शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

केडीएमसीचा बेकायदा इमारतीवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 03:45 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बेकायदा बांधकामविरोधी पथकाने बुधवारी नांदिवली येथील देसलेपाडा चौकातील सात मजली इमारतीवर हातोडा चालवला

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बेकायदा बांधकामविरोधी पथकाने बुधवारी नांदिवली येथील देसलेपाडा चौकातील सात मजली इमारतीवर हातोडा चालवला. प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. या वेळी नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता तो मोडून काढण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पांगवले. तर काहींना पकडून पोलीस व्हॅनमध्ये कोंबले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.उदयभान सिंग यांनी उभारलेल्या सात मजली बेकायदा इमारतीवर पोकलॅन व जेसीबीच्या सहायाने कारवाई करण्यात आली. या इमारतीसह अन्य तीन इमारतींना ई प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार यांनी नोटीस बजावली होती. बुधवारी प्रत्यक्षात कारवाई सुरू झाल्याने २७ गावांत बेकायदा इमारत्ी बांधणाऱ्या बिल्डरांचे धाबे दणाणले आहे.२७ गावांपैकी १० गावांच्या हद्दीत कल्याण ग्रोथ सेंटर उभारले जणार आहे. या गावांचे नियोजन प्राधिकरण एमएमआरडीए आहे. तर १७ गावांतील नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी केडीएमसीची आहे. मागील आठवड्यात खोणी येथील तीन बेकायदा इमारतींवर एमएमआरडीएने कारवाईचा हातोडा चालवला होता. २७ गावांत १२०० बेकायदा इमारती असल्याचा दावा केला जात आहे. तर बेकायदा बांधकामांच्या विरोधात न्यायालयीन लढा देणाऱ्यांच्या मते ८ हजार बेकायदा बांधकामे झाली आहेत. महापालिका व एमएमआरडीए यांच्या यादीत बेकायदा बांधकामांचा किती आकडा आहे, हे तूर्तास समोर आलेले नाही. तरीही महापालिकेचा बेकायदा बांधकामे पाडण्याचा कृती आराखडा एक-दोन दिवसांपुरता मर्यादित न राहता त्यात सातत्य हवे, अशी अपेक्षा होत आहे. बुधवारी कारवाईला विरोध झाल्यावर काहींनी महापालिकेत महापौर व आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. (प्रतिनिधी)>‘संगू प्लाझा’चे प्रकरण न्यायालयातनांदिवली परिसरातील संगू प्लाझा इमारत तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी या इमारतीतील नागरिकांनी पुन्हा कल्याण न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर महापालिकेतर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.>आताच कारवाई तीव्र का?विधि मंडळात २०१५ पर्यंत बेकायदा बांधकामांना नियमित करण्यात येईल, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. त्यामुळे ही सगळी बेकायदा बांधकामे नियमित होणार आहेत. तर महापालिकेकडून बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई आत्ताच का तीव्र केली जात आहे, असा सवाल बेकायदा इमारतींत राहणाऱ्या नागरिकांकडून केला जात आहे.