शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

आनंदाचे गुणोत्तर...

By admin | Updated: January 4, 2015 01:58 IST

मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक गोल सेट केला आणि त्याप्रमाणे तो साध्य केला. मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, त्यानंतर अभिनय क्षेत्रात आलो;

मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक गोल सेट केला आणि त्याप्रमाणे तो साध्य केला. मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, त्यानंतर अभिनय क्षेत्रात आलो; आणि राजकारणात प्रवेश केला. ही तीनही क्षेत्रे आनंदाचे गुणोत्तर करणारी आहेत. मी डॉक्टर राहिलो असतो तर शेकडो लोकांना आनंद दिला असता. अभिनय क्षेत्रात लाखोंना आनंद देईन; मात्र राजकारणात राहून मी कोट्यवधी लोकांचे जीवन सुखी करू शकेन. माझा जन्म पुणे येथील नारायणगावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच मी अभ्यासात हुशार होतो. अगदी शाळेतही पहिला क्रमांकच असायचा. दहावी आणि बारावीलाही मेरिटमध्ये होतो. शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. आमच्या नारायणगावच्या सबनीस विद्यामंदिर शाळेचे स्नेहसंमेलनही मोठ्या थाटात व्हायचे. त्यात मी अनेक नाटकांत भाग घेत असे. तेव्हापासूनच ठरवले होते मोठे होऊन अभिनेता व्हायचे, मात्र सामान्य कुटुंबाच्या विचारप्रणालीप्रमाणे मलाही आई-बाबांकडून सांगण्यात आले, ‘तुला तुझ्या उदरनिर्वाहासाठी पदवी शिक्षण घ्यावेच लागेच. शिक्षण नसेल तर कोणीच तुला विचारणार नाही.’ त्यामुळे पदवी शिक्षण पूर्ण करणे आवश्यकच झाले.माझ्या आयुष्याला यूटर्न मिळाला तो एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असताना. मला सूत्रसंचालन करायला मिळाले. केईएम मेडिकल कॉलेजमध्ये असताना आम्ही ‘अपूर्वाई’ नावाचा डान्स ड्रामा केला. त्या वेळेस मिळणारा आनंद मला सांगून गेला की ‘बॉस, दिस इज द टाइम. तुला आता यात वळायलाच पाहिजे.’ माझ्या आयुष्यात या वेळी अशी दोन माणसे आली ज्यांनी आयुष्याची दिशाच बदलली. त्या दोन व्यक्ती म्हणजे डॉ. रवी बापट आणि सुबल सरकार. बापट सरांनी मला आयुष्य किती अफाट असू शकते ते दाखवले. कारण आपण एका चाकोरीपद्धतीच्या आयुष्यात जगत असतो, हे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे पाहून असे वाटायचे एकच माणून विविध क्षेत्रांत किती सहजतेने संचार करू शकतो. तर सुबलदांनी आभाळाला हात टेकले तरी पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे शिकवले.मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक गोल सेट केला आणि त्याप्रमाणे तो साध्य केला. मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, त्यानंतर अभिनय क्षेत्रात आलो आणि राजकारणात प्रवेश केला. ही तीनही क्षेत्रे आनंदाचे गुणोत्तर करणारी आहेत. मी डॉक्टर राहिलो असतो तर शेकडो लोकांना आनंद दिला असता. अभिनय क्षेत्रात लाखोंना आनंद देईन; मात्र राजकारणात राहून मी कोट्यवधी लोकांचे जीवन सुखी करू शकेन. शिवाय मी जो पक्ष स्वीकारला आहे त्याचे मराठी लोकांसाठी आणि समाजाचे भले करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्याचा मीही सभासद झाल्याचा मला आनंद आहे. (शब्दांकन : सायली कडू)मी बारावीला मेरिटमध्ये आलो. त्या वेळी डॉ. श्रीराम लागू, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. गिरिश ओक, डॉ. शरद दुतवडे, डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे अशा नामवंत कलाकारांचा माझ्यावर प्रभाव होता. त्यामुळे त्या वयात मला असे वाटायचे की डॉक्टर झाल्यावर आपल्याला अभिनय क्षेत्रातही येता येते. हा गमतीचा भाग सोडला तर एक स्थैर्य देणारा व्यवसाय तसेच समाजाप्रती आपली असलेली जबाबदारी पार पाडण्याची संधी मला वैद्यकीय क्षेत्रातच मिळणार होती. म्हणून मी डॉक्टर व्हायचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील प्रथिष्ठित ‘जी. एस. मेडिकल कॉलेज’मधून २००४ साली मी पदवीधर होऊन बाहेर पडलो.पहिले दोन अंकी नाटक केईएममध्ये असताना ‘शांतीचं कार्ट चालू’ हे केले. त्यानंतर ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ आणि ‘अपूर्वाई’ केले. इथून सुरुवात झाली आणि सूत्रसंचालन केले. त्यानंतर पहिली मालिका ‘चार दिवस सासूचे’ केली. त्या वेळी मला पहिले व्यावसायिक नाटक ‘शंभूराजे’ करण्याची संधी मिळाली आणि एकावेळी पाच मालिका सोडून नाटकात रमलो. असा अभिनयातील करियरग्राफ हळूहळू उंचावतच गेला. माझा करियर ग्राफ थोडा वेगळ्या पद्धतीने झाला. आधी नाटक, मग मालिका नंतर चित्रपट. ‘शंभूराजे’नंतर ‘राजा शिवछत्रपती’ केले.