शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांच्या गटाने बांधली आडोशी गावात विहीर

By admin | Updated: June 10, 2016 03:19 IST

आडोशी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डोंबिवलीच्या ‘जीवन परिस’ या तरुणांच्या ग्रुपने चौधरीपाड्यावर श्रमदान व लोकवर्गणीतून एक विहीर खोदली

डोंबिवली : ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मोखाडा तालुक्यातील आडोशी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डोंबिवलीच्या ‘जीवन परिस’ या तरुणांच्या ग्रुपने चौधरीपाड्यावर श्रमदान व लोकवर्गणीतून एक विहीर खोदली आहे. पर्यावरण दिनाचे औचित्यसाधून त्यांनी या विहिरीचे लोकार्पण केले. या विहिरीमुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ पुढच्या उन्हाळ्यात येणार नाही, असा दावा ग्रुपने केला आहे. चार वर्षांपूर्वी ‘जीवन परिस’ हा ग्रुप स्थापन झाला आहे. सामाजिक कार्याच्या उद्देशाने डोंबिवलीतील सुशिक्षित आणि नोकरी करणारे तरुण या ग्रुपमध्ये एकत्रित आले आहेत. महाराष्ट्रातील चार वर्षांतील कोरड्या दुष्काळाचा, तेथील परिस्थितीचा त्यांनी अभ्यास केला. ठाणे जिल्ह्याशेजारी असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याचे त्यांना त्यात जाणवले. पाण्याअभावी दरवर्षी उन्हाळ्यात येथील गावपाडे विस्थापित होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोखाडा तालुक्यातील आडोशी गावानजीक असलेल्या चौधरीपाड्यावर १४ घरे विखुरलेली आहेत. त्यात ७५ माणसे राहतात. खडकाळ जमीन आणि डोंगरउतारामुळे पावसाळ्यात सगळे पाणी वाहून जाते. नदीनाल्यांत खड्डे करून ग्रामस्थ उन्हाळ्यात आपली तहान भागवतात. या खड्ड्यांतील पाणीही टिकेल की नाही, याची शाश्वती नसते. त्यामुळे तेथे विहीर बांधण्याचे काम ‘जीवन परिस ग्रुप’ने हाती घेतले. त्यासाठी सहा लाख रुपये खर्च अपेक्षित होता. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे श्रमदान घेतले. लोकवर्गणी गोळा करण्याचे काम ग्रुपने केले. अवघ्या चार लाख रुपये खर्चात त्यांनी मोठी विहीर बांधली आहे. विहिरीच्या शेजारी शोषखड्डा घेण्यात आला आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरेल व विहिरीतील पाण्याची पातळी उन्हाळ्यात आटणार नाही. परिणामी, ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळणार आहे. ही विहीर बांधण्यासाठी कंत्राटदार हबीब शेख यांनी त्यांची सगळी यंत्रसामग्री मोफत दिली होती, तर ५० जणांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.या उपक्रमात ग्रुपच्या वृषाली घाणेकर, मयूर दप्तदार, स्वानंद लेले, ज्योती मार्केंडे, तन्मय गोखले यांनी पुढाकार घेतला होता. विहीर बांधण्यासाठी स्थापत्य सल्लागार म्हणून ऋषिकेश लेले, कायदेशीर माहिती रीतू घरत, मुनिश मल्होत्रा, लक्ष्मण शिंदे यांनी दिली. प्रकल्प साकारत असताना ग्रामस्थांना विश्वासात घेण्याचे काम चिन्मया घाणेकर, ऋषिकेश पाठक यांनी केले. तसेच संपूर्ण प्रकल्पावर स्थानिक रहिवासी दिगंबर पाटील यांनी देखरेख ठेवली.पहिलाच प्रयत्न यशस्वी : जीवन परिसचा हा पहिलाच प्रकल्प होता. तो त्यांनी यशस्वी केला. ५० जण एकत्रित आले, तर एका पाड्याची तहान भागू शकतो. त्याचप्रमाणे समाजातील लहानमोठे गट एकत्रित येऊन काम केल्यास राज्यातील जलसंकट दूर होण्यास मदत होऊ शकते, असा विश्वास ‘जीवन परिस ग्रुप’ने व्यक्त केला आहे.