शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

न्यायाधीशांची निम्मी पदे रिक्त

By admin | Updated: March 27, 2016 01:19 IST

नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या न्यायव्यवस्थेचा गाडा न्यायाधीशांच्या रिक्त पदांमुळे अडखळत पुढे चालला आहे. सर्वोच्च न्यायालयासह देशभरातील उच्च न्यायालयांमधील

- राजानंद मोरे,  पुणेनागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या न्यायव्यवस्थेचा गाडा न्यायाधीशांच्या रिक्त पदांमुळे अडखळत पुढे चालला आहे. सर्वोच्च न्यायालयासह देशभरातील उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची जवळपास निम्मी पदे रिक्त आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत चालली असून न्याय मिळण्यासाठी विलंब होत आहे. न्यायव्यवस्थेकडे मागील काही वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. देशातील तालुकास्तरापासून असलेल्या न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातील बरीचशी प्रकरणे उच्च न्यायालयापर्यंत पोहोचतात. तर थेट उच्च न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या प्रकरणांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, न्यायाधीशांच्या रिक्त पदांमुळे प्रकरणांचा निपटारा होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे प्रलबिंत प्रकरणांची संख्या वाढतच चालली आहे. सर्वोच्च न्यायालयासह देशातील २४ उच्च न्यायालयांमध्ये १ मार्च २०१६ अखेर न्यायाधीशांची एकुण मंजुर पदे १०५६ असून त्यापैकी तब्बल ४५ टक्के म्हणजे ४६५ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये एकट्या अलाहाबाद उच्च न्यायालयात ८८ तर त्याखालोखाल मद्रास उच्च न्यायालयात ४० पदे रिक्त आहेत. हैद्राबाद व मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची अनुक्रमे ३५ व ३४ पदे रिक्त आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची ३१ मंजुर पदे असून ६ पदे रिक्त आहेत. देशातील विविध न्यायालयांमध्ये एकुण २ कोटी १२ लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांची संख्या सुमारे १ कोटी ४१ लाख एवढी आहे. एकुण प्रलंबित प्रकरणांमध्ये २ वर्षांपेक्षा कमी कालावधीची प्रकरणे ४२.२९ टक्के आहेत. तर दहा वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या खटल्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. हे प्रमाण सुमारे साडे दहा टक्के एवढे आहे. सद्यस्थितीत देशात प्रलंबित खटल्यांमध्ये उच्च प्रदेश हे राज्य आघाडीवर आहे. या राज्यांतील विविध न्यायालयांमध्ये ५० लाखांहून अधिक खटले प्रलंबित आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक असून राज्यातील प्रलंबित प्रकरणांची संख्या २६ लाखांहून अधिक आहे. प्रलंबित प्रकरणांचा आकडा खूप मोठा असल्याने न्यायव्यवस्थेवरील ताण वाढत चालला आहे. हा ताण कमी करण्यासाठी न्यायाधीशांची रिक्त पदे भरणे आवश्यक बनले आहे.