शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कर्मचाऱ्यांना सुगीचे दिन

By admin | Updated: August 8, 2014 01:06 IST

निवडणुकीच्या तोंडावर सरकारची कोंडी करून कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्या पदरी पाडून घेतल्याने सध्या तरी त्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वेतन

मागण्या मान्य : १२ पासून भूमी अभिलेखचा संपनागपूर : निवडणुकीच्या तोंडावर सरकारची कोंडी करून कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्या पदरी पाडून घेतल्याने सध्या तरी त्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात आली तर सहा दिवस संप करून महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सहा मागण्या मान्य करून घेतल्या. आता १२ तारखेपासून भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप आहे. त्यांनाही शासन निराश करणार नाही, अशी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे.निवडणुका जवळ आल्यावर सत्तेत असलेल्या पक्षाचे सरकार लोकप्रिय घोषणा करून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही उदार धोरण ठेवण्यात येते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी केंद्र आणि राज्य सरकारने अशाच प्रकारच्या घोषणा केल्या होत्या. मात्र निवडणुकीत त्यांच्या पदरी निराशा आली. किमान विधानसभेच्या निवडणुकीत तरी जनता आणि कर्मचाऱ्यांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून सरकारकडून पावले उचलली जात आहे. १६ टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाला खूश करण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी संपाचे इशारे दिले. काहीनी आंदोलने केली आणि त्यांना आश्वासने मिळाली. त्याची पूर्तता करणे सध्या सुरू आहे. ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या वेतनश्रेणीत बुधवारी सरकारने सुधारणा केली. सरपंचाच्या मानधनात आणि ग्राम पंचायत सदस्यांच्या बैठक भत्त्यात वाढ करण्यात आली. महसूल कर्मचाऱ्यांना गतवर्षी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली. त्यांना त्यासाठी सहा दिवसांचा संप करावा लागला. शिपायांना आता सायकलऐवजी मोटरसायकलसाठी अग्रिम दिला जाणार आहे. नायब तहसीलदारांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात आली आहे. संप केल्याने मागण्या मान्य होतात हा संदेश महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून गेल्याने पुढच्या काळात आणखी काही संघटना अशाच प्रकारचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. १२ आॅगस्टपासून भूमी अभिलेख कर्मचारी संपावर जात आहेत. तांत्रिक वेतन श्रेणीसाठी त्यांचे आंदोलन आहे.दरम्यान महसूल कर्मचाऱ्यांच्या संप काळात ९० टक्के कर्मचाऱ्यांचा सहभाग असला तरी मोजकेच कर्मचारी आंदोलनात सहभागी होते. इतरांनी सुटीचा आनंद घेतला. शनिवार, रविवार पुन्हा सुटी आहेच. एकूणच निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. (प्रतिनिधी)