शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पालकमंत्र्यांची मजबुतीची खेळी

By admin | Updated: September 21, 2016 03:53 IST

शिवसेनेचा ठाण्यातील बालेकिल्ला अभेद्य करतानाच आपला विधानसभा मतदारसंघही मजबूत करण्यात शिंदे यशस्वी झाले आहेत.

ठाणे : शिवसेनेत मंगळवारी प्रवेश करणाऱ्या चार नगरसेवकांमधील तीन नगरसेवक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी मतदारसंघातील असल्याने शिवसेनेचा ठाण्यातील बालेकिल्ला अभेद्य करतानाच आपला विधानसभा मतदारसंघही मजबूत करण्यात शिंदे यशस्वी झाले आहेत.ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षातील प्रस्थपित नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेत प्रवेश केलेल्या चारपैकी एक नगरसेवक हा ठाणे शहर मतदार संघातील आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या चुली मांडून आपापली ताकद अजमावून पाहिली होती. त्यावेळी दोन्ही पक्षात इनकमिंगचा सिलसिला पाहण्यास मिळाला होता. आता ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाणे शहरातील फेऱ्या वाढल्या आहेत. ठाण्यात कल्याण-डोंबिवलीच्या तुलनेत भाजपाची ताकद कमी आहे. मात्र अन्य पक्षातील मातब्बर नगरसेवक गळाला लावून भाजपा वाढल्याचे चित्र निर्माण करण्याचे प्रयत्न त्या पक्षाने सुरु केले आहेत. खासदार कपिल पाटील आणि आमदार संजय केळकर यांनी त्याकरिता प्रयत्न सुरु केले आहेत. वागळे इस्टेटमध्ये अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या अपक्ष नगरसेवक स्वाती देशमुख यांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर, काँग्रेसच्याच नगरसेविका मेघना हंडोरे व त्यांचे पती यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी भाजपाच्या फोडाफोडीला शह देताना कोपरी, वागळे इस्टेट आणि नौपाडा प्रभागातील चार नगरसेवकांना गळाला लावून स्वत:ची व पक्षाची ताकद वाढवली आहे.(प्रतिनिधी)आतापर्यंत दिव्यातील मनसेचे दोन नगरसेवक, वागळे इस्टेट येथील काँग्रेसचे सहा नगरसेवक आणि उथळसर येथील काँग्रेसचे नगरसेवक राजा गवारी यांना शिवसेनेत आणण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेत आलेले राष्ट्रवादीचे सुभाष भोईर आणि काँग्रेसचे रवींद्र फाटक आता आमदार झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत आणलेल्यांचा फायदा होतो हा संदेश शिंदे सध्या कुंपणावरील आजी-माजी नगरसेवकांना देत आहेत. नव्या प्रभाव रचनेनंतर नेमके चित्र स्पष्ट होईल व त्यानंतर युतीबाबतच्या संभ्रमाला पूर्णविराम मिळेल. त्यानंतर अन्य पक्षांमधील असंतुष्टांकरिता भाजपा व शिवसेनेत खेचाखेची होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.