शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अडतमुक्त बाजाराची शत्तकोत्तर परंपरा

By admin | Updated: December 24, 2014 00:21 IST

जळगाव जामोद कृउबासच्या पावलावर महाराष्ट्राचे पाऊल !

जयदेव वानखडे/जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या अडतमुक्त करण्याचे धोरण सध्या चांगलेच गाजत आहे. अडतमुक्त धोरण ११0 वर्षापासून बुलडाणा जिलतील जळगाव जामोद येथे राबविले जात आहे. शेतकर्‍यांचे हित जोपासणारी ही राज्यातील एकमेव अडतमुक्त बाजार समिती आहे. याच पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रातील बाजार समित्या अडतमुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता, परंतु त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाची सहज विक्री व्हावी त्याला योग्य भाव मिळावा या उद्देशाने उदय झालेल्या बाजार समितीच्या उद्देशाला जळगाव जामोद येथे खर्‍या अर्थाने मूर्तरूप दिले आहे. सध्या या बाजार समिती अंतर्गत येणार्‍या आसलगाव, जळगाव जामोद, पिंपळगाव या सर्व केंद्रावर शेतमालाची अडतमुक्त खरेदी-विक्री होत आहे. जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांचा आलेला माल आलेल्या क्रमांकानुसार लावला जातो. मार्केटची माणसे हाराशी पावती बनवतात व एक कर्मचारी धान्य हातात घेवून बोलीस सुरूवात करतो व जो व्यापारी जास्त भाव देईल, त्या नावे हाराशी पावती बनवून देतो. त्या तीन प्रतीत असतात. त्यापैकी एक प्रत शेतकरी, एक व्यापारी तर एक बाजार समितीकडे राहते. त्यानंतर सदर व्यापार्‍याच्या काट्यावर माल नेवून शेतकरी ठरलेल्या भावानुसार आपला माल मोजून देतात व पैसे आणि रिकामा बारदाना घेवून अडत न कापल्याने समाधानाने परततात. शेतकरी हिताचे लक्ष ठेवून त्यांना विना अडत चोख मोजमाप, नगदी चुकारा आणि खुल्या पद्धतीने हाराशी पद्धतीचा अवलंब केला. येथे शेतकरी माल विकला त्याच पैसा घेवून मोकळा होतो. त्यामुळे त्याला इतर बाजार समित्यांमध्ये माल नेणार्‍या शेतकर्‍यासारखे नुकसान सोसावे लागत नसल्याचे जळगाव जामोदची कृउबास माजी सभापतीचे प्रसेनजित पाटील यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. *खुल्या लिलाव पद्धतीने धान्याची हाराशी, चोख मोजमाप आणि तेही पोत्यांमध्येच. नगदी चुकारा आणि तोही विना अडत तसेच याठिकाणी शेतकर्‍यांच्या शेतमालाला चाळणी लावली जात नाही. ही या बाजार समितीची वैशिष्ट्ये आहे. वर्षाकाठी ७ ते ८ लाख क्विंटल धान्याची खरेदी विक्री या समितीच्या सर्व यार्डामधून होत असल्याने ३ ते ४ कोटी रूपयांची अडत वाचते पर्यायाने हा शेतकर्‍यांचाच फायदा होतो.