शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचे पाणी मुंबईला!

By admin | Updated: March 13, 2015 05:48 IST

दमण गंगा-पिंजाळ खोऱ्यातले ७५ टक्के पाणी महाराष्ट्राला मिळणार आहे, ते सगळे पाणी मुंबईला दिले जाईल. ज्यामुळे मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल

मुंबई : दमण गंगा-पिंजाळ खोऱ्यातले ७५ टक्के पाणी महाराष्ट्राला मिळणार आहे, ते सगळे पाणी मुंबईला दिले जाईल. ज्यामुळे मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल आणि वैतरणाचे पाणी गोदावरीत नेले जाईल, असे सांगून महाराष्ट्राच्या वाट्याचे थेंबभरही पाणी अन्य कोणाला दिले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी मुंबईसह राज्यातले अनेक विषय मांडले. दुष्काळ आणि अवकाळी पाऊस, गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे आणि सरकारपुढचे संकट संपलेले नाही, येत्या १३ आणि १४ तारखेला पुन्हा काही भागांत गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविलेली आहे. त्यामुळेच सरकारने पॅकेज घोषित केलेले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. तब्बल दोन तास केलेल्या भाषणात त्यांनी नागपूर अधिवेशनात केलेल्या भाषणाचीच  पुनर्रावृत्ती केली. ठिबक सिंचनाचे पैसे तीन वर्षे आघाडी सराकरने दिले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याची शासनाची मानसिकता आहे असे सांगून त्यासाठी तीन बैठका झाल्याचे ते म्हणाले. टोल नाक्याच्या करारात बाय बॅक नाही मुंबई -पुणे व मुंबई एन्ट्री पॉर्इंट या बड्या टोल नाक्यांचे करार करताना आघाडी सरकारने बाय बॅकचा मुद्दाच करार करतेवेळी टाकला नाही. त्यामुळे हे करार रद्द करता येत नाहीत, तरीही आम्ही वेळ पडल्यास कोर्टात जाऊ, पण टोलमुक्त करण्याची आमची भूमिका कायम ठेवू असेही मुख्यमंत्री म्हणाले. टोल करार करताना राज्याला १५ टक्के वाहनांवर पासेस देण्याचा अधिकार आहे. प्रत्यक्षात ही सूट घेणारी एकच टक्का वाहने आहेत. उर्वरित १४ टक्के सूट थेट ठेकेदारांना करार करुन दिली गेल्याचा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला.(विशेष प्रतिनिधी)