शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबरावमहाराज यांचे पुण्यात स्मारक व्हावे

By admin | Updated: April 17, 2015 00:52 IST

साहित्य संमेलन घेण्यासाठी एकट्या गुलाबराव महाराजांचे साहित्य पुरेल, एवढी प्रचंड साहित्यनिर्मिती त्यांनी करून ठेवली.

पुणे : ‘साहित्य संमेलन घेण्यासाठी एकट्या गुलाबराव महाराजांचे साहित्य पुरेल, एवढी प्रचंड साहित्यनिर्मिती त्यांनी करून ठेवली. त्यांचा अधिकार मोठा होता. त्यांच्या विचारांवर चर्चा होणे आवश्यक आहे. पुण्यात महाराजांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.श्री संत गुलाबराव महाराज साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. मोरे बोलत होते. भय्यूजी महाराज, पंडित वसंतराव गाडगीळ, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, श्री संत गुलाबराव महाराज जीवनशताब्दी समितीचे कार्याध्यक्ष नारायण मोहोड, स्वागताध्यक्ष खासदार अनिल शिरोळे, डॉ. रंजना पत्की आदी उपस्थित होते.मोरे म्हणाले, ‘‘संत गुलाबराव महाराज हे स्वतंत्र प्रज्ञा असणारे तत्त्वचिंतक होते. ज्या काळात ते महाराष्ट्रात होऊन गेले, तो महाराष्ट्रातील वैचारिक मंथनाचा रसरशीत काळ असल्याचे म्हणता येईल. एकाच वेळी अनेक शास्त्रांना भिडण्याची क्षमता असणारे महाराज म्हणजे एखाद्या चमत्कारासारखेच होते, असे त्यांनी सांगितले.पत्की म्हणाल्या, ‘‘ज्यात अद्वैत वेदांत आहे, असे भक्तिशास्त्र गुलाबराव महाराजांनी मांडले. सेवाभाव, साधनाभाव, सख्यभाव असे भक्तीचे विविध भाव त्यांच्या साहित्यात दिसून येतात.’’ (प्रतिनिधी)भाव आणि गुण एकत्र आले, की भक्तीचे आकलन४भौतिकवाद आणि देववाद अशा दोघांच्या साहाय्याने मानवी अस्तित्वाचा खरा अर्थ उमगू शकतो. संत वाङ्मय या तत्त्वांचे दर्शन घडवते. ४भाव आणि गुण एकत्र आले की भक्तीचे आकलन होते. संत गुलाबरावमहाराजांचे साहित्य अशाच भक्तीचे दर्शन घडवीत असल्याचे भय्यूजी महाराज यांनी नमूद केले.