शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

हार्बरवासीयांचे तब्बल १६ तास हाल

By admin | Updated: February 28, 2017 05:19 IST

मध्य रेल्वेवरील मेन लाइन आणि हार्बर प्रवाशांचे हाल काही संपता संपत नसल्याचे सोमवारी दिसून आले.

मुंबई : मध्य रेल्वेवरील मेन लाइन आणि हार्बर प्रवाशांचे हाल काही संपता संपत नसल्याचे सोमवारी दिसून आले. मालवाहतुकीचे तीन डबे आणि त्याला जोडलेली एक ब्रॅक व्हॅन घसरल्याची घटना पहाटे ४.0९ च्या सुमारास वडाळ््याजवळील रावळी जंक्शन येथे घडली. या घटनेत हार्बर मार्ग पूर्ववत होण्यास तब्बल १६ तासांहून अधिक वेळ लागला. त्यामुळे कामाच्या पहिल्याच दिवशी हार्बरवासीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेमुळे १८८ हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जागेवरून मुख्य मार्गावर येणाऱ्या मालगाड्या वडाळा येथील रावळी जंक्शन येथून हार्बर मार्गात प्रवेश करतात. सोमवारी पहाटे ४.0९ च्या सुमारास मसुराची डाळ भरलेली ४३ डब्यांची असलेली मालवाहतूक गाडी येथून जात होती. ही गाडी जात असतानाच त्याचे तीन डबे आणि एक बॅ्रक व्हॅन घसरली. मात्र, ही घटना एवढी मोठी होती की, रूळही उखडले, तर ओव्हरहेड वायरही तुटल्या. त्यामुळे हार्बवरील अप आणि डाउन या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. त्याचा पहिला मोठा परिणाम सीएसटी ते कुर्ला या वाहतुकीवर झाला. घटनेची माहिती मिळताच तत्काळ रेल्वेच्या परिचालन व अभियंता विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, रुळांची आणि ओव्हरहेड वायरची असलेली अवस्था, तसेच डबे मसुराच्या डाळीने भरलेले असल्याने, काम पूर्ण होण्यास बराच अवधी लागणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे आधी डबे रिकामी करण्याचे काम हाती घेण्यात आले आणि त्यानंतर, अन्य कामांना सुरुवात करण्यात आली. हे काम होण्यास बराच वेळ लागत असल्याने हार्बरचा बोऱ्या वाजला. सीएसटी ते कुर्ला दरम्यान वाहतूक ठप्प झाल्याने, रेल्वेने कुर्ला ते वाशी, बेलापूर, पनवेल व सीएसटी ते वांद्रे, अंधेरीपर्यंत फेऱ्या सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. यात काही विशेष फेऱ्याही चालवण्यात आल्या, परंतु त्याचा फारसा परिणाम काही झाला नाही. अर्धा ते एक तास लोकल उशिराने धावत असल्याने, प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागला. उशिराने धावत असलेल्या लोकल यामुळे स्थानकांवर एकच गर्दी उसळली. काही स्थानकांवर तर उद्घोषणाही होत नसल्याने, प्रवाशांना नेमके काय झाले याची माहितीही मिळत नव्हती. त्यामुळे स्टेशन मास्तर आणि रेल्वे पोलिसांकडे प्रवासी विचारणा करत होते. सकाळी ४.0९ च्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर डाउन हार्बर पूर्ववत होण्यास तब्बल १६ तासांहून अधिक वेळ लागला. त्यामुळे संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्यांनाही चांगलीच कसरत करावी लागली. रात्री उशिरापर्यंत हार्बरवासीयांचे हाल सुरूच होते. या घटनेमुळे जवळपास १८८ हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. घटनास्थळामधून सीएसटीला जाणारी (अप)पहिली लोकल ही रात्री ८.0७ च्या सुमारास धावली. त्यानंतर, रात्री पावणे नऊच्या सुमारास डाउन मार्गावरून पहिली लोकल धावली. >रुळाला तडा गेल्याने घटना?रेल्वे रुळाला तडा गेल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिकदृष्ट्या सांगितले जाते. मात्र, या घटनेची सखोल चौकशी केली जाणार असून, त्यासाठी समितीही नेमण्यात आली आहे. चौकशीनंतरच घटनेचे नेमके कारण समोर येईल, तसेच रेल्वे पोलिसांकडून यात अन्य काही कारण तर नाही ना, याचा शोध घेतला जात आहे.सीएसटी-अंधेरी आणि कुर्ला, पनवेल-वाशी ते ठाणे आणि कुर्ला-पनवेल या दरम्यान सहा अतिरिक्त लोकल चालवण्यात आल्या. संपूर्ण दिवसभरात १४२ विशेष फेऱ्या रेल्वेने चालवल्या.रेल्वेकडून बेस्ट प्रशासनालाही जादा बसेस चालवण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार, चार जादा बसेस कुर्ला ते वडाळा आणि दोन बसेस ट्रॉम्बेसाठी चालवण्यात आल्या. दुपारी दोन वाजेपर्यंत ६४ विशेष सेवा बेस्टने चालवल्या.