शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

गुजरातचा डोळा 16 हजार कोटींवर?

By admin | Updated: November 29, 2014 01:50 IST

मुंबईतील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय गुजरातमध्ये हलविण्याच्या भाजपाच्या खासदाराच्या मागणीवरून आता गदारोळ सुरू झाला आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्यालय : भाजपा खासदाराची मागणी
मुंबई : मुंबईतील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय गुजरातमध्ये हलविण्याच्या भाजपाच्या खासदाराच्या मागणीवरून आता गदारोळ सुरू झाला आहे. सध्या पश्चिम रेल्वेला उपनगरीय लोकल सेवा, मालवाहतूक व लांब पल्ल्याच्या वाहतूकसेवेतून वर्षाला 16 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. यामध्येही मालवाहतूक व लांब पल्ल्याची सर्वाधिक वाहतूक गुजरातमधूनच होत असल्याने थेट हाच दावा न करता वेगळे कारण पुढे करीत असल्याची चर्चा रंगली आहे. 
महत्त्वाची बाब म्हणजे उपनगरीय लोकल सेवेतून कमी उत्पन्न मिळत असून, मालवाहतूक आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांतून सर्वाधिक उत्पन्न पश्चिम रेल्वेला मिळते. पश्चिम रेल्वेमार्गावर गुजरात ते मुंबई अशा प्रवासासाठी एकूण 100 ट्रेन धावतात. तर गर्दीच्या काळातही मागणी पाहता गुजरातसाठी विशेष ट्रेन सोडून पश्चिम रेल्वेकडून उत्पन्न मिळविले जाते. यातून उत्पन्न मिळवत असतानाच त्यापेक्षाही मालवाहतुकीतून उलाढाल करीत पश्चिम रेल्वे सर्वाधिक उत्पन्न मिळवत असते. गुजरातमध्ये मुंद्रा, कांडलासह अन्य बंदरे मोठय़ा प्रमाणात असून, येथून पश्चिम रेल्वेमार्गावर जास्त मालवाहतूक होते. मालवाहतुकीत गुजरातचा सर्वात जास्त वाटा असून, अन्य विभागाकडून कमी उत्पन्न मिळत असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले. गुजरातमधून होणा:या मालवाहतुकीतून मिळणारे उत्पन्न पाहता पश्चिम रेल्वेने अहमदाबादसाठी अनेक सोयीसुविधांनी सुसज्ज अशी खास पार्सल ट्रेनही काही महिन्यांपूर्वी सुरू केली आहे. कोलकाता, गुजरातमध्ये सध्या ब:याच उद्योगधंद्यांना चालना मिळत असून, येथील व्यापार मोठय़ा प्रमाणात वाढतच आहे. हे पाहता उत्पन्न वाढीसाठी गुजरात, कोलकातासाठी खास पार्सल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदाबाद ते हावडा आणि वापी ते न्यू गुवाहाटी अशी पहिली पार्सल एक्स्प्रेस ट्रेन पश्चिम रेल्वेकडून सुरू करण्यात आली. 468 टन सामान वाहून नेणारी ही ट्रेन 60 तासांत आपली सेवा चोख बजावत आहे. ही आर्थिक उलाढाल पाहताच पश्चिम रेल्वेचे मुख्यालय अहमदाबादला हलविण्याचा विचार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
 
महाराष्ट्राचे खासदार गप्प का ?
च्पश्चिम रेल्वेचे कार्यालय अहमदाबाद येथे हलविण्याच्या भाजपाच्या खासदाराने केलेल्या मागणीस प्रवासी संघटनांनी विरोध केला. मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी विरोध करीत यासंदर्भात महाराष्ट्र आणि खासकरून मुंबईतील खासदार गप्प का, असा सवाल केला़
च्केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने या संधीचा गैरफायदा घेऊन मुंबईतले उद्योगधंदे आणि रेल्वे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो आम्ही हाणून पाडू. त्याचप्रमाणो रेल्वे अधिकारी आंदोलन समितीचे अध्यक्ष शैलेंद्र कांबळे यांनीही भाजपाच्या या मागणीचा विरोध करीत 150 वर्षाचा इतिहास असलेल्या ‘परे’ला पूर्णपणो बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. 
च्कर्मचारी व प्रवासी अधिक असतानाही असा विचार करणो चुकीचे असून, मुंबईचे वैभवच उद्ध्वस्त करण्याचा हा डाव 
आम्ही हाणून पाडू, असे सांगितले. 
 
वाह्यात मागण्या करू नका
देशात आपले सरकार आले म्हणून वाह्यात मागण्या करू नका. पश्चिम रेल्वे व मुंबईला असा एक इतिहास आहे, परंपरा आहे ते ओळखल पाहिजे. शिवसेना केवळ भावनिकदृष्टय़ा हा विषय पाहात नाही. मुंबईत मुख्यालय असल्याने अशी काय अडचण होते, ते आधी स्पष्ट करा. मुंबईत टर्मिनस आहे, त्यामुळे इथे मुख्यालय असणो नैसर्गिक व स्वाभाविक बाब आहे. त्यामुळे भलत्यासलत्या मागण्या करू नका.- खा. अरविंद सावंत, शिवसेना प्रवक्ता