शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

राजेवाडीत गारपीट, डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त

By admin | Updated: June 10, 2014 23:26 IST

पुरंदर तालुक्याच्या पूर्वभागात वादळी वार्‍यासह गारपिटीने डाळिंब, ऊस, पावटा, गुलछडी, मका यांसारख्या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

राजेवाडी : पुरंदर तालुक्याच्या पूर्वभागात वादळी वार्‍यासह गारपिटीने डाळिंब, ऊस, पावटा, गुलछडी, मका यांसारख्या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काल दि. ९ रोजी सायंकाळी ५ वाजता वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने सुरुवात केली. वादळी वार्‍यासह राजेवाडीतील नवीन रेल्वे स्टेशनजवळील रानमळा, तक्रारवाडी, वायकरवाडी, स्वामी समर्थ मठ परिसरात अर्धा तास गारपीट सुरू होती. या गारपिटीने संभाजी नामदेव जगताप, अमृता जगताप, हरिभाऊ जगताप, दत्तात्रय जगताप यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. आतापर्यंतच्या गारपिटीत वादळी वार्‍यामध्ये बागा वाचल्या होत्या. मात्र, कालच्या गारपिटीने सर्व डाळिंबांचे नुकसान झाले असून, पावटा, गुलछडी, कापरी यांसारख्या फुलांची शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. आतापर्यंत ऐन उन्हाळ्यात शेतकर्‍यांनी जिवाचा आटापिटा करून बागा लाखो रुपये खर्च करून वाढवल्या होत्या. मात्र, गारपिटीने प्रचंड नुकसान झाल्याचे लालूअण्णा जगताप यांनी सांगितले. या गारपिटीची माहिती मंडल अधिकारी सुरेश कुंभार यांना शेतकर्‍यांनी दिली. तालुका कृषी अधिकारी ढगे यांनी कृषी सहायक जगताप व गाव कामगार तलाठी यांना वस्तुस्थितिजन्य पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे, अशा सर्व नुकसानीचा पंचनामा करून तहसील कार्यालयात सादर करणार असल्याचे मंडलाधिकारी सुरेश कुंभार यांनी सांगितले. वादळी वार्‍याने विद्युत पुरवठा खंडित, २० खांब पडले वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने राजेवाडी महावितरण कार्यालयाअंतर्गत येणार्‍या मावडी येथील ११ के. व्ही. चे ३ खांब, सिमेंटचे ३ खांब, पिसर्वे येथील २ खांब, नायगाव व राजुरी येथील १० खांब पडले. रात्रभर युद्धपातळीवर कामे सुरू असून, लवकरात लवकर विद्युतपुरवठा सुरळीत करणार असल्याची माहिती राजेवाडी येथील महावितरणचे शाखा अभियंता अमोल जाधव यांनी दिली.