शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

हरितऊर्जाच साकारेल ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न

By admin | Updated: May 31, 2017 04:49 IST

मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करायचे असेल तर वीज आणि वाहतुकीवरील खर्चात कपात करण्याची आवश्यकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करायचे असेल तर वीज आणि वाहतुकीवरील खर्चात कपात करण्याची आवश्यकता आहे. हरितऊर्जेला प्राधान्य दिल्यास एकाचवेळी पर्यावरण संवर्धन आणि अर्थव्यवस्थेला गती देणे शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले. पर्यावरणपूरक बंदरांची निर्मिती आणि समुद्रातील तेलगळतीसंदर्भात नरिमन पॉइंट येथील शिपिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या सभागृहात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘ग्रीन पोर्ट्स अ‍ॅण्ड आॅइल स्पिल मॅनेजमेंट २०१७’ या नावाने आयोजित या चर्चासत्राचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गडकरी म्हणाले की, कांडला बंदरात सौर आणि पवनऊर्जेच्या माध्यमातून २०० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाची चाचपणी चालू आहे. दीड लाख एकर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याच पद्धतीने देशभरातील बंदरे, गोदामे आणि मोठ्या सरकारी आस्थापनांवर सौरपॅनलच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा मानस असून, त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले. या चर्चासत्राच्या माध्यमातून बंदरासाठी हरितऊर्जा निर्मितीचे नवनवे मार्ग समोर येतील; तसेच समुद्रातील तेलगळतीसारख्या दुर्घटनांना सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिक पद्धती विकसित करण्यास मदत होईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे संजय भाटिया यांनी प्रास्ताविकात सांगितले. तर, पेट्रोलियम पदार्थांच्या या आयातीमुळे देशाच्या व्यापारात मोठी तूट निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी हरितऊर्जा निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचे इंडियन फेडरेशन आॅफ ग्रीन एनर्जीचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले. देशातील महत्त्वाच्या बंदरांत सध्या १६ मेगावॅटची सौर तर सहा मेगावॅट पवनऊर्जा निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. २०२२पर्यंत या माध्यमातून १७५ मेगावॅट वीजनिर्मितीचे सरकारचे उद्दिष्ट आहे. जेएनपीटी बंदराची क्षमता वाढवणारउरण : जेएनपीटी बंदरातील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात गुजरातकडे सरकू लागला आहे, या आरोपामध्ये काही तथ्य नसून जेएनपीटी बंदरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या विविध विकासकामांमुळे बंदराची क्षमता वाढणार असल्याचे केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उरण येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या चौथ्या बंदराला रेल्वेशी जोडणाऱ्या जासई जेएनपीटी मार्गावरील १५ किमी अंतराच्या तिसऱ्या रेल्वेमार्गाचा शिलान्यास कार्यक्रमप्रसंगी जेएनपीटीचे चेअरमन अनिल डिग्गीकर, माजी खा. रामशेठ ठाकूर, भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, ट्रस्टी महेश बालदी, उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते