शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

सोने खरेदीविना यंदाचा गुढीपाडवा

By admin | Updated: April 8, 2016 03:30 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर लावल्यामुळे गेल्या ३७ दिवसांपासून सुरू असलेला सराफा व्यापाऱ्यांचा संप गुढीपाडव्यालाही सुरूच राहणार असल्याने साडेतीन

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर लावल्यामुळे गेल्या ३७ दिवसांपासून सुरू असलेला सराफा व्यापाऱ्यांचा संप गुढीपाडव्यालाही सुरूच राहणार असल्याने साडेतीन मुहूर्तांपैकी या मुहूर्तावर ग्राहकांना सोने खरेदीपासून वंचित राहावे लागणार आहे. संपामुळे व्यापाऱ्यांचे तर नुकसान होत आहेच; पण सरकारचा महसूल बुडतानाच ग्राहकांचाही हिरमोड होत आहे. मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सराफा बाजारात रोज सुमारे २५० कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मुहूर्तावर एकट्या मुंबईतून यंदा ५०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता होती. गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति तोळा २५ हजार ९५६ रुपये होेता. तो अक्षय्य तृतीय्येला २४ हजारांपर्यंत जाण्याच्या अपेक्षेमुळे पाडव्याला सोने खरेदीत निरुत्साह दिसला होता. मात्र तरीही मुंबईतील सराफा बाजाराने ३५० कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात होणारी वाढ पाहता अक्षय्य तृतीय्येला सोन्याचा दर प्रति तोळा ३० हजारांहून अधिक होण्याची शक्यता होती. त्यामुळे गुढीपाडव्याला अधिकाधिक खरेदी होण्याची शक्यता होती. सरकारने लादलेला अबकारी कर गुरुवारी रात्रीपर्यंत मागे घेण्याची शक्यता धूसर असल्याने शुक्रवारी गुढीपाडव्याच्या दिवशी संप कायम ठेवण्याचा निश्चय संघटनेने केला आहे.> सुटीतही दुकाने सुरू ठेवली होती...मुंबई पालिकेच्या नियमानुसार अनेक ठिकाणी सोमवारी आणि रविवारी सराफांची दुकाने बंद असतात. मात्र याआधी इतिहासात रविवारी व सोमवारी गुढीपाडव्यानिमित्त दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. मुहूर्ताचा दिवस असल्याने त्या दिवशी खरेदी-विक्रीचे व्यवहारही झाले होते. मात्र यंदा प्रथमच सुट्टीचा दिवस नसतानाही केवळ संपामुळे दुकाने बंद ठेवण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे.खरेदी-विक्री व्यवहार बंद असला, तरी पाडव्यानिमित्त होणारी पूजा दुकानातच करणार असल्याचे जैन यांनी सांगितले. अनेक दुकानदारांना दिवाळीला चोपडा पूजन करता येत नाही. असे दुकानदार गुढीपाडव्याला चोपडा पूजन करतात. दुकाने बाहेरून बंद असली, तरी पूजेसाठी आतून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई, दिल्ली, कोलकात्यासह प्रमुख शहरांतील सराफा प्रतिष्ठाने बंद असली तरीही तामिळनाडूतील सराफांनी संप मागे घेतल्याने तेथील प्रतिष्ठाने खुली आहेत. सराफांच्या मागणीचा विचार करण्यासाठी सरकारने समिती गठित केली असून, ६० दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे.