शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

विक्रमगडमधील खाचरे पाण्यात

By admin | Updated: July 4, 2016 03:47 IST

सद्यस्थितीत पावसाचा जोरदार तडाखा सुरु असुन याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे.

राहुल वाडेकर,

विक्रमगड- सद्यस्थितीत पावसाचा जोरदार तडाखा सुरु असुन याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे. अतिपावसामुळे भातशेती धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तविण्यात येत आहे.जास्त पावसामुळे पेरण्यात आलेले भात,तसेच तयार होत असलेली भात रोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत.तर विक्रमगड आपत्कालीन कार्यालयास भेट दिली असता त्यांनी येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचे संकेत ठाणे कट्रोल विभागाकडून देण्यांत आल्याचे सांगितले.याबाबत तत्काळ सर्व शासकीय यंत्रणा, कार्यालयीन विभागास खबरदारीच्या सूचना देण्यांत आल्या असून नागरिकांना आवाहन करण्यांत आले की,खबरदारी घेऊन बाहेर जाणे शक्यतो टाळावे, प्रवास टाळावा व खबदारी घ्यावी, दरम्यान गेल्या तीन दिवसांत विक्रमगडमध्ये १८० मि.मि,तलवाडयात २५० मि.मि.व आतापर्यत विक्रमगड-५३९.५ तर तलवाडा-६५३ मि.मि.पावसाची नोंद करण्यांत आल्याचेही सांगण्यात आले. गेल्या वर्षी जून,जुलै कोरडेच गेले होते तर यंदा जूनच्या पंधरवडयापासून चालू झालेला पाउस थांबतच नसल्याने भातशेती धोक्यात आल्याने शेतकरी वर्ग चिंंतेत सापडला आहे.भात लावणीकरीता पावसाची आवश्यकता असते परंतु अति पावसामुळे भातरोपे कुजण्याचा संभव आहे.अजुनही अनेक शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत.तर अनेक भागात रोपे तयार होत आहे.त्यानंतर लावणीची कामे होतील.सद्यस्थित जरी परिस्थिती आटोक्यात असली तरी पावसाचे प्रमाण असेच राहील्यास शेतीस धोका निर्माण होउ शकतो असे जाणकार शेतकऱ्यांकडुन सांगीतले जात आहे. दरम्यान अतिपावसामुळे रस्त्यांची नुसती चाळणझाली आहे.तर नदी नाले ओसांडुून वाहत असल्याने गावातील-खेडयातील जनतेचा शहराशी दोन दोन दिवस संपर्क होत नाही.कामे रेंगाळली आहेत.वाहतुक मंदावलेली आहे. कमी उंची असलेल्या पुलावरुन पाणी वाहतांना दिसत आहे. दरम्यान सर्वत्र पावसाने थैमान घातलेले असून काहीकाळ पावसाने विश्रांती घ्यावयास हवी जेणेकरुन उर्वरीत शेतीची कामे योग्य पध्दतीत होऊन शेतीसाठी उपयुक्त ठरेल अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.यंदा पावसाचे प्रमाण गेल्यावर्शीपेक्षा चांगले आहे. त्यामुळे शेतीकामांना वेग आलेला आहे. शेतकरी शेतीच्या कामांत गुुंतलेले दिसत आहेत.तालुक्यात आतपर्यत विक्रमगड सेक्शनमध्ये ५४० मि.मि तर तलवाडा सेक्शनमध्ये ६५३ मि.मि पावसाची नोंद करण्यांत आली असुन पावसाचा जोर कायम आहे.- आयुब तांबोळी, निवासी नायब तहसिलदार