शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाचे गुणोत्तर...

By admin | Updated: January 4, 2015 01:58 IST

मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक गोल सेट केला आणि त्याप्रमाणे तो साध्य केला. मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, त्यानंतर अभिनय क्षेत्रात आलो;

मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक गोल सेट केला आणि त्याप्रमाणे तो साध्य केला. मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, त्यानंतर अभिनय क्षेत्रात आलो; आणि राजकारणात प्रवेश केला. ही तीनही क्षेत्रे आनंदाचे गुणोत्तर करणारी आहेत. मी डॉक्टर राहिलो असतो तर शेकडो लोकांना आनंद दिला असता. अभिनय क्षेत्रात लाखोंना आनंद देईन; मात्र राजकारणात राहून मी कोट्यवधी लोकांचे जीवन सुखी करू शकेन. माझा जन्म पुणे येथील नारायणगावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच मी अभ्यासात हुशार होतो. अगदी शाळेतही पहिला क्रमांकच असायचा. दहावी आणि बारावीलाही मेरिटमध्ये होतो. शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. आमच्या नारायणगावच्या सबनीस विद्यामंदिर शाळेचे स्नेहसंमेलनही मोठ्या थाटात व्हायचे. त्यात मी अनेक नाटकांत भाग घेत असे. तेव्हापासूनच ठरवले होते मोठे होऊन अभिनेता व्हायचे, मात्र सामान्य कुटुंबाच्या विचारप्रणालीप्रमाणे मलाही आई-बाबांकडून सांगण्यात आले, ‘तुला तुझ्या उदरनिर्वाहासाठी पदवी शिक्षण घ्यावेच लागेच. शिक्षण नसेल तर कोणीच तुला विचारणार नाही.’ त्यामुळे पदवी शिक्षण पूर्ण करणे आवश्यकच झाले.माझ्या आयुष्याला यूटर्न मिळाला तो एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असताना. मला सूत्रसंचालन करायला मिळाले. केईएम मेडिकल कॉलेजमध्ये असताना आम्ही ‘अपूर्वाई’ नावाचा डान्स ड्रामा केला. त्या वेळेस मिळणारा आनंद मला सांगून गेला की ‘बॉस, दिस इज द टाइम. तुला आता यात वळायलाच पाहिजे.’ माझ्या आयुष्यात या वेळी अशी दोन माणसे आली ज्यांनी आयुष्याची दिशाच बदलली. त्या दोन व्यक्ती म्हणजे डॉ. रवी बापट आणि सुबल सरकार. बापट सरांनी मला आयुष्य किती अफाट असू शकते ते दाखवले. कारण आपण एका चाकोरीपद्धतीच्या आयुष्यात जगत असतो, हे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे पाहून असे वाटायचे एकच माणून विविध क्षेत्रांत किती सहजतेने संचार करू शकतो. तर सुबलदांनी आभाळाला हात टेकले तरी पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे शिकवले.मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक गोल सेट केला आणि त्याप्रमाणे तो साध्य केला. मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, त्यानंतर अभिनय क्षेत्रात आलो आणि राजकारणात प्रवेश केला. ही तीनही क्षेत्रे आनंदाचे गुणोत्तर करणारी आहेत. मी डॉक्टर राहिलो असतो तर शेकडो लोकांना आनंद दिला असता. अभिनय क्षेत्रात लाखोंना आनंद देईन; मात्र राजकारणात राहून मी कोट्यवधी लोकांचे जीवन सुखी करू शकेन. शिवाय मी जो पक्ष स्वीकारला आहे त्याचे मराठी लोकांसाठी आणि समाजाचे भले करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्याचा मीही सभासद झाल्याचा मला आनंद आहे. (शब्दांकन : सायली कडू)मी बारावीला मेरिटमध्ये आलो. त्या वेळी डॉ. श्रीराम लागू, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. गिरिश ओक, डॉ. शरद दुतवडे, डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे अशा नामवंत कलाकारांचा माझ्यावर प्रभाव होता. त्यामुळे त्या वयात मला असे वाटायचे की डॉक्टर झाल्यावर आपल्याला अभिनय क्षेत्रातही येता येते. हा गमतीचा भाग सोडला तर एक स्थैर्य देणारा व्यवसाय तसेच समाजाप्रती आपली असलेली जबाबदारी पार पाडण्याची संधी मला वैद्यकीय क्षेत्रातच मिळणार होती. म्हणून मी डॉक्टर व्हायचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील प्रथिष्ठित ‘जी. एस. मेडिकल कॉलेज’मधून २००४ साली मी पदवीधर होऊन बाहेर पडलो.पहिले दोन अंकी नाटक केईएममध्ये असताना ‘शांतीचं कार्ट चालू’ हे केले. त्यानंतर ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ आणि ‘अपूर्वाई’ केले. इथून सुरुवात झाली आणि सूत्रसंचालन केले. त्यानंतर पहिली मालिका ‘चार दिवस सासूचे’ केली. त्या वेळी मला पहिले व्यावसायिक नाटक ‘शंभूराजे’ करण्याची संधी मिळाली आणि एकावेळी पाच मालिका सोडून नाटकात रमलो. असा अभिनयातील करियरग्राफ हळूहळू उंचावतच गेला. माझा करियर ग्राफ थोडा वेगळ्या पद्धतीने झाला. आधी नाटक, मग मालिका नंतर चित्रपट. ‘शंभूराजे’नंतर ‘राजा शिवछत्रपती’ केले.