शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव नगर परिषदेवर ‘जनसेवा’चा हंडा मोर्चा

By admin | Updated: March 4, 2017 01:22 IST

अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ तळेगाव जनसेवा विकास समितीच्या वतीने शुक्रवारी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला.

तळेगाव दाभाडे : तळेगाव स्टेशन भागातील नागरिकांना कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ तळेगाव जनसेवा विकास समितीच्या वतीने शुक्रवारी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सुलोचना आवारे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे व ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे यांनी केले. सत्ताधारी मित्र पक्षानेच मोर्चा काढून खुर्च्या खाली करण्याचा घरचा आहेर दिल्याने शहरात याची चर्चा सुरूआहे.मोर्चात सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे, नगरसेवक संग्राम काकडे, रोहित लांघे, सचिन टकले, नगरसेविका अनिता पवार, सुमित्रा दौंडकर, सलोनी तारकर, कल्पना साळुंके, चैताली देशमुख, सुरेखा वाडेकर, मंगल चिखले यांच्यासह महिला व नागरिक सहभागी झाले होते. या वेळी मोर्चेकऱ्यांनी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या केबीनमध्ये रिकामे माठ फोडून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी वैभव आवारे यांना या वेळी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आवारे म्हणाल्या, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना प्रशासनाकडून काम करून घेता येत नसेल, तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात. आम्ही प्रशासनाकडून पाणीप्रश्न मार्गी लावू. लोकप्रतिनीधी म्हणून स्टेशन भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.नगरसेवक खांडगे म्हणाले की, स्टेशन भागातील पाण्याच्या जटील समस्येमुळे महिलांच्या डोळ्यांत पाणी येण्याची वेळ आली आहे. पाणी वाटपात गाव आणि स्टेशन भाग असा जाणूनबुजून दुजाभाव केला जात आहे. आठ मार्चपर्यंत पाणीप्रश्नमार्गी लागला नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. विरोधी पक्षनेत्या खळदे यांनी प्रशासनावर सडकून टीका केली. राजीव फलके, सुमित्रा दौंडकर यांनी पाण्यामुळे हाल होत असल्याबाबत तीव्र्र संताप व्यक्त केला. नगराध्यक्षा जगनाडे म्हणाल्या, इंद्रायणी पाणीपुरवठा केंद्राच्या सक्षमीकरणाचे काम सुरू असून, ते पूर्ण होताच स्टेशन भागातील पाणी प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल.मुख्याधिकारी आवारे यांनी मोर्चेकरांना आश्वासन देताना सांगितले की, ८ मार्चपर्यंत स्टेशन भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे. (वार्ताहर)समस्येचे निराकरण करास्टेशन भागास अपुऱ्या दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे महिलांना जाच सहन करावा लागतो. पाण्याच्या गैरसोईमुळे प्रचंड हाल होत आहेत. इंद्रायणी जॅकवेलमधून होणारा पाणीपुरवठा सुरू होण्यास बराच अवधी लागू शकतो.त्यामुळे पाणीप्रश्नाच्या या गंभीर समस्येचे युद्धपातळीवर निराकरण करावे. शहरातील प्रत्येक भागाला वेगवेगळ्या वेळात पाणी सोडावे, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा आणि पाण्याचे वेळापत्रकतयार करावे, अशा मागण्या या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.