शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

सुरक्षित अन्नधान्य निर्मितीसाठी ‘ग्रो सेफ फूड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 02:40 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे देशभर अभियान.

अकोला, दि. १६- अलीकडच्या काही वर्षांत पीक उत्पादनावर वाढलेल्या कीटकनाशकांचे प्रमाण बघता केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे देशात ह्यग्रो सेफ फुडह्ण अभियान राबविण्यात येत आहे; पण आजही एका पिकासाठी निर्माण करण्यात आलेले कीटकनाशक दुसर्‍या पिकावर वापर होत असल्याने मानवी आरोग्याला धोका वाढला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मानवी आरोग्याला घातक असलेल्या अशा कीटकनाशकांवर प्रतिबंध घालणे गरजेचे झाले आहे.देशात हजारो कीटकनाशक कंपन्या असून, या सर्व कंपन्यांना कीटकनाशके तयार करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो, (कीटकनाशक, बुरशीनाशक व तणनाशके) कीटकनाशक निर्मितीनंतर त्याच्या चाचण्या घेतल्या जातात. मानवी सुरक्षा व सावधानीपूर्वक मूल्यमापन चाचण्यानंतरच केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीद्वारे विशिष्ट उपयोगासाठी नोंदणी व परवाना दिला जातो. निर्मित कीटकनाशकांचा साठा व विक्री करताना मात्र विक्रेते व घाऊक व्यापार्‍यांनी नोंदणीचे नियम व शर्तीनुसारच विक्री करण्याची गरज आहे; पण तसे न करता अनेक ठिकाणी एकाच पिकावर वापरण्याची परवानगी असलेले कीटकनाशक सर्रास सर्वच पिकांवर वापरले जात असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. केंद्रीय कीटकनाशक मंडळाने कापूस या पिकासाठी कीटकनाशकांना परवानगी दिली असते; पण तेच कीटकनाशक सर्रासपणे मूग, तूर किंवा इतर पिकांवर वापरण्याची शिफारस विक्रेते शेतकर्‍यांना करीत असतात. परिणामी, चुकीचे कीटकनाशक वापरल्याने त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कीटकनाशके लेबल क्लेमची व्यवस्था आहे; पण शेतकर्‍यांमध्ये याबाबत जनजागृतीची गरज आहे. कीटकनाशक विक्रेत्यांनी निकृष्ट, नकली आणि कमी दर्जाच्या कीटकनाशकांची विक्री, वितरण तसेच साठवणूक करणे हा कीटकनाशक अधिनियम १९६८ नुसार एक गंभीर अपराध आहे. असे करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई होते; परंतु अनेक ठिकाणी या अधिनियमांना डावलून सर्रास कीटकनाशके विकली जात असल्याचे वृत्त आहे.

- कापसावरील कीटकनाशके कापसावरच फवारणे गरजेचे आहे; परंतु तीच कीटकनाशके इतर पिकांवर वापरले जात असल्याने मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील एका सामाजिक संघटनेने भाजीपाला पिकावरील विषापेक्षा अधिक आढळलेले कीटकनाशकांचे प्रमाण अधोरेखित करते. त्यामुळे शेतकर्‍यांनीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे.डॉ. एन. एम. काळे,विस्तार शिक्षण विभाग,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.