शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाचे गुणोत्तर...

By admin | Updated: January 4, 2015 01:58 IST

मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक गोल सेट केला आणि त्याप्रमाणे तो साध्य केला. मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, त्यानंतर अभिनय क्षेत्रात आलो;

मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक गोल सेट केला आणि त्याप्रमाणे तो साध्य केला. मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, त्यानंतर अभिनय क्षेत्रात आलो; आणि राजकारणात प्रवेश केला. ही तीनही क्षेत्रे आनंदाचे गुणोत्तर करणारी आहेत. मी डॉक्टर राहिलो असतो तर शेकडो लोकांना आनंद दिला असता. अभिनय क्षेत्रात लाखोंना आनंद देईन; मात्र राजकारणात राहून मी कोट्यवधी लोकांचे जीवन सुखी करू शकेन. माझा जन्म पुणे येथील नारायणगावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच मी अभ्यासात हुशार होतो. अगदी शाळेतही पहिला क्रमांकच असायचा. दहावी आणि बारावीलाही मेरिटमध्ये होतो. शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. आमच्या नारायणगावच्या सबनीस विद्यामंदिर शाळेचे स्नेहसंमेलनही मोठ्या थाटात व्हायचे. त्यात मी अनेक नाटकांत भाग घेत असे. तेव्हापासूनच ठरवले होते मोठे होऊन अभिनेता व्हायचे, मात्र सामान्य कुटुंबाच्या विचारप्रणालीप्रमाणे मलाही आई-बाबांकडून सांगण्यात आले, ‘तुला तुझ्या उदरनिर्वाहासाठी पदवी शिक्षण घ्यावेच लागेच. शिक्षण नसेल तर कोणीच तुला विचारणार नाही.’ त्यामुळे पदवी शिक्षण पूर्ण करणे आवश्यकच झाले.माझ्या आयुष्याला यूटर्न मिळाला तो एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असताना. मला सूत्रसंचालन करायला मिळाले. केईएम मेडिकल कॉलेजमध्ये असताना आम्ही ‘अपूर्वाई’ नावाचा डान्स ड्रामा केला. त्या वेळेस मिळणारा आनंद मला सांगून गेला की ‘बॉस, दिस इज द टाइम. तुला आता यात वळायलाच पाहिजे.’ माझ्या आयुष्यात या वेळी अशी दोन माणसे आली ज्यांनी आयुष्याची दिशाच बदलली. त्या दोन व्यक्ती म्हणजे डॉ. रवी बापट आणि सुबल सरकार. बापट सरांनी मला आयुष्य किती अफाट असू शकते ते दाखवले. कारण आपण एका चाकोरीपद्धतीच्या आयुष्यात जगत असतो, हे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे पाहून असे वाटायचे एकच माणून विविध क्षेत्रांत किती सहजतेने संचार करू शकतो. तर सुबलदांनी आभाळाला हात टेकले तरी पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे शिकवले.मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक गोल सेट केला आणि त्याप्रमाणे तो साध्य केला. मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, त्यानंतर अभिनय क्षेत्रात आलो आणि राजकारणात प्रवेश केला. ही तीनही क्षेत्रे आनंदाचे गुणोत्तर करणारी आहेत. मी डॉक्टर राहिलो असतो तर शेकडो लोकांना आनंद दिला असता. अभिनय क्षेत्रात लाखोंना आनंद देईन; मात्र राजकारणात राहून मी कोट्यवधी लोकांचे जीवन सुखी करू शकेन. शिवाय मी जो पक्ष स्वीकारला आहे त्याचे मराठी लोकांसाठी आणि समाजाचे भले करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्याचा मीही सभासद झाल्याचा मला आनंद आहे. (शब्दांकन : सायली कडू)मी बारावीला मेरिटमध्ये आलो. त्या वेळी डॉ. श्रीराम लागू, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. गिरिश ओक, डॉ. शरद दुतवडे, डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे अशा नामवंत कलाकारांचा माझ्यावर प्रभाव होता. त्यामुळे त्या वयात मला असे वाटायचे की डॉक्टर झाल्यावर आपल्याला अभिनय क्षेत्रातही येता येते. हा गमतीचा भाग सोडला तर एक स्थैर्य देणारा व्यवसाय तसेच समाजाप्रती आपली असलेली जबाबदारी पार पाडण्याची संधी मला वैद्यकीय क्षेत्रातच मिळणार होती. म्हणून मी डॉक्टर व्हायचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील प्रथिष्ठित ‘जी. एस. मेडिकल कॉलेज’मधून २००४ साली मी पदवीधर होऊन बाहेर पडलो.पहिले दोन अंकी नाटक केईएममध्ये असताना ‘शांतीचं कार्ट चालू’ हे केले. त्यानंतर ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ आणि ‘अपूर्वाई’ केले. इथून सुरुवात झाली आणि सूत्रसंचालन केले. त्यानंतर पहिली मालिका ‘चार दिवस सासूचे’ केली. त्या वेळी मला पहिले व्यावसायिक नाटक ‘शंभूराजे’ करण्याची संधी मिळाली आणि एकावेळी पाच मालिका सोडून नाटकात रमलो. असा अभिनयातील करियरग्राफ हळूहळू उंचावतच गेला. माझा करियर ग्राफ थोडा वेगळ्या पद्धतीने झाला. आधी नाटक, मग मालिका नंतर चित्रपट. ‘शंभूराजे’नंतर ‘राजा शिवछत्रपती’ केले.