शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

अंजनाबाईच्या मुलींच्या फाशीला उशीर झाला नाही

By admin | Updated: November 20, 2014 02:28 IST

न्या़व्ही़एम़ कानडे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली़ त्यात केंद्र सरकारने रीतसर प्रतिज्ञापत्र सादर करून वरील दावा केला,

मुंबई : चोरी व भीक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या रेणुका शिंदे व सीमा गावित यांच्या दयेचा अर्ज अर्ज निकाली काढण्यासाठी उशीर झाला नसल्याचा दावा केंद्र व राज्य शासनाने बुधवारी उच्च न्यायालयात केला़न्या़व्ही़एम़ कानडे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली़ त्यात केंद्र सरकारने रीतसर प्रतिज्ञापत्र सादर करून वरील दावा केला, तर राज्य शासनाने युक्तिवाद करताना ही भूमिका मांडली़ ते ग्राह्य धारीत न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली़ १९९० ते आॅक्टोबर १९९६ या काळात अंजनाबाई, शिंदे व तिचा पती तसेच गावित यांनी चोरी व भीक भागण्यासाठी १३ मुलांचे अपहरण करून यातील ९ जणांची हत्या केली़ या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता़ यात शिंदेचा पती माफीचा साक्षीदार झाला व अंजनाबाईचे कारागृहात निधन झाले़या गुन्ह्यासाठी दोषी धरीत २००१ मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने या दोघींना फाशीची शिक्षा ठोठावली व उच्च न्यायालयाने २००४ मध्ये त्यावर शिक्कामोर्तब केले़ २००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही फाशी योग्य असल्याचा निर्वाळा दिला़ त्यानंतर या दोघींनीही दयेसाठी प्रथम राज्यपाल व त्यापाठोपाठ राष्ट्रपतींकडे स्वतंत्र अर्ज केला, मात्र त्यांचे अर्ज फेटाळले़ या सर्व प्रक्रियेत आठ वर्षे गेली़ कारागृहातील चांगले वर्तन बघता त्यांचे पुनर्वसनही होऊ शकते़ त्यामुळे त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्याचे जन्मठेप रूपांतर करावे, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका या दोघींनी उच्च न्यायालयात केली आहे़ याचे प्रत्युत्तर सादर करताना केंद्र व राज्य शासनाने वरील दावा केला़