शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

पालकमंत्र्यांनीही फिरविली पाठ

By admin | Updated: August 5, 2016 02:28 IST

सायन - पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. खड्ड्यांमुळे एक महिन्यापासून रोज चक्का जाम होत असल्याने प्रवासी व वाहतूकदार त्रस्त झाले आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याशी निगडित हा विषय असून त्यांनी याकडे दुर्र्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने १२२० कोटी रुपये खर्च करून सायन - पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले. परंतु दोन वर्षामध्ये काँक्रीटीकरण वगळता उर्वरित सर्व रोडवर खड्डे पडले आहेत. वाशी ते नेरूळ दरम्यान रोज चक्का जाम होत आहे. पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते एक तास लागत आहे. शासनाने छोट्या वाहनांना टोलमधून सूट दिल्यामुळे नुकसान होत असल्याचे कारण देवून ठेकेदार खड्डे बुजवत नाही. महामार्गावरील तुर्भे येथील पादचारी पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. नेरूळ, जुईनगर भुयारी मार्गाचे कामही पूर्ण झालेले नाही. कामोठेमध्ये रुंदीकरणाचे कामही पूर्ण झालेले नाही. महामार्गाची पूर्ण चाळण झाली आहे. एक महिन्यापासून रोज वाहतूक कोंडी होत आहे. बुधवारी कोपरखैरणेमधून बेलापूरला जाण्यासाठी एका प्रवाशास २ तास १८ मिनिट वेळ लागला. सानपाडा ते जुईनगरपर्यंत जाण्यासाठी अर्धा ते एक तास लागत आहे. महामार्गावर रोज अपघात होत आहेत. रिक्षा, बसेस व इतर वाहनांचे खड्ड्यांमुळे प्रचंड नुकसान होवू लागले आहे. सकाळी कार्यालयांमध्ये जाताना व सायंकाळी परत येणाऱ्या नागरिकांना रोडमध्येच अडकून पडावे लागत आहे. कार्यालयामध्ये जाण्यासाठी वेळ होत असल्याने अनेकांनी बसने प्रवास बंद केला आहे. स्वत:चे वाहन वापरण्याचे बंद करून रेल्वेने जाणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच सार्वजनिक बांधकाम खाते आहे. महामार्गाचे रुंदीकरण त्यांच्या अखत्यारीत नसले तरी या मार्गावरील अनेक पूल एमएसआरडीसी ने बांधले असून ते त्यांच्या अखत्यारीत आहेत. रोज जवळपास दहा लाख प्रवासी सायन - पनवेल महामार्गावरून प्रवास करत आहेत. नवी मुंबई शहर, ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत, जेएनपीटी, तळोजा एमआयडीसी व ठाणेकडे जाणारी वाहनेही महामार्गावरूनच जात असतात. (प्रतिनिधी)>आजी - माजी पालकमंत्र्यांच्या कामाची तुलना झाली सुरू महामार्गावरील खड्ड्यांवरून ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे व माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या कामाची तुलना होवू लागली आहे. २००५ मध्ये ठाणे- बेलापूर रोडवरील प्रचंड खड्ड्यांमुळे नाईक यांच्यावर शिवसेनेसह काँगे्रसने टीकेची झोड उठविली होती. प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नाईक यांनी पालिकेच्या माध्यमातून पूर्ण ठाणे - बेलापूर रोडचे काँक्रीटीकरण करून खड्ड्यांचा विषयच संपविला. याशिवाय एमआयडीसी व सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले आहे. याशिवाय जनता दरबारच्या माध्यमातून शहरवासीयांच्या समस्या ऐकून त्या सोडविल्या जात होत्या. परंतु शिंदे यांनी दोन वर्षांमध्ये एक जनता दरबार घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असतानाही महामार्ग खड्डेमुक्त करता आलेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.