शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

दहा संचालकांवर टांगती तलवार

By admin | Updated: January 6, 2016 00:58 IST

न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष : मुश्रीफ, सरनाईकांसमोरील अडचणी कायम

कोल्हापूर : गैरव्यवहारामुळे बरखास्त संचालक मंडळांना दहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दहा विद्यमान संचालकांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या वसुलीच्या नोटिसीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्याची सुनावणी १४ जानेवारी आहे. आमदार हसन मुश्रीफ व बाळासाहेब सरनाईक हे राज्य बँकेच्या बरखास्त संचालक मंडळात होते. त्यामुळे जिल्हा बँकेबाबत न्यायालयाने काहीही निर्णय दिला तरीही मुश्रीफ व सरनाईक यांच्यासमोरील अडचणी कायम राहणार आहेत. विनातारण, अपुऱ्या तारणावर कर्ज वाटप केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४५ माजी संचालकांवर १४७ कोटींची जबाबदारी निश्चित केली आहे. प्राधीकृत अधिकारी सचिन रावल यांनी जबाबदारी निश्चितीच्या कारवाईनुसार विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी वसुलीच्या नोटिसा संबंधितांना लागू केल्या होत्या. याविरोधात संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याला न्यायालयाने स्थगिती दिली असून यावर १४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यान, राज्य सहकारी बँक व काही जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याने संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासक नियुक्त केला आहे तेथील संचालकांनी दहा वर्षे सहकारी संस्थेमधील निवडणूक लढविता येणार नाही, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. यापूर्वी बरखास्त संचालकांना सहा वर्षे निवडणूक लढवता येत नव्हती. त्यामध्ये आणखी चार वर्षांची वाढ करून भाजप सरकारने दोन्ही काँग्रेसच्या कारभाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँकेचे दहा विद्यमान संचालक अडचणीत येऊ शकतात. त्याचबरोबर ३५ माजी संचालकांना दहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. आमदार हसन मुश्रीफ व बाळासाहेब सरनाईक हे राज्य सहकारी बँकेचे बरखास्त संचालक मंडळात होते. जिल्हा बँकेच्या कारवाईबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्याचा निकालावर उर्वरित संचालकांचे भवितव्य असले तरी मुश्रीफ अडचणीत येऊ शकतात. आमदार हसन मुश्रीफ के. पी. पाटील ए. वाय. पाटील विनय कोरे निवेदिता माने पी. एन. पाटीलमहादेवराव महाडिक पी. जी. शिंदे राजू आवळे नरसिंग गुरुनाथ पाटीलसहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हिटलरशाहप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय घेतला आहे. एकेकाळी हिटलरने सामान्य माणसांना गॅस चेंबरमध्ये घालून मारले होते. त्याप्रमाणे मंत्रिमहोदयांचे काम सुरू असून दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांवर ते आकसापोटी कारवाई करण्याचे प्रयत्न करत आहेत. मंत्रिमंडळाने मान्यता दिली असली तरी राज्यपालांनी अजून स्वाक्षरी केलेली नाही. कायद्याचा अभ्यास करून आम्ही न्यायालयात दाद मागू. - आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बॅँक