शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतीत मोठी गुंतवणूक हवी

By admin | Updated: November 26, 2014 00:03 IST

मुख्यमंत्र्यांचे मत : यशवंत कृषी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

कऱ्हाड : ‘राज्यातील कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने असून वातावरणातील बदल हे सध्या सर्वांत मोठे आव्हान आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, अवर्षण आदी कारणांमुळे शेती धोक्यात आहे. नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे; पण तत्पूर्वी कृषी क्षेत्रासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. येथील बाजार समितीच्या वतीने आयोजित यशवंत कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, डॉ. अतुल भोसले, दाजी पवार, उपसभापती सुनील पाटील उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘शेतकऱ्यांना वातावरणाच्या बदलाविरोधात पुढे जावे लागेल. शाश्वत शेतीसाठी प्रयत्न करावे लागतील. राज्य शासनही त्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील ७० ते ८० टक्के शेती कोरडवाहू आहे. ती सिंचनाखाली आणण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज आहे.’ चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘यशवंतरावांनी पाणी योजना, नवीन पीकपद्धती व शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याच नावाने भरविण्यात आलेले हे प्रदर्शन शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यास सक्षम आहे.’ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘आधुनिक तंत्रज्ञान व चांगले बियाणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे, उत्पादित शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे हे सध्या शासनासमोरील आव्हान आहे. पंजाब, हरियाणापेक्षा महाराष्ट्राचे सिंचनक्षेत्र कमी आहे. त्यामुळे पाऊस कमी झाल्यास दुष्काळी परिस्थिती उद्भवते. शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित मदत जाहीर व्हावी. ’ आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. बाजार समितीचे प्रशासक संपतराव गुंजाळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)२ हजार ६५ ठिकाणी मंडलनिहाय हवामानयंत्र‘राज्यात मंडलनिहाय २ हजार ६५ ठिकाणी हवामानयंत्र बसविण्यात येणार आहेत. त्याद्वारे वातावरणातील बदलाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. वातावरणात होणारे बदल शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यास शेतीचे संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य आहे,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. प्रदर्शन उपयुक्त‘यशवंतरावांनी राजकारण, समाजकारण व प्रशासन कसं असावं, याचा वास्तुपाठ दिला. त्यांच्या पुण्यतिथीला बाजार समिती ११ वर्षांपासून हे प्रदर्शन भरवीत आहे. या प्रदर्शनामुळे शेतीमधील प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले. ‘केंद्राकडून लवकरच दुष्काळाची पाहणीराज्यातील अनेक गावे दुष्काळात होरपळत आहेत. ती दुष्काळी म्हणून जाहीर होण्यासाठी प्रथम पंचनामे करावे लागतात. त्यानंतर केंद्राची समिती पाहणी करून दुष्काळ जाहीर करते. मात्र, यावर्षी पंचनामे न करता समितीकडून पाहणी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केंद्र शासनाकडे केली होती. केंद्राने त्याला मान्यता दिली असून केंद्रीय कृषी मंत्रालयाची समिती गावांची पाहणी करणार आहे. लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.