शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातप्रमाणो महाराष्ट्रातही हवी मतदानाची सक्ती

By admin | Updated: November 12, 2014 00:05 IST

गुजरात राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान करण्याची सक्ती केलेली असून जे मतदान करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

पुणो : गुजरात राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान करण्याची सक्ती केलेली असून जे मतदान करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. गुजरात राज्य सरकारच्या या निर्णयाचे पुण्यातील तरुणांनी स्वागत गेले असून, महाराष्ट्रातही अशी सक्ती करणो गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. सक्तीमुळे मतदानाचा टक्का तर वाढेलच; पण देशाच्या विकासात प्रत्येक जण आपला सहभाग यानिमित्ताने नोंदवेल, असे मत काहींनी व्यक्त केले आहे.
महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान सक्तीचे करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. त्यानिमित्ताने शहरातील तरुणांना या निर्णयाबद्दल काय वाटते, याची विचारणा केली असता बहुतांशी तरुणांनी हा निर्णय योग्य असून, तसे महाराष्ट्रातही करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
 
गुजरात सरकारने केलेली मतदानाची सक्ती योग्यच आहे. अशी सक्ती देशभर असायला हवी. लोकशाहीला बळकट करणारा हा निर्णय आहे. उमेदवार लायकीचा नसेल, तर नागरिकांनी किमान नोटा हा पर्याय तरी वापरला पाहिजे. 
- दिगंबर गायकवाड 
 
मतदान सक्तीचे केले हे बरोबर आहे. ती आजची आवश्यकता आहे. सक्तीशिवाय मतदार सुधारणार नाहीत. 
- गौतम सूर्यवंशी 
 
मतदान सक्तीमुळे मतदानाचा टक्का वाढेल; पण लोकांनी स्वेच्छेने मतदानासाठी पुढे येणो अधिक गरजेचे आहे. नागरिक आपल्या हक्काबाबत जेवढे जागरूक आहेत, तेवढे ते आपल्या कर्तव्याबाबतही जागरूक असायला हवेत.
- संजय तांबट 
मतदान सक्तीचा निर्णय योग्य आहे. त्याचे मी स्वागत करतो. हा निर्णय सर्व राज्यांमध्ये लागू करावा. काही अपवाद वगळता सर्वाना मतदान सक्तीचे करणो गरजेचेच आहे. यामुळे मतदानाचा टक्का वाढेल.
- अमोल बोरसे 
 
जनजागृतीवर हवा भर
4मतदारांची उदासीनता आणि पैसेवाटप यांमुळे मतदानाची सक्ती करणो योग्य नाही. याऐवजी मतदारांमध्ये जागृती करण्यावर भर देणो गरजेचे आहे, असे मत माधव माळेगावे याने व्यक्त केले.
लोकप्रतिनिधींनाही हजेरी करावी सक्तीची
4मतदानाची सक्ती करणो योग्य आहे; पण त्याबरोबर लोकप्रतिनिधींनाही विधिमंडळात अधिवेशनाच्या काळात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक बैठकीत हजेरी लावणो सक्तीचे करण्यात यावे. लोकांनी निवडून द्यायचे आणि लोकप्रतिनिधींनी बैठकांना गैरहजर राहायचे हे चुकीचे आहे, असे मत अमोल गुंजाळ याने व्यक्त केले.