शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यावर दु:खाचे सावट, गावकरी शोकाकुल!

By admin | Updated: March 22, 2015 01:37 IST

शहीद झालेल्या सूरज मोहिते यांचे मूळगाव असणाऱ्या सिद्धनाथवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी एकही गुढी न उभारता आबा व मोहितेंना आदरांजली वाहिली.

तासगाव/ वाई : ज्या गावाची ओळख आर. आर. पाटील तथा आबांमुळे राज्यभर झाली, त्या ‘अंजनी’त आणि दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या सूरज मोहिते यांचे मूळगाव असणाऱ्या सिद्धनाथवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी एकही गुढी न उभारता आबा व मोहितेंना आदरांजली वाहिली.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे १६ फेब्रुवारीला निधन झाले. यातून हे गाव अद्याप सावरलेले नाही. येथील घराघरात वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन आबांना गृहीत धरूनच केले जायचे, आबाही प्रत्येक कुटुंबांत रमायचे, पण आता आबाच नाहीत, त्यामुळे वर्षभर सणवार, उत्सव, कार्यक्रम करायचे नाहीत, असे जणू गावाने ठरवूनच टाकले आहे. गुढी न उभारता ग्रामस्थांनी आबांना आदरांजली वाहिली. (वार्ताहर)सिद्धनाथवाडीवर दुखवटाच्जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या चौकीवर शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवान सूरज मोहिते यांना वीरमरण आले होते. जवान मोहिते यांचे पार्थिव विशेष विमानाने रविवारी पुण्यात आणण्यात येणार आहे़ तेथून लष्करी वाहनातून पार्थिव त्यांच्या मूळ गावी गणेशवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे आणून नंतर ते सिद्धनाथवाडीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे़ च्सध्या वाई शहरात शोकाकूल वातावरण आहे. सिद्धनाथवाडी व गणेशवाडी (सरताळे) येथे पाडव्यादिवशी गुढी न उभारून दुखवटा पाळण्यात आला़ वाईशहर व परिसरातील गुढीपाडव्यानिमित्त घेण्यात येणारे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले़ तसेच वाईतील नागरिकांनी उस्फूर्तपणे बंदही पाळला.नाशिक : सोसायटीचे साडेसहा लाख रुपये कर्ज काढले, तीन लाखांचा इतर खर्च करीत शिमला मिरचीसाठी साडेनऊ लाख अडकविले; पण निसर्गाने मांडलेल्या खेळाने लाखाचे बारा हजार झाले...एका तासात सारी स्वप्ने अक्षरश: धुऊन नेली, सांगा साहेब कर्ज क सं फेडायचं, तोंडातला घास हिरावून गेल्याने काहीही गोड लागत नाही... अख्खी बाग आडवी झाली.. तुन्हीच सांगा, कसा साजरा करू आम्ही पाडवा... गारपीटग्रस्त निफाड तालुक्यातील बळीराजाची ही व्यथा आहे. येथे ना गुढी उभारली गेली. ना पाडव्याचा गोडवा होता. गारपीट व अवकाळीनं उद्ध्वस्त झालेल्या निफाड तालुक्यातील उगाव, वनसगाव, सारोळे या गावांची शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी पाहणी करत नुकसानीची माहिती जाणून घेत शेतकऱ्यांचे सांत्वन केले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मुखातून शब्दही फुटत नव्हते. (प्रतिनिधी)केंद्रीय कृषिमंत्र्यांचा नाशिक दौरासाहेब, वर्षभर जीव लाऊन द्राक्षबागा जोपासल्या. परंतु गारपिटीने सर्व पुरतं बिघडविलं, अशी हतबलता द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केली.