शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातच खालावली भूजल पातळी

By admin | Updated: August 11, 2014 00:48 IST

हमखास पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात

दुष्काळाची चाहूल : वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊसज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ हमखास पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात वाढणारी भूजल पातळी यंदा मात्र घटत असल्याचे दिसत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील आठ तालुक्यांंची भूजल पातळी ०.६८ ते ०.१६ मीटरने खालावली आहे. यवतमाळ हा हमखास पावसाचा जिल्हा आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. १ जून ते १० आॅगस्टपर्यंत ५१२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा पावसाने जिल्ह्यावर अवकृपा केली आहे. १ जून ते १० आॅगस्टपर्यंत ३०३.०२ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ ३३.३० टक्के आहे. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गतवर्षी वार्षिक सरासरीच्या दीडशे टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे मे महिन्यात १.७५ मीटर भूजल पातळी होती. परंतु आता ही पातळी खालावत असल्याचे दिसून येते. भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी मे महिन्यात भूजल पातळी तपासण्यात येते. मात्र यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने शासनाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात ही पाहणी करण्यात आली. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, महागाव, पुसद, उमरखेड, दारव्हा आणि बाभूळगाव या तालुक्यात भूजल पातळी खालावल्याचे दिसून येते. दारव्हा तालुक्यात सर्वाधिक ०.६८ मीटरने पातळी खालावली आहे. तर महागाव ०.४१, पुसद ०.३६ मीटर अशी पातळी खालावली आहे. विशेष हे कीे, या तालुक्यात वार्षिक सरासरीच्या केवळ २५ टक्के पाऊस झाला. त्यामुळेच भूगर्भातील पाण्याची पातळीच वाढली नाही. जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया दिसत आहे. अद्यापही तालुक्यातील पैनगंगा, पूस, वर्धा, अडाण या नद्यांचे पात्र कोरडे आहे.