शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

हरलो तर राजकारण सोडेन : आर.आर.

By admin | Updated: August 11, 2014 22:41 IST

निर्धार मेळावा : नाही तर संजय पाटलांनी खासदारकी सोडावी

सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात कोणाला उभे करायचे असेल त्याला करा. विक्रमी मताधिक्याने माझा विजय झाला नाही, तर मी कायमचे राजकारण सोडून देईन आणि जर विजयी झालो, तर संजय पाटलांनी अपघाताने व लाटेवर मिळालेली खासदारकी सोडावी, असे आव्हान आज (सोमवारी) गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात दिले. सांगलीच्या पोलीस मुख्यालय परिसरातील सभागृहात राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा झाला. यावेळी आर. आर. पाटील यांनी खासदार संजय पाटील यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या व वाटेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे काही नेते वाऱ्याबरोबर पाठ फिरवत आहेत. काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, काहीजण गेल्यात जमा आहेत, तर काहींनी नुसत्याच गाठीभेटी केल्या आहेत. या सर्वांना माझा सल्ला आहे की, त्यांनी लवकरात लवकर निघून जावे. अशा कोणत्याही नेत्याबरोबर चर्चा करण्याची आमची तयारी नाही. ज्यांचा निष्ठेशी, विचारांशी संबंध नाही, असे लोक पक्षातून गेल्याने काहीच फरक पडणार नाही. तालुकास्तरावर काम करणाऱ्या अनेक नेत्यांना दिवसा आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. अशा नेत्यांच्या पक्षप्रवेशाला आणि त्यांना समावून घेणाऱ्या महायुतीला आमच्या शुभेच्छा आहेत. इतके दिवस आम्ही त्यांना सहन केले, आता महायुतीने त्यांचा अनुभव घेऊन पहावा. आम्ही जे सोसले आहे, ते त्यांना कितपत सोसणार, हासुद्धा प्रश्न आहे. त्या-त्या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हीच संधी मानली पाहिजे. आम्ही नेत्यांच्या जागी उसना उमेदवार आणण्याऐवजी कार्यकर्त्यांनाच नेते बनवू. त्यामुळे अशा नेत्यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीला काहीही फरक पडणार नाही. धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी जतमधील प्रकाश शेंडगेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना आमदारकी मिळाली, पण धनगर समाजाला काय मिळाले, याचा विचार समाजाने करावा. (प्रतिनिधी)देवेंद्र फडणवीसांचे दिवास्वप्नकेंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर आता राज्यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचे दिवास्वप्न पडत आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांची परंपरा आणि पुण्याई अजून संपलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र दिन साजरा न करणाऱ्या पक्षाची व कोत्या मनोवृत्तीच्या लोकांची सत्ता येथे येऊ शकत नाही, अशी टीका गृहमंत्री पाटील यांनी केली. ...तर राष्ट्रवादीचे शेट्टींच्या घरावर मोर्चेकेंद्रात आघाडी सरकार असताना शेतीमालाच्या आधारभूत किमतीत वाढ झाली नाही, म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलने केली. आता महायुतीच्या शासनाने शेतीमालाच्या आधारभूत किमतीबाबत आघाडीपेक्षाही वाईट भूमिका घेतली आहे, तरी शेट्टी गप्प आहेत. त्यांची बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे की महायुतीशी?, असा सवाल गृहमंत्री पाटील यांनी उपस्थित केला. शेतीमालाविषयी आता केंद्र शासनाची अशीच नियत राहिली, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेट्टी व स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांच्या घरावर मोर्चे काढतील, असा इशाराही त्यांनी दिला.