शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशासाठी पुरोगामी एकवटले

By admin | Updated: April 21, 2016 05:14 IST

हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून पुरोगामी संघटना आणि व्यक्तींनी एकत्र येत ‘हाजी अली सब के लिए’ फोरमची स्थापना केली आहे.

मुंबई : हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून पुरोगामी संघटना आणि व्यक्तींनी एकत्र येत ‘हाजी अली सब के लिए’ फोरमची स्थापना केली आहे. या फोरममध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही उडी घेतली आहे. २८ एप्रिलला हाजी अली दर्ग्याबाहेर धरणे आंदोलन केले जाणार आहे.हाजी अली दर्ग्यात २०११ सालापर्यंत महिलांना प्रवेश देण्यात येत होता. मात्र त्यानंतर ट्रस्टची कमिटी बदलली आणि महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यासाठी वेगवेगळी कारणे देण्यात आली. त्यामुळे महिलांना प्रवेश नाकारण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नसल्याचा युक्तिवाद फोरमचे जावेद आनंद यांनी केला आहे. आनंद म्हणाले की, कोणत्याही धर्माला किंवा जातीला फोरमचा विरोध नाही. चुकीच्या रूढी-परंपरांना विरोध आहे. माहिमच्या मगदूम शाह बाबा दर्गामध्ये महिलांना प्रवेश दिला जात असताना हाजी अलीला प्रवेश नाकारणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही दर्गाच्या विश्वस्तपदी एकच समिती असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.त्र्यंबकेश्वरच्या घटनेचा निषेधत्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या महिलांना झालेल्या अमानुष मारहाणीचा तृप्ती देसाई यांनी निषेध व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, पोलिसांच्या उपस्थितीत महिलांना बेदम मारहाण होत असेल, तर गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. शिवाय कोर्टाच्या आदेशानंतरही महिलांना प्रवेश नाकारणाऱ्या मंदिराच्या ट्रस्टी या स्वत: न्यायाधीश आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना सरकारी सेवेतून पायाउतार करण्याची मागणीही त्यांनी केली. गुरूवारी या घटनेचा समाचार घेण्यासाठी त्र्यंबकेश्वरला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.