शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

हरितऊर्जाच साकारेल ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न

By admin | Updated: May 31, 2017 04:49 IST

मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करायचे असेल तर वीज आणि वाहतुकीवरील खर्चात कपात करण्याची आवश्यकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करायचे असेल तर वीज आणि वाहतुकीवरील खर्चात कपात करण्याची आवश्यकता आहे. हरितऊर्जेला प्राधान्य दिल्यास एकाचवेळी पर्यावरण संवर्धन आणि अर्थव्यवस्थेला गती देणे शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले. पर्यावरणपूरक बंदरांची निर्मिती आणि समुद्रातील तेलगळतीसंदर्भात नरिमन पॉइंट येथील शिपिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या सभागृहात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘ग्रीन पोर्ट्स अ‍ॅण्ड आॅइल स्पिल मॅनेजमेंट २०१७’ या नावाने आयोजित या चर्चासत्राचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गडकरी म्हणाले की, कांडला बंदरात सौर आणि पवनऊर्जेच्या माध्यमातून २०० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाची चाचपणी चालू आहे. दीड लाख एकर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याच पद्धतीने देशभरातील बंदरे, गोदामे आणि मोठ्या सरकारी आस्थापनांवर सौरपॅनलच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा मानस असून, त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले. या चर्चासत्राच्या माध्यमातून बंदरासाठी हरितऊर्जा निर्मितीचे नवनवे मार्ग समोर येतील; तसेच समुद्रातील तेलगळतीसारख्या दुर्घटनांना सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिक पद्धती विकसित करण्यास मदत होईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे संजय भाटिया यांनी प्रास्ताविकात सांगितले. तर, पेट्रोलियम पदार्थांच्या या आयातीमुळे देशाच्या व्यापारात मोठी तूट निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी हरितऊर्जा निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचे इंडियन फेडरेशन आॅफ ग्रीन एनर्जीचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले. देशातील महत्त्वाच्या बंदरांत सध्या १६ मेगावॅटची सौर तर सहा मेगावॅट पवनऊर्जा निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. २०२२पर्यंत या माध्यमातून १७५ मेगावॅट वीजनिर्मितीचे सरकारचे उद्दिष्ट आहे. जेएनपीटी बंदराची क्षमता वाढवणारउरण : जेएनपीटी बंदरातील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात गुजरातकडे सरकू लागला आहे, या आरोपामध्ये काही तथ्य नसून जेएनपीटी बंदरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या विविध विकासकामांमुळे बंदराची क्षमता वाढणार असल्याचे केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उरण येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या चौथ्या बंदराला रेल्वेशी जोडणाऱ्या जासई जेएनपीटी मार्गावरील १५ किमी अंतराच्या तिसऱ्या रेल्वेमार्गाचा शिलान्यास कार्यक्रमप्रसंगी जेएनपीटीचे चेअरमन अनिल डिग्गीकर, माजी खा. रामशेठ ठाकूर, भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, ट्रस्टी महेश बालदी, उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते