शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
4
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
5
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
6
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
7
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
8
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
9
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
10
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
11
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
12
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
13
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
14
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
15
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
16
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
17
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
18
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
19
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
20
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण

हरितऊर्जाच साकारेल ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न

By admin | Updated: May 31, 2017 04:49 IST

मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करायचे असेल तर वीज आणि वाहतुकीवरील खर्चात कपात करण्याची आवश्यकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करायचे असेल तर वीज आणि वाहतुकीवरील खर्चात कपात करण्याची आवश्यकता आहे. हरितऊर्जेला प्राधान्य दिल्यास एकाचवेळी पर्यावरण संवर्धन आणि अर्थव्यवस्थेला गती देणे शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले. पर्यावरणपूरक बंदरांची निर्मिती आणि समुद्रातील तेलगळतीसंदर्भात नरिमन पॉइंट येथील शिपिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या सभागृहात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘ग्रीन पोर्ट्स अ‍ॅण्ड आॅइल स्पिल मॅनेजमेंट २०१७’ या नावाने आयोजित या चर्चासत्राचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गडकरी म्हणाले की, कांडला बंदरात सौर आणि पवनऊर्जेच्या माध्यमातून २०० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाची चाचपणी चालू आहे. दीड लाख एकर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याच पद्धतीने देशभरातील बंदरे, गोदामे आणि मोठ्या सरकारी आस्थापनांवर सौरपॅनलच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा मानस असून, त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले. या चर्चासत्राच्या माध्यमातून बंदरासाठी हरितऊर्जा निर्मितीचे नवनवे मार्ग समोर येतील; तसेच समुद्रातील तेलगळतीसारख्या दुर्घटनांना सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिक पद्धती विकसित करण्यास मदत होईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे संजय भाटिया यांनी प्रास्ताविकात सांगितले. तर, पेट्रोलियम पदार्थांच्या या आयातीमुळे देशाच्या व्यापारात मोठी तूट निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी हरितऊर्जा निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचे इंडियन फेडरेशन आॅफ ग्रीन एनर्जीचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले. देशातील महत्त्वाच्या बंदरांत सध्या १६ मेगावॅटची सौर तर सहा मेगावॅट पवनऊर्जा निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. २०२२पर्यंत या माध्यमातून १७५ मेगावॅट वीजनिर्मितीचे सरकारचे उद्दिष्ट आहे. जेएनपीटी बंदराची क्षमता वाढवणारउरण : जेएनपीटी बंदरातील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात गुजरातकडे सरकू लागला आहे, या आरोपामध्ये काही तथ्य नसून जेएनपीटी बंदरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या विविध विकासकामांमुळे बंदराची क्षमता वाढणार असल्याचे केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उरण येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या चौथ्या बंदराला रेल्वेशी जोडणाऱ्या जासई जेएनपीटी मार्गावरील १५ किमी अंतराच्या तिसऱ्या रेल्वेमार्गाचा शिलान्यास कार्यक्रमप्रसंगी जेएनपीटीचे चेअरमन अनिल डिग्गीकर, माजी खा. रामशेठ ठाकूर, भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, ट्रस्टी महेश बालदी, उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते