शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडे बाजारांतील उलाढाल निम्म्यावर

By admin | Updated: May 11, 2016 04:05 IST

ग्रामीण अर्थचक्राचा कणा असणाऱ्या आठवडे बाजारावर दुष्काळाचा विपरित परिणाम झाला आहे. जिल्ह्यात ९ तालुक्यांत ९२ आठवडे बाजार असून, त्यांची वार्षिक उलाढाल ३ हजार कोटींच्या घरात आहे

औरंगाबाद : ग्रामीण अर्थचक्राचा कणा असणाऱ्या आठवडे बाजारावर दुष्काळाचा विपरित परिणाम झाला आहे. जिल्ह्यात ९ तालुक्यांत ९२ आठवडे बाजार असून, त्यांची वार्षिक उलाढाल ३ हजार कोटींच्या घरात आहे. दुष्काळामुळे ही उलाढाल निम्म्यावर आली आहे. बुधवारी औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी, चित्तेपिंपळगाव, आडगाव सरक, गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव, कन्नड तालुक्यातील चापानेर, नागापूर, पैठणमधील बिडकीन, सिल्लोड तालुक्यातील शिवना, आमठाणा, फुलंब्रीतील बाबरा, वैजापूरमधील लोणी खु., परसोडा, खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद येथे आठवडे बाजार भरतात. या सर्व बाजारात सध्या सन्नाटा आहे. पाण्याअभावी पालेभाज्यांचा तुटवडा आहे. परजिल्ह्यांतून येणाऱ्या पालेभाज्या व फळभाज्यांवर सर्व मदार आहे. लाडसावंगी येथील आठवडे बाजारातील मसाले विक्रेते शेख जमीर यांनी सांगितले की, दोन महिन्यांपासून उलाढाल घटली असून शेतकऱ्यांच्या हाती पैसाच नाही. ग्रामविकास अधिकारी बी. एस. मुखाडे यांनी सांगितले की, स्थानिक आवक घटल्याने त्याचा परिणाम बाजारात जाणवत आहे. कन्नड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव के. एम. वानखेडे म्हणाले की, आठवडे बाजारात शेतीमालाची आवक कमी झाली आहे. परिणामी ५० टक्के उलाढालीवर परिणाम झाला आहे. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रप्रकाश खरात यांनीही याला दुजोरा दिली आहे. पैठण तालुक्यात १३ आठवडे बाजार भरतात. काही बाजारातील उलाढाल ८ ते १० लाखांवरून २ ते ३ लाखांवर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ९२ आठवडे बाजार भरतात. महिनाभरात सुमारे २५० ते ३०० कोटींची उलाढाल होत असते. ही उलाढाल ६० टक्क्यांनी घटल्याचे औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व्ही. ए. शिरसाठ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)> पाण्याच्या टंचाईमुळे आठवडे बाजारात शेतीमालाची आवक ५५ टक्क्यांपर्यंत घटली आहे. तसेच पाण्याअभावी दावणीची जनावरे विक्रीला आणण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र, खरेदीदारांनीच पाठ फिरविल्याने जनावरांच्या किमतीही कमी झाल्या आहेत, असे लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आर.एस. काकडे यांनी सांगितले. वैजापूर तालुक्यात १२ आठवडे बाजार भरतात. त्यातील महालगाव, लोणी खु. व मनूर येथे जनावरांचा बाजारही भरतो. मागील दोन महिन्यांत जनावरांना विक्रीला आणण्याचे प्रमाण वाढल्याचे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व्ही.डी. शिनगर यांनी सांगितले.