शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

सहा महिन्यांत दीड हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: May 29, 2015 01:22 IST

गेल्या सहा महिन्याच्या काळात राज्यात १५०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी २९९ आत्महत्यांची कारणे अद्याप भाजपा-शिवसेना सरकारला शोधता आलेली नाहीत.

मुंबई : गेल्या सहा महिन्याच्या काळात राज्यात १५०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी २९९ आत्महत्यांची कारणे अद्याप भाजपा-शिवसेना सरकारला शोधता आलेली नाहीत. शिवाय, खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचे १८२७.६२ कोटी रुपये अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, गारपीट आणि वादळाने झालेल्या नुकसानीची मदत तर अजून कागदावरच आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.खरीपाच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ३० मे ते १ जून असे तीन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहितीही मुंडे यांनी दिली. मुंडे म्हणाले, सरकारकडे ४८०३.०९ कोटींची मागणी २६ जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. प्रत्यक्षात फक्त ३४३५.७३ कोटींची मदत दिली गेली. उर्वरित १८७२.६२ कोटी दिलेले नाहीत. एकीकडे जन धन योजनेत प्रत्येकाचे बँक खाते आहे असा डांगोरा पिटणाऱ्या युती सरकारने शेतकऱ्यांची खाती सापडत नाहीत म्हणून ४६० कोटी रुपये दिलेले नाहीत, असेही मुंडे म्हणाले.१५०४ आत्महत्यांपैकी अमरावती विभागात ५८५, मराठवाड्यात ५३२, नाशिक विभागात १९९, नागपूर विभागात १६२, तर कोकणात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारीही सांगितली. आत्महत्येनंतर ४८ तासात जिल्हास्तरीय समितीसमोर प्रकरण ठेवून सानुग्रह अनुदान मंजूर करण्याची कारवाई करण्याच्या सूचना असताना अद्यात २९९ आत्महत्यांचा अहवालच आलेला नाही असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.च्दुष्काळी परिस्थिती तीव्र असताना राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवून विमा कंपनीला २५० कोटी रुपये प्रिमीयम भरला मात्र सरकारने स्वत:च्या हिश्श्याचे ६३० कोटी रुपयांसाठी अर्थसंकल्पात तरतूदच केलेली नव्हती. च्काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत आकस्मिकता निधीतून ही रक्कम देण्याची तरतूद केली गेली आहे. त्यामुळे ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना काहीही मदत मिळणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.