शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

‘मृत्यूच्या व्यापाऱ्यांना’ फाशी द्या

By admin | Updated: September 24, 2015 01:48 IST

मुंबईच्या रेल्वे लोकलगाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी दोषी ठरवण्यात आलेल्या १२ दहशतवाद्यांपैकी आठ जणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,

मुंबई: मुंबईच्या रेल्वे लोकलगाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी दोषी ठरवण्यात आलेल्या १२ दहशतवाद्यांपैकी आठ जणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी बुधवारी सरकारने विशेष मोक्का न्यायालयाकडे केली. विशेष न्यायालयाने शिक्षेवरील निकाल ३० सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला. ७/११च्या खटल्यातील सर्व आरोपी ‘मृत्यूचे व्यापारी’ आहेत, असा उल्लेख करीत विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी १२ आरोपींपैकी आठ आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र असल्याने त्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी विशेष न्यायालायाचे न्या. वाय. डी. शिंदे यांच्याकडे केली. ११ जुलै २००६च्या बॉम्बस्फोटा प्रकरणी विशेष न्यायालयाने १२ पैकी ११ आरोपींना दोषी ठरवत एकाची निर्दोष सुटका केली. या बॉम्बस्फोटात १८८ लोक मृत्युमुखी पडले, तर ८०० हून अधिक जखमी झाले होते.कमल अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद फैझल शेख, एहतेशाम सिद्दिकी, शेख आलम शेख, मोहम्मद साजीद अन्सारी, नावेद हुस्सेन खान आणि असीफ खान या आरोपींनी फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी. तर मोहम्मद माजीद शफीक, मुझम्मील शेख, सोहेल शेख आणि जमीर अहमद शेख यांना आठ जणांपेक्षा वेगळी शिक्षा देण्यात येऊ शकते, असे म्हणणे अ‍ॅड. ठाकरे यांनी न्या. शिंदे यांच्यासमोर मांडले. या चारही जणांना दया दाखवण्याचा विचार न्यायालय करीत असेल तर त्यांनी केलेला गुन्हा पाहता, त्यांना अनेक वेळा जन्मठेप होऊ शकेल. त्यामुळे या चारही जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठवावी किंवा त्यांच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी अ‍ॅड. ठाकरे यांनी विशेष न्यायालयाकडे केली. ज्या वेळेत बॉम्बस्फोट करण्यात आला त्या वेळी चर्चगेट ते विरार यादरम्यान लोकलमध्ये गर्दी असते, हे सगळ्यांना माहीत आहे. हे बॉम्बस्फोट जाणूनबुजून संध्याकाळी आणि गर्दीच्या वेळी करण्यात आले. कारण याच वेळी अनेक लोकांचा जीव जाईल याची संपूर्ण कल्पना आरोपींना होती. आरोपींच्या या योजनेवरूनच त्यांची मानसिकता स्पष्ट होते, असाही युक्तिवाद अ‍ॅड. ठाकरे यांनी केला.