शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पीक कर्जासाठी हमी

By admin | Updated: June 22, 2016 04:27 IST

आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या राज्यातील १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पीक कर्जवाटपासाठी २ हजार कोटी रुपयांची हमी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला

मुंबई : आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या राज्यातील १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पीक कर्जवाटपासाठी २ हजार कोटी रुपयांची हमी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नाशिक आणि जळगाव या १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शेतकऱ्यांकडील कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना नव्याने कर्जवाटप करण्यात अडचणी येत होत्या. त्यांना आता कर्जवाटपासाठी राज्य सहकारी बँक निधी देईल. कर्जाची परतफेड होऊ शकली नाही तर तेवढा निधी राज्य सरकार राज्य बँकेला देईल, असे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले. (विशेष प्रतिनिधी)काही बँकांकडूनशेतकऱ्यांची अडवणूकपीक कर्ज वाटपाबाबत काही जिल्हा सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते, टाळाटाळ केली जाते, असे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले की अशी अडवणूक शासन खपवून घेणार नाही. या बँकांविरुद्ध कारवाई केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील बँका आहेत. कर्मचारी पुरसे नाहीत, पुरेसा निधी नाही, ही कारणे चालणार नाहीत, असे त्यांनी बजावले.मराठवाडा ग्रामीण विकास बँकेमार्फत मोठ्या प्रमाणात पीक कर्जाचे वाटप केले जाते. त्यासाठी या बँकेला नाबार्ड किंवा लिड बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. या दोन्ही बँकांचा व्याजदर आणि पीककर्जाचा व्याज दर यातील फरकाची रक्कम राज्य शासन अदा करेल, असा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. समजा महाराष्ट्र बँकेचा व्याजदर १० टक्के असेल आणि शेतकऱ्यांना ४ टक्के दराने कर्ज दिले जात असेल तर ६ टक्के व्याजाचा भार राज्य शासन उचलेल, असे सहकार मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. १३७७८ कोटींचे वाटपराज्यात यंदा आतापर्यंत २३ लाख १६ हजार शेतकऱ्यांना १३ हजार ७७८ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकांनी १८.१४ लाख शेतकऱ्यांना ८ हजार ४४७ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचा समावेश आहे.