शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने तिजोरी उघडली
3
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
4
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
5
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
6
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
7
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
8
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
9
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
10
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
11
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
12
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
13
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
14
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
16
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
17
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
18
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
19
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
20
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर

पाच महसुली जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भाजपाकडे

By admin | Updated: December 27, 2014 04:57 IST

राज्यातल्या सहापैकी पाच महसुली जिल्ह्यांसह एकूण २४ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भारतीय जनता पार्टीने स्वत:कडे ठेवले असून, शिवसेनेला मुंबई शहरासह १२ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले

अतुल कुलकर्णी, मुंबईराज्यातल्या सहापैकी पाच महसुली जिल्ह्यांसह एकूण २४ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भारतीय जनता पार्टीने स्वत:कडे ठेवले असून, शिवसेनेला मुंबई शहरासह १२ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. मंत्रिपदाबरोबर आता पालकमंत्रिपदांतही शिवसेनेला बरोबरीचा नव्हे, तर अर्धाच वाटा मिळाला.उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या पदरी फक्त एकेक पालकमंत्रिपद आलेले आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे वर्चस्व असताना तेथील चार जिल्हे भाजपाने स्वत:कडे ठेवले आहेत. कोकणातील रायगड आणि पालघर हे दोन जिल्हे भाजपाने घेतले. भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून ही व्यूहरचना भाजपाने आखली आहे. शिवाय पाच मंत्र्यांना दोन-दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.तुल्यबळ नेत्यांना त्यांचे स्वत:चे जिल्हे देऊ करण्यात आले आहेत. त्यात एकनाथ शिंदे (ठाणे), एकनाथ खडसे (जळगाव), गिरीश बापट (पुणे), रणजीत पाटील (अकोला), चंद्रपूर (सुधीर मुनगंटीवार), चंद्रकांत पाटील (कोल्हापूर) आणि पंकजा मुंडे (बीड) यांचा समावेश आहे. सेनेचे कोकणातील लढवय्ये नेते रामदास कदम यांना औरंगाबादचे पालकमंत्रिपद दिले आहे. रायगड जिल्ह्यात भाजपाचा एकच आमदार असताना तेथे प्रकाश मेहतांना पालकमंत्रिपद दिले आहे. बीड आणि लातूरचे पालकमंत्रिपद पंकजा मुंडेंना दिले आहे. अमित देशमुख यांचे आणि मुंडे परिवाराचे सख्य सर्वश्रुत आहे.११ आमदार देणाऱ्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद चंद्रशेखर बावनकुळे यांना देऊन हा जिल्हा नितीन गडकरींच्या वर्चस्वाखाली ठेवण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नजीकचे म्हणून ओळखले जाणाऱ्या रणजीत पाटील यांना अकोला आणि वाशिमचे पालकमंत्रिपद दिले गेले आहे. प्रवीण पोटे यांना अमरावतीचे पालकमंत्रिपद देऊन गडकरी गटाचे आ. सुनील देशमुख यांची अडचण करण्याचा प्रयत्न झाला आहे. देशमुख-पोटे यांचे फारसे सख्य नाही. यवतमाळमध्ये सातपैकी पाच भाजपाचे आमदार असताना शिवसेनेचे संजय राठोड यांना पालकमंत्री करण्यात आले आहे. या पाचही आमदारांनी रणजीत पाटील यांची मागणी केली होती. तेथे शिवसेनेची सरशी झाली आहे. साताऱ्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे विजय शिवतारे यांना दिले गेले आहे. त्यांचे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यातील भांडण सर्वश्रूत आहे. तर नाशिकचे पालकमंत्रीपद जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना देऊ केले आहे. शिवाय महाजन यांच्याकडे महाकुंभ मेळाव्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. महाजन यांचे आणि एकनाथ खडसे यांचे संबंध फारसे मधूर नाहीत. त्या पार्श्वभूमीवर महाजनांवर टाकलेली मोठी जबाबदारी चर्चेचा विषय आहे-------------जिल्हा आणि पालकमंत्री असेपुणे- गिरीश बापट, मुंबई उपनगर-विनोद तावडे, मुंबई शहर-सुभाष देसाई, पालघर-विष्णु सावरा, बीड आणि लातुर- पंकजा मुंडे, जळगाव व बुलढाणा- एकनाथ खडसे, अहमदनगर- राम शिंदे, सिंधुदुर्ग- दिपक केसरकर, रत्नागिरी- रविंद्र वायकर, धुळे - दादा भुसे, सातारा- विजय शिवतारे, यवतमाळ- संजय राठोड, सोलापुर- विजय देशमुख, अमरावती -प्रविण पोटे, परभणी व नांदेड- दिवाकर रावते, भंडारा, उस्मानाबाद- दिपक सावंत, नागपुर- चंद्रकात बावनकुळे, वर्धा, चंद्रपुर- सुधीर मुनगंटीवार, वाशिम, अकोला- रणजीत पाटील, हिंगोली - दिलीप कांबळे, जालना - बबनराव लोणीकर, औरंगाबाद -रामदास कदम, गडचिरोली -राजे अंम्ब्रीशराव आत्राम, गोंदिया -राजकुमार बडोले, ठाणे - एकनाथ शिंदे, नाशिक व नंदूरबार - गिरीष महाजन, सांगली व कोल्हापूर - चंद्रकांत पाटील, रायगड - प्रकाश मेहता