शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

‘मृत्यूच्या व्यापाऱ्यांना’ फाशी द्या

By admin | Updated: September 24, 2015 01:48 IST

मुंबईच्या रेल्वे लोकलगाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी दोषी ठरवण्यात आलेल्या १२ दहशतवाद्यांपैकी आठ जणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,

मुंबई: मुंबईच्या रेल्वे लोकलगाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी दोषी ठरवण्यात आलेल्या १२ दहशतवाद्यांपैकी आठ जणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी बुधवारी सरकारने विशेष मोक्का न्यायालयाकडे केली. विशेष न्यायालयाने शिक्षेवरील निकाल ३० सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला. ७/११च्या खटल्यातील सर्व आरोपी ‘मृत्यूचे व्यापारी’ आहेत, असा उल्लेख करीत विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी १२ आरोपींपैकी आठ आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र असल्याने त्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी विशेष न्यायालायाचे न्या. वाय. डी. शिंदे यांच्याकडे केली. ११ जुलै २००६च्या बॉम्बस्फोटा प्रकरणी विशेष न्यायालयाने १२ पैकी ११ आरोपींना दोषी ठरवत एकाची निर्दोष सुटका केली. या बॉम्बस्फोटात १८८ लोक मृत्युमुखी पडले, तर ८०० हून अधिक जखमी झाले होते.कमल अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद फैझल शेख, एहतेशाम सिद्दिकी, शेख आलम शेख, मोहम्मद साजीद अन्सारी, नावेद हुस्सेन खान आणि असीफ खान या आरोपींनी फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी. तर मोहम्मद माजीद शफीक, मुझम्मील शेख, सोहेल शेख आणि जमीर अहमद शेख यांना आठ जणांपेक्षा वेगळी शिक्षा देण्यात येऊ शकते, असे म्हणणे अ‍ॅड. ठाकरे यांनी न्या. शिंदे यांच्यासमोर मांडले. या चारही जणांना दया दाखवण्याचा विचार न्यायालय करीत असेल तर त्यांनी केलेला गुन्हा पाहता, त्यांना अनेक वेळा जन्मठेप होऊ शकेल. त्यामुळे या चारही जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठवावी किंवा त्यांच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी अ‍ॅड. ठाकरे यांनी विशेष न्यायालयाकडे केली. ज्या वेळेत बॉम्बस्फोट करण्यात आला त्या वेळी चर्चगेट ते विरार यादरम्यान लोकलमध्ये गर्दी असते, हे सगळ्यांना माहीत आहे. हे बॉम्बस्फोट जाणूनबुजून संध्याकाळी आणि गर्दीच्या वेळी करण्यात आले. कारण याच वेळी अनेक लोकांचा जीव जाईल याची संपूर्ण कल्पना आरोपींना होती. आरोपींच्या या योजनेवरूनच त्यांची मानसिकता स्पष्ट होते, असाही युक्तिवाद अ‍ॅड. ठाकरे यांनी केला.