शहरं
Join us  
Trending Stories
1
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
2
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
3
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
4
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी
5
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
6
नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय
7
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
8
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
9
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
10
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
11
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
12
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
13
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
14
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
15
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
16
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
17
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
18
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
19
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
20
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार

कृषीकर्ज १५ हजार कोटींनी वाढवा

By admin | Updated: May 8, 2016 02:09 IST

महाराष्ट्रात एक कोटी ३६ हजार खातेधारक शेतकरी असून त्यातील ५८ लाख शेतकरी कर्ज घेतात. उर्वरित शेतकरी सावकार किंवा मग इतर स्त्रोतांकडून कर्ज घेतात. हे लोक कृषीपत

नवी दिल्ली : महाराष्ट्रात एक कोटी ३६ हजार खातेधारक शेतकरी असून त्यातील ५८ लाख शेतकरी कर्ज घेतात. उर्वरित शेतकरी सावकार किंवा मग इतर स्त्रोतांकडून कर्ज घेतात. हे लोक कृषीपत पुरवठ्याला वंचित आहेत. त्यामुळे किमान २० लाख शेतकऱ्यांना कृषीकर्ज प्रणालीत आणण्यासाठी कृषीकर्जाची १५ हजार कोटी रूपयांनी वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. २०१२ पासून २०१४ पर्यंत चार कोटी ४२ लाख शेतकऱ्यांच्या थकित कर्जाची पाच वर्षांसाठी पुनर्रचना करण्याची आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. विमा योजना : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत यंदा एक कोटी १३ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. गेल्यावर्षी ही संख्या केवळ १७ लाख होती. ही संख्या वीमा कवच लाभलेल्या देशातील एकूण पीकाच्या २७ टक्के आहे. गोसीखुर्द प्रकल्प मुख्यमंत्री म्हणाले की, ३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पासाठी आम्ही केंद्राकडे ९० : १० या प्रमाणात निधी मागितला आहे. केंद्राने ९०टक्के निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांकडून विलंब नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारची बैठक घेण्यास विलंब केला काय या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांनी योग्यवेळी बैठक आयोजित करून स्थितीचा आढावा घेतला. लातूरमध्ये पाणिवाटपात गडबड होत मान्य करताना यात लवकरच सुधारणा केली जाईल, असे ते म्हणाले. ४००० गावांसाठी योजनामराठवाडा आणि विदर्भातील ४००० गावांसाठी सिंचन योजना तयार करण्यात आली असून यासाठी जागतिक बँकेकडे कर्ज मागण्यात येईल. यासंदर्भात केंद्रीय वित्त विभागाने ही योजना मंजूर करून बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त गावेविदर्भ : १३,८१७मराठवाडा : ८,५२२उ. महाराष्ट्र : ४,८९६प. महाराष्ट्र : १,४२७एकूण : २८,२६२