शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

‘हाजी अलीतील महिला प्रवेशाचा वाद कोर्टाबाहेर सोडवा’

By admin | Updated: November 18, 2015 03:00 IST

आता वातावरण असे आहे की, लोक प्रत्येक गोष्टीचा दुसरा अर्थ घेतात. हे युग असहनशिलतेचे आहे. जेव्हा एखादी गोष्ट धर्मावर येते, तेव्हा लोक अत्यंत संवदेनशील होतात, असे म्हणत

मुंबई: आता वातावरण असे आहे की, लोक प्रत्येक गोष्टीचा दुसरा अर्थ घेतात. हे युग असहनशिलतेचे आहे. जेव्हा एखादी गोष्ट धर्मावर येते, तेव्हा लोक अत्यंत संवदेनशील होतात, असे म्हणत उच्च न्यायालयाने हाजीअली दर्ग्यात महिलांना जाण्यास घातलेल्या बंदीचा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडवण्याची सूचना ट्रस्टला केली.२०१२ मध्ये हाजीअली दर्ग्यात जाण्यापासून महिलांना मनाई करण्यात आली. याविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या नूरजहाँ निआझ आणि झाकिया सोमण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते -डेरे यांच्या खंडपीठापुढे होती. अशी प्रकारच्या केसेसचा लोकांनी अन्य अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नये, असे याचिकाकर्तींचे वकील राजू मोरे यांनी म्हटल्यावर खंडपीठाने वरील निरीक्षण नोंदवले.धार्मिक बाबींमध्ये सहसा न्यायालय हस्तक्षेप करत नाही. खरंतर ट्रस्टने हा वाद न्यायालयाबाहेरच मिटवला पाहिजे, असे खंडपीठाने म्हणत या याचिकेमध्ये कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यास अनुकुलता न दाखवल्याने अ‍ॅड. मोरे यांनी हे प्रकरण धार्मिक नसून लिंगभेदाचे असल्याचे खंडपीठाला सांगितले.गेल्या सुनावणी वेळी ट्रस्टने पुरुष संतांच्या कबरीजवळ महिलांनी जाणे म्हणजे महापाप आहे, असे खंडपीठाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले होते. खंडपीठाने धर्मदाय आयुक्तांना ट्रस्ट डीड आणि योजनांची कागदपत्रे याचिकाकर्त्यांना देण्याचा आदेश देत या याचिकेवरील पुढील सुनावणी १५ डिसेंबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)