शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

संप न करण्याची हमी द्या - हायकोर्ट

By admin | Updated: April 19, 2016 03:52 IST

मागण्या मान्य करून घेण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही सामान्य व गरीब रुग्णांना वेठीस धरणाऱ्या मार्डच्या डॉक्टरांना यापुढे संपावर न जाण्याची हमी देण्याचे निर्देश

मुंबई : मागण्या मान्य करून घेण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही सामान्य व गरीब रुग्णांना वेठीस धरणाऱ्या मार्डच्या डॉक्टरांना यापुढे संपावर न जाण्याची हमी देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. तक्रार निवारण समितीचा अहवाल येईपर्यंत संपावर जाणार नाही, अशी लेखी हमी ४ मेपर्यंत द्या, असा आदेश उच्च न्यायालयाने मार्डच्या डॉक्टरांना दिला. तसेच मार्डच्या डॉक्टरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अखेरचे भाषण ऐकावे, असा टोलाही उच्च न्यायालयाने डॉक्टरांना लगावला.जे.जे.चे अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने यांनी निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास देऊ नये, असा निर्णय घेतल्याने जे.जे.च्या रहिवासी डॉक्टरांनी संप पुकारला. डॉ. लहाने व नेत्रचिकित्सक विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी या डॉक्टरांनी सरकारकडे केली. जे. जे. डॉक्टरांच्या संपाला मार्डने राज्यव्यापी संप पुकारून समर्थन केले. त्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अफाक मांडविया यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती.गेल्या सुनावणीत खंडपीठाने डॉक्टरांच्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष म्हणून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार अ‍ॅड. देव यांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. सी. डागा यांनी तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष होण्यास सहमती दर्शवल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने राज्य सरकारला यासंदर्भात एका आठवड्यात अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले.दरम्यान, तक्रार निवारण समिती डॉक्टरांच्या अन्य तक्रारी आणि डॉ. लहाने यांच्याबाबतही असलेल्या सर्व तक्रारी ऐकून घेऊन याबाबतचे सत्य शोधेल, अशी माहिती अ‍ॅड. देव यांनी खंडपीठाला दिली. ही समिती जूनमध्ये अहवाल सादर करेल. तोपर्यंत तरी संपावर जाणार नाही, अशी हमी मार्डच्या डॉक्टरांनी द्यावी, असे खंडपीठाने म्हणताच हमी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या डॉक्टरांना उच्च न्यायालयाने पुन्हा फटकारले. ‘अहवाल येईपर्यंत संप करणार नाही, निदान एवढे तरी आश्वासन द्या. ते देण्यासाठी इतका वेळ का लावता?’ असे खंडपीठाने म्हणताच मार्डने अहवाल येईपर्यंत संपावर न जाण्याचे तोंडी आश्वासन उच्च न्यायालयाला दिले. (प्रतिनिधी)