वातावरणाच्या बदलाविरोधात पुढे जावे लागेल. शाश्वत शेतीसाठी प्रयत्न करावे लागतील. राज्य शासनही त्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील ७० ते ८० टक्के शेती कोरडवाहू आहे. ती सिंचनाखाली आणण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज आहे.’ चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘यशवंतरावांनी पाणी योजना, नवीन पीकपद्धती व शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याच नावाने भरविण्यात आलेले हे प्रदर्शन शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यास सक्षम आहे.’ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘आधुनिक तंत्रज्ञान व चांगले बियाणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे, उत्पादित शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे हे सध्या शासनासमोरील आव्हान आहे. पंजाब, हरियाणापेक्षा महाराष्ट्राचे सिंचनक्षेत्र कमी आहे. त्यामुळे पाऊस कमी झाल्यास दुष्काळी परिस्थिती उद्भवते. शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित मदत जाहीर व्हावी. ’ आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. बाजार समितीचे प्रशासक संपतराव गुंजाळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)२ हजार ६५ ठिकाणी मंडलनिहाय हवामानयंत्र‘राज्यात मंडलनिहाय २ हजार ६५ ठिकाणी हवामानयंत्र बसविण्यात येणार आहेत. त्याद्वारे वातावरणातील बदलाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. वातावरणात होणारे बदल शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यास शेतीचे संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य आहे,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. प्रदर्शन उपयुक्त‘यशवंतरावांनी राजकारण, समाजकारण व प्रशासन कसं असावं, याचा वास्तुपाठ दिला. त्यांच्या पुण्यतिथीला बाजार समिती ११ वर्षांपासून हे प्रदर्शन भरवीत आहे. या प्रदर्शनामुळे शेतीमधील प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले. ‘केंद्राकडून लवकरच दुष्काळाची पाहणीराज्यातील अनेक गावे दुष्काळात होरपळत आहेत. ती दुष्काळी म्हणून जाहीर होण्यासाठी प्रथम पंचनामे करावे लागतात. त्यानंतर केंद्राची समिती पाहणी करून दुष्काळ जाहीर करते. मात्र, यावर्षी पंचनामे न करता समितीकडून पाहणी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केंद्र शासनाकडे केली होती. केंद्राने त्याला मान्यता दिली असून केंद्रीय कृषी मंत्रालयाची समिती गावांची पाहणी करणार आहे. लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.