शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

गुंतवणुकीचे निम्मे ‘मेक इन’ राज्यात!

By admin | Updated: February 19, 2016 03:49 IST

भारतात तब्बल १५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले असून त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे ७ लाख ९४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होणार आहे.

मुंबई : मेक इन इंडिया सप्ताहात देशविदेशातील उद्योगांनी भारतात तब्बल १५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले असून त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे ७ लाख ९४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होणार आहे. त्याद्वारे तब्बल ३० लाख रोजगार उपलब्ध होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. १३ फेब्रुवारीपासून बीकेसी मैदानावर सुरू असलेल्या या सप्ताहाचे आज सूप वाजले. गुंतवणुकीच्या आघाडीवर त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे. या सप्ताहात राज्यातील गुंतवणुकीसाठी झालेल्या करारांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन विशेष टास्क फोर्सची स्थापना करेल, असे मुख्यमंत्र्यांनी समारोपानंतर सांगितले. या गुंतवणुकीचा आढावा राज्य प्रशासन दर महिन्याला घेईल, असे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी जाहीर केले. सप्ताहाचा समारोप झाला असला तरी महाराष्ट्राच्या दृष्टीने आजपासून मेक इन इंडिया अन् महाराष्ट्रचे मिशन सुरू झाले. या सप्ताहानिमित्त राज्याराज्यांमध्ये निकोप स्पर्धा दिसली. देशाची आणि महाराष्ट्राची ताकद जगाला दिसली, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाचे सचिव अमिताभ कांत, केंद्रीय सचिव रमेश अभिषेक आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)मराठवाडा, विदर्भात १.५० लाख कोटीऔद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाडा व विदर्भ विभागात १ लाख ५० हजार कोटी रु पयांच्या गुंतवणुकीचे करार झाले. खान्देशात २५ हजार कोटी रु पये, पुणे विभागात ५० हजार कोटी, तर मुंबईसह कोकण विभागात ३ लाख २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. उर्वरित विभागवार गुंतवणुकीची आकडेवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे.