शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

गुढीपाडव्यावर दु:खाचे सावट, गावकरी शोकाकुल!

By admin | Updated: March 22, 2015 01:37 IST

शहीद झालेल्या सूरज मोहिते यांचे मूळगाव असणाऱ्या सिद्धनाथवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी एकही गुढी न उभारता आबा व मोहितेंना आदरांजली वाहिली.

तासगाव/ वाई : ज्या गावाची ओळख आर. आर. पाटील तथा आबांमुळे राज्यभर झाली, त्या ‘अंजनी’त आणि दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या सूरज मोहिते यांचे मूळगाव असणाऱ्या सिद्धनाथवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी एकही गुढी न उभारता आबा व मोहितेंना आदरांजली वाहिली.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे १६ फेब्रुवारीला निधन झाले. यातून हे गाव अद्याप सावरलेले नाही. येथील घराघरात वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन आबांना गृहीत धरूनच केले जायचे, आबाही प्रत्येक कुटुंबांत रमायचे, पण आता आबाच नाहीत, त्यामुळे वर्षभर सणवार, उत्सव, कार्यक्रम करायचे नाहीत, असे जणू गावाने ठरवूनच टाकले आहे. गुढी न उभारता ग्रामस्थांनी आबांना आदरांजली वाहिली. (वार्ताहर)सिद्धनाथवाडीवर दुखवटाच्जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या चौकीवर शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवान सूरज मोहिते यांना वीरमरण आले होते. जवान मोहिते यांचे पार्थिव विशेष विमानाने रविवारी पुण्यात आणण्यात येणार आहे़ तेथून लष्करी वाहनातून पार्थिव त्यांच्या मूळ गावी गणेशवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे आणून नंतर ते सिद्धनाथवाडीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे़ च्सध्या वाई शहरात शोकाकूल वातावरण आहे. सिद्धनाथवाडी व गणेशवाडी (सरताळे) येथे पाडव्यादिवशी गुढी न उभारून दुखवटा पाळण्यात आला़ वाईशहर व परिसरातील गुढीपाडव्यानिमित्त घेण्यात येणारे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले़ तसेच वाईतील नागरिकांनी उस्फूर्तपणे बंदही पाळला.नाशिक : सोसायटीचे साडेसहा लाख रुपये कर्ज काढले, तीन लाखांचा इतर खर्च करीत शिमला मिरचीसाठी साडेनऊ लाख अडकविले; पण निसर्गाने मांडलेल्या खेळाने लाखाचे बारा हजार झाले...एका तासात सारी स्वप्ने अक्षरश: धुऊन नेली, सांगा साहेब कर्ज क सं फेडायचं, तोंडातला घास हिरावून गेल्याने काहीही गोड लागत नाही... अख्खी बाग आडवी झाली.. तुन्हीच सांगा, कसा साजरा करू आम्ही पाडवा... गारपीटग्रस्त निफाड तालुक्यातील बळीराजाची ही व्यथा आहे. येथे ना गुढी उभारली गेली. ना पाडव्याचा गोडवा होता. गारपीट व अवकाळीनं उद्ध्वस्त झालेल्या निफाड तालुक्यातील उगाव, वनसगाव, सारोळे या गावांची शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी पाहणी करत नुकसानीची माहिती जाणून घेत शेतकऱ्यांचे सांत्वन केले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मुखातून शब्दही फुटत नव्हते. (प्रतिनिधी)केंद्रीय कृषिमंत्र्यांचा नाशिक दौरासाहेब, वर्षभर जीव लाऊन द्राक्षबागा जोपासल्या. परंतु गारपिटीने सर्व पुरतं बिघडविलं, अशी हतबलता द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केली.