शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

सिंचन खात्यातील गैरव्यवहार खणून काढा

By admin | Updated: December 20, 2014 02:42 IST

सिंचन खात्यात झालेला गैरव्यवहार खणून काढा, अशी मागणी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी शुक्रवारी विदर्भाच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत केली.

नागपूर : सिंचन खात्यात झालेला गैरव्यवहार खणून काढा, अशी मागणी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी शुक्रवारी विदर्भाच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत केली.विदर्भाच्या मागासलेपणासाठी या भागात सिंचनाची सोय नसणे हे प्रमुख कारण आहे़ याकडे लक्ष वेधताना ठाकरे म्हणाले की, सिंचन खात्यात कालवे दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. अरुणावती प्रकल्पाच्या कालव्यांमध्ये झाडे वाढली आहेत. या कामासाठी आलेला निधी गेला कुठे? या कामावर आतापर्यंत किती खर्च झाला, हे सरकारने जाहीर करावे तसेच सिंचन खात्यातील गैरव्यवहार खणून काढावा.सावकारांचे कर्ज माफ करण्याच्या घोषणेचा सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांनी केली. यापेक्षा शेतकऱ्यांना रोख मदत करावी, असे ते म्हणाले. विदर्भाच्या विकासासाठी सुप्रशासन व राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे मत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. विदर्भाचा अनुशेष दूर करताना विदर्भावर गत सरकारकडून अन्याय झाला, असे विदर्भाच्या प्रश्नावरील चर्चेला उत्तर देताना महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले. (प्रतिनिधी)