शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

राजेवाडीत गारपीट, डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त

By admin | Updated: June 10, 2014 23:26 IST

पुरंदर तालुक्याच्या पूर्वभागात वादळी वार्‍यासह गारपिटीने डाळिंब, ऊस, पावटा, गुलछडी, मका यांसारख्या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

राजेवाडी : पुरंदर तालुक्याच्या पूर्वभागात वादळी वार्‍यासह गारपिटीने डाळिंब, ऊस, पावटा, गुलछडी, मका यांसारख्या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काल दि. ९ रोजी सायंकाळी ५ वाजता वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने सुरुवात केली. वादळी वार्‍यासह राजेवाडीतील नवीन रेल्वे स्टेशनजवळील रानमळा, तक्रारवाडी, वायकरवाडी, स्वामी समर्थ मठ परिसरात अर्धा तास गारपीट सुरू होती. या गारपिटीने संभाजी नामदेव जगताप, अमृता जगताप, हरिभाऊ जगताप, दत्तात्रय जगताप यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. आतापर्यंतच्या गारपिटीत वादळी वार्‍यामध्ये बागा वाचल्या होत्या. मात्र, कालच्या गारपिटीने सर्व डाळिंबांचे नुकसान झाले असून, पावटा, गुलछडी, कापरी यांसारख्या फुलांची शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. आतापर्यंत ऐन उन्हाळ्यात शेतकर्‍यांनी जिवाचा आटापिटा करून बागा लाखो रुपये खर्च करून वाढवल्या होत्या. मात्र, गारपिटीने प्रचंड नुकसान झाल्याचे लालूअण्णा जगताप यांनी सांगितले. या गारपिटीची माहिती मंडल अधिकारी सुरेश कुंभार यांना शेतकर्‍यांनी दिली. तालुका कृषी अधिकारी ढगे यांनी कृषी सहायक जगताप व गाव कामगार तलाठी यांना वस्तुस्थितिजन्य पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे, अशा सर्व नुकसानीचा पंचनामा करून तहसील कार्यालयात सादर करणार असल्याचे मंडलाधिकारी सुरेश कुंभार यांनी सांगितले. वादळी वार्‍याने विद्युत पुरवठा खंडित, २० खांब पडले वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने राजेवाडी महावितरण कार्यालयाअंतर्गत येणार्‍या मावडी येथील ११ के. व्ही. चे ३ खांब, सिमेंटचे ३ खांब, पिसर्वे येथील २ खांब, नायगाव व राजुरी येथील १० खांब पडले. रात्रभर युद्धपातळीवर कामे सुरू असून, लवकरात लवकर विद्युतपुरवठा सुरळीत करणार असल्याची माहिती राजेवाडी येथील महावितरणचे शाखा अभियंता अमोल जाधव यांनी दिली.