शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

हसनैनला व्यवसायात दगा?

By admin | Updated: March 1, 2016 03:29 IST

वडवली हत्याकांड प्रकरणातील हसनैन वरेकर याने व्यवसायात दग्याफटक्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईवडवली हत्याकांड प्रकरणातील हसनैन वरेकर याने व्यवसायात दग्याफटक्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर त्याचा बहिणी व भाच्यांवर खूप जीव असल्याने आपल्या पश्चात त्यांच्यावर वाईट दिवस येऊ नयेत, यासाठी त्यांनाही जीवे मारल्याची शक्यता व्यक्त होत आहे.काही वर्षांपूर्वी हसनैनने नोकरीसाठी विदेशात जायची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली होती. परंतु चार मुली व तो एकुलता मुलगा असल्याने वडिलांनी त्याला इथेच नोकरी करून कुटुंबासोबत राहण्याचे सुचवले होते. त्यानुसार काही वर्षे ठाणे येथे काम केल्यानंतर तो तुर्भेतील एका कंपनीत सुमारे ३५ ते ४० हजार पगाराची नोकरी करीत होता. दरम्यान, काही महिन्यांपासून त्याची सुपारीचा एक्सपोर्ट- इनपोर्ट व्यवसाय करण्याची इच्छा होती, असे घटनेत मृत पावलेल्या शबिना यांचे पती शौकत खान यांनी सांगितले.हसनैनने कुटुंबातल्या मोजक्याच सदस्यांना याबाबत सांगितले होते. या व्यवसायासाठी त्याने ओळखीच्या व्यक्तींकडून २० ते ३० लाख रुपये घेतले होते. परंतु काही कारणाने हसनैनच्या नावावर तो व्यवसाय सुरू होणार नसल्याने त्याच्याच ओळखीच्या ज्या व्यक्तीच्या नावे हा व्यवसाय होणार होता, त्याच्याकडे हसनैनने लाखो रुपये दिले होते, असेही समजते. त्यांच्यातील याच व्यवहारातून हसनैनला २० ते २५ लाख रुपये मिळणार होते. कदाचित हीच रक्कम मिळाली नसावी, याच्या तणावामुळे आत्महत्या केल्याची शक्यताही शौकत यांनी व्यक्त केली आहे. परंतु चारही बहिणी व भाच्यांवर त्याचे खूप प्रेम होते. विवाहित बहिणींच्या भेटीला तो कधीच रिकाम्या हाताने जात नव्हता. यामुळेच खैरणेत या भाऊ-बहिणींच्या प्रेमाची चर्चा होती. परंतु आपल्या पश्चात बहिणी व भाच्यांचे काय होईल, या चिंतेनेही त्याने स्वतच्या कुटुंबासोबत बहिणी व भाच्यांची हत्या केली असावी, अशीही शक्यता शौकत खान यांनी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून हसनैन हा त्याच्या नातेवाइकांना दावतसाठी घरी बोलवायचा. घटनेच्या दोन दिवस अगोदर मात्र त्याने केवळ बहिणींना बोलावले होते. त्यामुळे हसनैनची बँक खाती, घटनेपूर्वीचे फोन संभाषण यांची तपासणी करण्याची मागणी मयत मारिया यांचे दीर अश्फाक फक्की यांनी केली आहे.