शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

सहा महिन्यांत दीड हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: May 29, 2015 01:22 IST

गेल्या सहा महिन्याच्या काळात राज्यात १५०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी २९९ आत्महत्यांची कारणे अद्याप भाजपा-शिवसेना सरकारला शोधता आलेली नाहीत.

मुंबई : गेल्या सहा महिन्याच्या काळात राज्यात १५०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी २९९ आत्महत्यांची कारणे अद्याप भाजपा-शिवसेना सरकारला शोधता आलेली नाहीत. शिवाय, खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचे १८२७.६२ कोटी रुपये अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, गारपीट आणि वादळाने झालेल्या नुकसानीची मदत तर अजून कागदावरच आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.खरीपाच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ३० मे ते १ जून असे तीन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहितीही मुंडे यांनी दिली. मुंडे म्हणाले, सरकारकडे ४८०३.०९ कोटींची मागणी २६ जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. प्रत्यक्षात फक्त ३४३५.७३ कोटींची मदत दिली गेली. उर्वरित १८७२.६२ कोटी दिलेले नाहीत. एकीकडे जन धन योजनेत प्रत्येकाचे बँक खाते आहे असा डांगोरा पिटणाऱ्या युती सरकारने शेतकऱ्यांची खाती सापडत नाहीत म्हणून ४६० कोटी रुपये दिलेले नाहीत, असेही मुंडे म्हणाले.१५०४ आत्महत्यांपैकी अमरावती विभागात ५८५, मराठवाड्यात ५३२, नाशिक विभागात १९९, नागपूर विभागात १६२, तर कोकणात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारीही सांगितली. आत्महत्येनंतर ४८ तासात जिल्हास्तरीय समितीसमोर प्रकरण ठेवून सानुग्रह अनुदान मंजूर करण्याची कारवाई करण्याच्या सूचना असताना अद्यात २९९ आत्महत्यांचा अहवालच आलेला नाही असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.च्दुष्काळी परिस्थिती तीव्र असताना राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवून विमा कंपनीला २५० कोटी रुपये प्रिमीयम भरला मात्र सरकारने स्वत:च्या हिश्श्याचे ६३० कोटी रुपयांसाठी अर्थसंकल्पात तरतूदच केलेली नव्हती. च्काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत आकस्मिकता निधीतून ही रक्कम देण्याची तरतूद केली गेली आहे. त्यामुळे ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना काहीही मदत मिळणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.