शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अंजनाबाईच्या मुलींच्या फाशीला उशीर झाला नाही

By admin | Updated: November 20, 2014 02:28 IST

न्या़व्ही़एम़ कानडे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली़ त्यात केंद्र सरकारने रीतसर प्रतिज्ञापत्र सादर करून वरील दावा केला,

मुंबई : चोरी व भीक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या रेणुका शिंदे व सीमा गावित यांच्या दयेचा अर्ज अर्ज निकाली काढण्यासाठी उशीर झाला नसल्याचा दावा केंद्र व राज्य शासनाने बुधवारी उच्च न्यायालयात केला़न्या़व्ही़एम़ कानडे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली़ त्यात केंद्र सरकारने रीतसर प्रतिज्ञापत्र सादर करून वरील दावा केला, तर राज्य शासनाने युक्तिवाद करताना ही भूमिका मांडली़ ते ग्राह्य धारीत न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली़ १९९० ते आॅक्टोबर १९९६ या काळात अंजनाबाई, शिंदे व तिचा पती तसेच गावित यांनी चोरी व भीक भागण्यासाठी १३ मुलांचे अपहरण करून यातील ९ जणांची हत्या केली़ या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता़ यात शिंदेचा पती माफीचा साक्षीदार झाला व अंजनाबाईचे कारागृहात निधन झाले़या गुन्ह्यासाठी दोषी धरीत २००१ मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने या दोघींना फाशीची शिक्षा ठोठावली व उच्च न्यायालयाने २००४ मध्ये त्यावर शिक्कामोर्तब केले़ २००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही फाशी योग्य असल्याचा निर्वाळा दिला़ त्यानंतर या दोघींनीही दयेसाठी प्रथम राज्यपाल व त्यापाठोपाठ राष्ट्रपतींकडे स्वतंत्र अर्ज केला, मात्र त्यांचे अर्ज फेटाळले़ या सर्व प्रक्रियेत आठ वर्षे गेली़ कारागृहातील चांगले वर्तन बघता त्यांचे पुनर्वसनही होऊ शकते़ त्यामुळे त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्याचे जन्मठेप रूपांतर करावे, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका या दोघींनी उच्च न्यायालयात केली आहे़ याचे प्रत्युत्तर सादर करताना केंद्र व राज्य शासनाने वरील दावा केला़