शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

‘हरिजनवाडा’चे होणार विद्यामंदिर क्रांतिनगर

By admin | Updated: March 12, 2015 00:37 IST

‘लोकमत’चा पाठपुरावा : शिक्षण समितीत मंजुरी; नामांतराचा प्रस्ताव

कोल्हापूर : जिल्ह्णातील शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथे असलेल्या शाळेचे ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ असे नाव असल्याचे ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणल्यानंतर शिक्षण प्रशासन ‘जागे’ होऊन नामांतरासाठी धावपळ करीत आहे. स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने ‘विद्यामंदिर क्रांतिनगर’ असे नामकरण करण्याचा दिलेला प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर झाला आहे. २४ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे. स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विद्यामंदिराला ‘हरिजनवाडा’ असे नाव राजर्षी शाहू महाराजांच्या विचार, वारसा, इतिहास असलेल्या जिल्ह्यात असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणले. त्यानंतर विविध दलित संघटनांनी नामांतराची मागणी लावून धरली आहे. अजूनपर्यंत नामांतर न केल्याबद्दल शिक्षण प्रशासनावर जोरदार टीका झाली.त्या शाळेला ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिर’ असे नाव द्यावे, अशी मागणी ‘भारिप बहुजन महासंघा’ने केली. याउलट युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशनने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर’ असे नामकरण करावे, अशी मागणी केली. त्यामुळे शाळेला कोणते नाव दिले जाते, याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.‘लोकमत’चा पाठपुरावा आणि संघटनांचा दबाव यामुळे शिक्षण प्रशासनालाही नाव बदलण्याची बुद्धी सुचली आहे. शिक्षण प्रशासनाने नियमानुसार नामांतराचा प्रस्ताव मागून घेऊन शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला. बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर आज, गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. ‘स्थायी’मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरी मिळाल्यास नामांतरावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, गेल्या सर्वसाधारण सभेत शाळेचे नामांतर करण्याचा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर सर्व सदस्यांनी नामांतरास मंजुरी दिली. असे असताना पुन्हा सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित होत आहे. अशा प्रकारे केवळ कागदी घोडे नाचवीत नामांतरास विलंब होत असल्याचा आरोप काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)विविध संघटनांनी वेगवेगळी नावे देण्याची मागणी केली तरी स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीकडून ‘विद्यामंदिर क्रांतिनगर’ असे नामकरण करावे, असा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला आज, गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर तो सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर नामांतराचा आदेश दिला जाईल.- स्मिता गौड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)