शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
3
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
4
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
5
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
6
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
7
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
8
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
9
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
10
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
11
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
12
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
13
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
14
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
15
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
16
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
17
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
18
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
19
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
20
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

विक्रमगडमधील खाचरे पाण्यात

By admin | Updated: July 4, 2016 03:47 IST

सद्यस्थितीत पावसाचा जोरदार तडाखा सुरु असुन याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे.

राहुल वाडेकर,

विक्रमगड- सद्यस्थितीत पावसाचा जोरदार तडाखा सुरु असुन याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे. अतिपावसामुळे भातशेती धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तविण्यात येत आहे.जास्त पावसामुळे पेरण्यात आलेले भात,तसेच तयार होत असलेली भात रोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत.तर विक्रमगड आपत्कालीन कार्यालयास भेट दिली असता त्यांनी येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचे संकेत ठाणे कट्रोल विभागाकडून देण्यांत आल्याचे सांगितले.याबाबत तत्काळ सर्व शासकीय यंत्रणा, कार्यालयीन विभागास खबरदारीच्या सूचना देण्यांत आल्या असून नागरिकांना आवाहन करण्यांत आले की,खबरदारी घेऊन बाहेर जाणे शक्यतो टाळावे, प्रवास टाळावा व खबदारी घ्यावी, दरम्यान गेल्या तीन दिवसांत विक्रमगडमध्ये १८० मि.मि,तलवाडयात २५० मि.मि.व आतापर्यत विक्रमगड-५३९.५ तर तलवाडा-६५३ मि.मि.पावसाची नोंद करण्यांत आल्याचेही सांगण्यात आले. गेल्या वर्षी जून,जुलै कोरडेच गेले होते तर यंदा जूनच्या पंधरवडयापासून चालू झालेला पाउस थांबतच नसल्याने भातशेती धोक्यात आल्याने शेतकरी वर्ग चिंंतेत सापडला आहे.भात लावणीकरीता पावसाची आवश्यकता असते परंतु अति पावसामुळे भातरोपे कुजण्याचा संभव आहे.अजुनही अनेक शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत.तर अनेक भागात रोपे तयार होत आहे.त्यानंतर लावणीची कामे होतील.सद्यस्थित जरी परिस्थिती आटोक्यात असली तरी पावसाचे प्रमाण असेच राहील्यास शेतीस धोका निर्माण होउ शकतो असे जाणकार शेतकऱ्यांकडुन सांगीतले जात आहे. दरम्यान अतिपावसामुळे रस्त्यांची नुसती चाळणझाली आहे.तर नदी नाले ओसांडुून वाहत असल्याने गावातील-खेडयातील जनतेचा शहराशी दोन दोन दिवस संपर्क होत नाही.कामे रेंगाळली आहेत.वाहतुक मंदावलेली आहे. कमी उंची असलेल्या पुलावरुन पाणी वाहतांना दिसत आहे. दरम्यान सर्वत्र पावसाने थैमान घातलेले असून काहीकाळ पावसाने विश्रांती घ्यावयास हवी जेणेकरुन उर्वरीत शेतीची कामे योग्य पध्दतीत होऊन शेतीसाठी उपयुक्त ठरेल अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.यंदा पावसाचे प्रमाण गेल्यावर्शीपेक्षा चांगले आहे. त्यामुळे शेतीकामांना वेग आलेला आहे. शेतकरी शेतीच्या कामांत गुुंतलेले दिसत आहेत.तालुक्यात आतपर्यत विक्रमगड सेक्शनमध्ये ५४० मि.मि तर तलवाडा सेक्शनमध्ये ६५३ मि.मि पावसाची नोंद करण्यांत आली असुन पावसाचा जोर कायम आहे.- आयुब तांबोळी, निवासी नायब तहसिलदार