शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

हापूस आवाक्याबाहेरच

By admin | Updated: April 21, 2015 01:33 IST

अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप बाजारभाव कमी झालेले नाहीत.

नवी मुंबई : अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप बाजारभाव कमी झालेले नाहीत. एपीएमसीमध्ये १५० ते ७०० रुपये डझन दराने हापूस विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये ग्राहकांना यासाठी ३०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत. मुंबई कृृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी आंबा हंगामाची सुरवात निराशाजनक झाली आहे. एप्रिल अखेरीस गतवर्षी ९० हजार ते १ लाख पेट्यांची आवक होत होती. यावर्षी ५० ते ६० हजार पेट्यांचीच आवक होत आहे. सोमवारी ६७ हजार पेट्यांची आवक झाली आहे. यामध्ये २६० टन आंबा दक्षिणेकडील राज्यातून आला असून उर्वरित सर्व कोकणातून आला आहे. आंब्यावर काळे डाग असल्याने तो लवकर खराब होत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये हलक्या दर्जाचा हापूस १५० ते ३५० रुपये दराने तर चांगल्या दर्जाचा माल ७०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. देवगड हापूसला मोठी मागणी असते. परंतु यावर्षी तेथेही समाधानकारक उत्पादन झालेले नाही. तेथील हंगाम या महिन्याअखेर संपणार आहे. हापूसव्यतिरिक्त बदामी, लालबाग, गोळा, तोतापुरी, नीलम, पिवू या आंब्यांचीही आवक होवू लागली आहे. यावर्षी चांगल्या मालाचे प्रमाण कमी आहे. माल लवकर खराब होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून बाजारभाव जास्त असल्यामुळे आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)