शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनीही फिरविली पाठ

By admin | Updated: August 5, 2016 02:28 IST

सायन - पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. खड्ड्यांमुळे एक महिन्यापासून रोज चक्का जाम होत असल्याने प्रवासी व वाहतूकदार त्रस्त झाले आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याशी निगडित हा विषय असून त्यांनी याकडे दुर्र्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने १२२० कोटी रुपये खर्च करून सायन - पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले. परंतु दोन वर्षामध्ये काँक्रीटीकरण वगळता उर्वरित सर्व रोडवर खड्डे पडले आहेत. वाशी ते नेरूळ दरम्यान रोज चक्का जाम होत आहे. पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते एक तास लागत आहे. शासनाने छोट्या वाहनांना टोलमधून सूट दिल्यामुळे नुकसान होत असल्याचे कारण देवून ठेकेदार खड्डे बुजवत नाही. महामार्गावरील तुर्भे येथील पादचारी पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. नेरूळ, जुईनगर भुयारी मार्गाचे कामही पूर्ण झालेले नाही. कामोठेमध्ये रुंदीकरणाचे कामही पूर्ण झालेले नाही. महामार्गाची पूर्ण चाळण झाली आहे. एक महिन्यापासून रोज वाहतूक कोंडी होत आहे. बुधवारी कोपरखैरणेमधून बेलापूरला जाण्यासाठी एका प्रवाशास २ तास १८ मिनिट वेळ लागला. सानपाडा ते जुईनगरपर्यंत जाण्यासाठी अर्धा ते एक तास लागत आहे. महामार्गावर रोज अपघात होत आहेत. रिक्षा, बसेस व इतर वाहनांचे खड्ड्यांमुळे प्रचंड नुकसान होवू लागले आहे. सकाळी कार्यालयांमध्ये जाताना व सायंकाळी परत येणाऱ्या नागरिकांना रोडमध्येच अडकून पडावे लागत आहे. कार्यालयामध्ये जाण्यासाठी वेळ होत असल्याने अनेकांनी बसने प्रवास बंद केला आहे. स्वत:चे वाहन वापरण्याचे बंद करून रेल्वेने जाणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच सार्वजनिक बांधकाम खाते आहे. महामार्गाचे रुंदीकरण त्यांच्या अखत्यारीत नसले तरी या मार्गावरील अनेक पूल एमएसआरडीसी ने बांधले असून ते त्यांच्या अखत्यारीत आहेत. रोज जवळपास दहा लाख प्रवासी सायन - पनवेल महामार्गावरून प्रवास करत आहेत. नवी मुंबई शहर, ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत, जेएनपीटी, तळोजा एमआयडीसी व ठाणेकडे जाणारी वाहनेही महामार्गावरूनच जात असतात. (प्रतिनिधी)>आजी - माजी पालकमंत्र्यांच्या कामाची तुलना झाली सुरू महामार्गावरील खड्ड्यांवरून ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे व माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या कामाची तुलना होवू लागली आहे. २००५ मध्ये ठाणे- बेलापूर रोडवरील प्रचंड खड्ड्यांमुळे नाईक यांच्यावर शिवसेनेसह काँगे्रसने टीकेची झोड उठविली होती. प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नाईक यांनी पालिकेच्या माध्यमातून पूर्ण ठाणे - बेलापूर रोडचे काँक्रीटीकरण करून खड्ड्यांचा विषयच संपविला. याशिवाय एमआयडीसी व सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले आहे. याशिवाय जनता दरबारच्या माध्यमातून शहरवासीयांच्या समस्या ऐकून त्या सोडविल्या जात होत्या. परंतु शिंदे यांनी दोन वर्षांमध्ये एक जनता दरबार घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असतानाही महामार्ग खड्डेमुक्त करता आलेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.