शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

काश्मीर खोऱ्याचा मराठी पालक

By admin | Updated: December 30, 2014 01:17 IST

मी १९९७पासून काश्मीरमध्ये अनाथ मुलांच्या संगोपनाचे काम करीत आहे. अतिरेक्यांनी १९ वेळा माझे अपहरण केले.

बाळासाहेब काकडे - श्रीगोंदामी १९९७पासून काश्मीरमध्ये अनाथ मुलांच्या संगोपनाचे काम करीत आहे. अतिरेक्यांनी १९ वेळा माझे अपहरण केले. माझ्या डोक्याला एके ४७ बंदूक लावली. त्यांच्या अग्निपरीक्षेत मी पास झालो. ‘इसको मारनेवाला असली मुस्लीम नहीं हो सकता, ये तो खुदा का बंदा है.’ आता माझे १७४ अनाथ मुलींचे कुटुंब झाले आहे. मुलींच्या शिक्षणाचे काम करताना मला मरण आले तर तो माझ्या कामाचा गौरव असेल, आदिक कदम ‘लोकमत’शी बोलताना भावुक झाला होता. आदिक कदम हा श्रीगोंद्याचा सुपुत्र.पुण्याला कॉलेजमध्ये असताना वर्गातील काश्मिरी मुस्लीम व पंडित मुलांमध्ये वाद व्हायचे. त्याचे कारण सरांना विचारले असता सरांनी परिस्थिती सांगितली आणि काश्मीरला जाऊन सर्व समजून घेण्याचे आव्हानच दिले. त्यानुसार आदिकने काश्मीर गाठले. दोन महिने तो तेथे राहिला. त्यानंतर काश्मीरला येणे-जाणे सुरूच ठेवले.नातेवाईक किंवा कुटुंबीयांचा मला फारसा पाठिंबा नव्हता. मात्र आई माझ्यामागे उभी राहिली आणि विशेष म्हणजे मित्रांनी मला बळ दिले, असे आदिकने सांगितले.१९९७ ते २००२पर्यंत काश्मीरच्या मातीतील समस्यांचा आदिकने अभ्यास केला. यादरम्यान आदिकचे एकदा दोनदा नव्हेतर १९ वेळा अतिरेक्यांनी अपहरण केले. एकदा गोळीबारत १४ वर्षांचा मुलगा मारला गेला. त्याचे रक्त आदिकच्या गाडीच्या काचेवर पडले. आदिक खूप व्यथित झाला आणि त्याने काश्मीरमध्येच काम करण्याचा निर्णय घेतला. ‘बॉर्डरलेस’ संस्थेच्या माध्यमातून अतिरेक्यांच्या हल्ल्यात अथवा गोळीबारात ठार झालेल्यांच्या तसेच मरण पावलेल्या अतिरेक्यांच्या मुलींसाठी आदिकने वसतिगृह सुरू केले आहे. सुरुवातीला येथे अवघ्या १७ मुली होत्या. १२ वर्षांच्या प्रवासात वसतिगृहात १७४ मुलींचे मोठे कुटुंब झाले आहे. आता हाच माझा संसार असल्याचे आदिकचे म्हणणे आहे.१७४मधील एका मुस्लीम मुलीच्या लग्नात तर आदिकला कन्यादान करण्याचे भाग्य मिळाले. आज तीच मुलगी एका गावची सरपंच झाली आहे. एक मुलगी शिकली तर कुटुंब संस्कारमय करू शकते आणि मुली शिकल्या तर समाजाची प्रगती होते, याच भावनेतून त्याने स्त्री शिक्षणाचे कार्य हाती घेतले आहे. विशेष म्हणझे आदिकला शासनाच्या पैशांची गरज भासली नाही; अथवा त्यानेही मागितली नाही. बिझनेस सेंटरमहिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक बिझनेस सेंटर उभारले असून, फेबु्रवारीत ते सुरू होणार आहे. श्रीगोंद्यातील महामानव बाबा आमटे वसतिगृह माझे श्रीगोंद्यातील घर राहणार असल्याचे आदिक सांगतो. अतिरेक्यांनी १९ वेळा माझे अपहरण केले. डोक्याला एके ४७ लावली. त्यांच्या अग्निपरीक्षेत मी पास झालो. ‘ये तो खुदाका बंदा है!’ अशी प्रशस्ती मिळाली.