शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

आठवडे बाजारांतील उलाढाल निम्म्यावर

By admin | Updated: May 11, 2016 04:05 IST

ग्रामीण अर्थचक्राचा कणा असणाऱ्या आठवडे बाजारावर दुष्काळाचा विपरित परिणाम झाला आहे. जिल्ह्यात ९ तालुक्यांत ९२ आठवडे बाजार असून, त्यांची वार्षिक उलाढाल ३ हजार कोटींच्या घरात आहे

औरंगाबाद : ग्रामीण अर्थचक्राचा कणा असणाऱ्या आठवडे बाजारावर दुष्काळाचा विपरित परिणाम झाला आहे. जिल्ह्यात ९ तालुक्यांत ९२ आठवडे बाजार असून, त्यांची वार्षिक उलाढाल ३ हजार कोटींच्या घरात आहे. दुष्काळामुळे ही उलाढाल निम्म्यावर आली आहे. बुधवारी औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी, चित्तेपिंपळगाव, आडगाव सरक, गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव, कन्नड तालुक्यातील चापानेर, नागापूर, पैठणमधील बिडकीन, सिल्लोड तालुक्यातील शिवना, आमठाणा, फुलंब्रीतील बाबरा, वैजापूरमधील लोणी खु., परसोडा, खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद येथे आठवडे बाजार भरतात. या सर्व बाजारात सध्या सन्नाटा आहे. पाण्याअभावी पालेभाज्यांचा तुटवडा आहे. परजिल्ह्यांतून येणाऱ्या पालेभाज्या व फळभाज्यांवर सर्व मदार आहे. लाडसावंगी येथील आठवडे बाजारातील मसाले विक्रेते शेख जमीर यांनी सांगितले की, दोन महिन्यांपासून उलाढाल घटली असून शेतकऱ्यांच्या हाती पैसाच नाही. ग्रामविकास अधिकारी बी. एस. मुखाडे यांनी सांगितले की, स्थानिक आवक घटल्याने त्याचा परिणाम बाजारात जाणवत आहे. कन्नड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव के. एम. वानखेडे म्हणाले की, आठवडे बाजारात शेतीमालाची आवक कमी झाली आहे. परिणामी ५० टक्के उलाढालीवर परिणाम झाला आहे. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रप्रकाश खरात यांनीही याला दुजोरा दिली आहे. पैठण तालुक्यात १३ आठवडे बाजार भरतात. काही बाजारातील उलाढाल ८ ते १० लाखांवरून २ ते ३ लाखांवर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ९२ आठवडे बाजार भरतात. महिनाभरात सुमारे २५० ते ३०० कोटींची उलाढाल होत असते. ही उलाढाल ६० टक्क्यांनी घटल्याचे औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व्ही. ए. शिरसाठ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)> पाण्याच्या टंचाईमुळे आठवडे बाजारात शेतीमालाची आवक ५५ टक्क्यांपर्यंत घटली आहे. तसेच पाण्याअभावी दावणीची जनावरे विक्रीला आणण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र, खरेदीदारांनीच पाठ फिरविल्याने जनावरांच्या किमतीही कमी झाल्या आहेत, असे लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आर.एस. काकडे यांनी सांगितले. वैजापूर तालुक्यात १२ आठवडे बाजार भरतात. त्यातील महालगाव, लोणी खु. व मनूर येथे जनावरांचा बाजारही भरतो. मागील दोन महिन्यांत जनावरांना विक्रीला आणण्याचे प्रमाण वाढल्याचे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व्ही.डी. शिनगर यांनी सांगितले.