शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

गुजरातचे उद्योग राज्यात आले

By admin | Updated: March 1, 2017 06:02 IST

महाराष्ट्र हे उद्योगांसाठी देशातील क्रमांक एकचे राज्य असल्याचा पुनरुच्चार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला

मुंबई : महाराष्ट्र हे उद्योगांसाठी देशातील क्रमांक एकचे राज्य असल्याचा पुनरुच्चार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. ‘लोकमत’ एक्सलन्स अ‍ॅवॉडर््स सोहळ्यात ते बोलत होते. हा दिमाखदार सोहळा नुकताच वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडला. विविध क्षेत्रांतील दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना उद्योग गुजरातमध्ये जातात असे वाटते का, असा प्रश्न विचारल्यावर देसाई यांनी हे स्पष्टपणे नाकारले. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून उद्योग गुजरातमध्ये जात होते, मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. ते पुढे म्हणाले, उलट गुजरातमधील उद्योग मोठ्या प्रमाणात आता महाराष्ट्रात येत आहेत. उद्योग-व्यवसाय क्षेत्रात आता बरेच बदल झाले आहेत. परदेशी गुंतवणूकही वाढत आहे. देशात होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक आपल्या राज्यात होत आहे. पुढच्या काही वर्षांत चित्र अजून बदलेल, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. (प्रतिनिधी)>उद्योगांसाठी पोषक वातावरण - मुनगंटीवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताचे एक वेगळे चित्र निर्माण झालेले आहे. उद्योग क्षेत्रासाठी आपल्याकडे पोषक, चांगले वातावरण आहे. देशात नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करत आहे. उद्योग क्षेत्राला या पोषक परिस्थितीचा फायदा होतो, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ‘लोकमत’ एक्सलन्स अ‍ॅवॉडर््स सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मुनगंटीवार यांनी भविष्यात राज्यातील उद्योग क्षेत्र अधिक प्रगत होईल, असा विश्वास व्यक्त केला. जागतिक क्रमवारीत १९५ देशांमध्ये भारत नवव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर आला, ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. सन्मानित केलेल्या उद्योजकांचे अभिनंदन करत, ते म्हणाले, तुम्ही अधिकाधिक काम करा, तुमच्या व्यवसायाची वृद्धी झाली म्हणजे देशाचीही वृद्धी होईल, असे म्हणत त्यांनी सर्व पुरस्कारप्राप्त व्यावसायिक, उद्योजकांचे अभिनंदन केले. >आम्ही कोणालाही जेव्हा देशात गुंतवणूक का करता, असे विचारतो तेव्हा सरकार चांगले आहे, असे उत्तर मिळते. अन्य देशांमध्ये लोकसंख्या स्थिर होत चालली आहे. तुलनेत आपल्याकडे लोकसंख्या वाढत आहे. पुनर्जन्माची संकल्पनाही आपल्याकडेच आहे. त्यामुळे पुनर्जन्म व्हायचा झाल्यास तो भारतात होईल, म्हणून आपल्याकडे गुंतवणुकीसाठी ओढा वाढत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगताच, उपस्थितांत खसखस पिकली. >‘लोकमत’ एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड्स ‘लोकमत’द्वारे आयोजित या दिमाखदार एक्सलन्स अ‍ॅवॉडर््स सोहळ्यात व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील ५९ दिग्गजांचा गौरव करण्यात आला. ‘लोकमत’ला शाबासकीउद्योग, व्यवसाय क्षेत्रात यशस्वी उद्योजकांनी दिलेल्या योगदानाला ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे. यामुळे ‘लोकमत’ समूहाला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या वेळी शाबासकी दिली.