शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांच्या गटाने बांधली आडोशी गावात विहीर

By admin | Updated: June 10, 2016 03:19 IST

आडोशी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डोंबिवलीच्या ‘जीवन परिस’ या तरुणांच्या ग्रुपने चौधरीपाड्यावर श्रमदान व लोकवर्गणीतून एक विहीर खोदली

डोंबिवली : ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मोखाडा तालुक्यातील आडोशी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डोंबिवलीच्या ‘जीवन परिस’ या तरुणांच्या ग्रुपने चौधरीपाड्यावर श्रमदान व लोकवर्गणीतून एक विहीर खोदली आहे. पर्यावरण दिनाचे औचित्यसाधून त्यांनी या विहिरीचे लोकार्पण केले. या विहिरीमुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ पुढच्या उन्हाळ्यात येणार नाही, असा दावा ग्रुपने केला आहे. चार वर्षांपूर्वी ‘जीवन परिस’ हा ग्रुप स्थापन झाला आहे. सामाजिक कार्याच्या उद्देशाने डोंबिवलीतील सुशिक्षित आणि नोकरी करणारे तरुण या ग्रुपमध्ये एकत्रित आले आहेत. महाराष्ट्रातील चार वर्षांतील कोरड्या दुष्काळाचा, तेथील परिस्थितीचा त्यांनी अभ्यास केला. ठाणे जिल्ह्याशेजारी असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याचे त्यांना त्यात जाणवले. पाण्याअभावी दरवर्षी उन्हाळ्यात येथील गावपाडे विस्थापित होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोखाडा तालुक्यातील आडोशी गावानजीक असलेल्या चौधरीपाड्यावर १४ घरे विखुरलेली आहेत. त्यात ७५ माणसे राहतात. खडकाळ जमीन आणि डोंगरउतारामुळे पावसाळ्यात सगळे पाणी वाहून जाते. नदीनाल्यांत खड्डे करून ग्रामस्थ उन्हाळ्यात आपली तहान भागवतात. या खड्ड्यांतील पाणीही टिकेल की नाही, याची शाश्वती नसते. त्यामुळे तेथे विहीर बांधण्याचे काम ‘जीवन परिस ग्रुप’ने हाती घेतले. त्यासाठी सहा लाख रुपये खर्च अपेक्षित होता. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे श्रमदान घेतले. लोकवर्गणी गोळा करण्याचे काम ग्रुपने केले. अवघ्या चार लाख रुपये खर्चात त्यांनी मोठी विहीर बांधली आहे. विहिरीच्या शेजारी शोषखड्डा घेण्यात आला आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरेल व विहिरीतील पाण्याची पातळी उन्हाळ्यात आटणार नाही. परिणामी, ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळणार आहे. ही विहीर बांधण्यासाठी कंत्राटदार हबीब शेख यांनी त्यांची सगळी यंत्रसामग्री मोफत दिली होती, तर ५० जणांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.या उपक्रमात ग्रुपच्या वृषाली घाणेकर, मयूर दप्तदार, स्वानंद लेले, ज्योती मार्केंडे, तन्मय गोखले यांनी पुढाकार घेतला होता. विहीर बांधण्यासाठी स्थापत्य सल्लागार म्हणून ऋषिकेश लेले, कायदेशीर माहिती रीतू घरत, मुनिश मल्होत्रा, लक्ष्मण शिंदे यांनी दिली. प्रकल्प साकारत असताना ग्रामस्थांना विश्वासात घेण्याचे काम चिन्मया घाणेकर, ऋषिकेश पाठक यांनी केले. तसेच संपूर्ण प्रकल्पावर स्थानिक रहिवासी दिगंबर पाटील यांनी देखरेख ठेवली.पहिलाच प्रयत्न यशस्वी : जीवन परिसचा हा पहिलाच प्रकल्प होता. तो त्यांनी यशस्वी केला. ५० जण एकत्रित आले, तर एका पाड्याची तहान भागू शकतो. त्याचप्रमाणे समाजातील लहानमोठे गट एकत्रित येऊन काम केल्यास राज्यातील जलसंकट दूर होण्यास मदत होऊ शकते, असा विश्वास ‘जीवन परिस ग्रुप’ने व्यक्त केला आहे.