शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

सामान्यांपर्यंत विकास पोहोचवा

By admin | Updated: May 30, 2016 01:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दमदार नेतृत्वाने संपूर्ण देशाच्या विकासात केवळ दोन वर्षांत आघाडी घेतली आहे

तळेगाव दाभाडे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दमदार नेतृत्वाने संपूर्ण देशाच्या विकासात केवळ दोन वर्षांत आघाडी घेतली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवताना विकासाची गंगा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे रविवारी केले.भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय भेगडे होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदार भेगडे यांच्या दीड वर्षाच्या कार्यपूर्ती अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, बाबूराव पाचर्णे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, माजी आमदार दिगंबर भेगडे, पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, तात्याराव गावडे, सचिन पटवर्धन, दिलीप खैरे, भास्कर म्हाळस्कर, ज्योती जाधव, उमा खापरे आदी उपस्थित होते. दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी तालुका भाजपातर्फे ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.मेक इन इंडिया, स्वच्छता अभियान सारख्या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे विकासाची घोडदौड सुरू आहे. त्यावर टीका करणाऱ्यांनी गेल्या ५० वर्षांत स्वार्थच पाहिला, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे एक बोट दाखवणाऱ्यांनी त्यांची चार बोटे स्वत:कडे असल्याचे विसरू नये, अशी टीकाही कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नाव न घेता केली. स्वागत शहराध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील यांनी, सूत्रसंचालन नगरसेवक गणेश भेगडे यांनी व तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी आभार मानले.(वार्ताहर)भाजपात प्रवेश केलेल्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख भाई भरत मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मिलिंद बोत्रे, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य संदीप काशीद-पाटील, विलास कुटे, शरद कुटे, दत्तात्रय पानसरे, महेश पानसरे, रोहिदास असवले, अजित गाडे, आळंदीचे माजी नगराध्यक्ष विलास कुऱ्हाडे, वर्षा कोदरे, उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे, बाजार समिती संचालिका सुरेखा भोसले, मीनाक्षी फराटे, आत्माराम फराटे, गोविंद फराटे, महादेव फराटे, राजाराम शितोळे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण फराटे, सरपंच सुवर्णा फराटे, उपसरपंच अशोक फराटे, बाळकाका फराटे, गणेश ओव्हाळ, विशाल कलाटे यांच्यासह कार्यकत्यांनी भाजपात प्रवेश केला.स्वच्छता अभियानात पाच हजार गावे व ५० शहरे हगणदारीमुक्त झाली आहेत. टीका करणाऱ्यांना जे ५० वर्षांत करता आले नाही, ते आम्ही केवळ एका वर्षात केले आहे, असे स्पष्ट करताना त्यांनी मावळचा विशेष उल्लेख करून उद्योग उभारणीसाठी गुंतवणूकदारांकडून पुणे जिल्ह्याला पहिली पसंती मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमदार भेगडे म्हणाले, ‘‘घड्याळमुक्त पुणे जिल्हा करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. दीड वर्षात दीडशे कोटीची विकासकामे झाली. पूर्वी मावळच्या विकासकामांना नकारघंटा मिळे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाच्या प्रत्येक प्रस्तावाला मदत दिली आहे.’’