शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पावसाळ्यातच खालावली भूजल पातळी

By admin | Updated: August 11, 2014 00:48 IST

हमखास पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात

दुष्काळाची चाहूल : वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊसज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ हमखास पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात वाढणारी भूजल पातळी यंदा मात्र घटत असल्याचे दिसत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील आठ तालुक्यांंची भूजल पातळी ०.६८ ते ०.१६ मीटरने खालावली आहे. यवतमाळ हा हमखास पावसाचा जिल्हा आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. १ जून ते १० आॅगस्टपर्यंत ५१२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा पावसाने जिल्ह्यावर अवकृपा केली आहे. १ जून ते १० आॅगस्टपर्यंत ३०३.०२ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ ३३.३० टक्के आहे. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गतवर्षी वार्षिक सरासरीच्या दीडशे टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे मे महिन्यात १.७५ मीटर भूजल पातळी होती. परंतु आता ही पातळी खालावत असल्याचे दिसून येते. भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी मे महिन्यात भूजल पातळी तपासण्यात येते. मात्र यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने शासनाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात ही पाहणी करण्यात आली. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, महागाव, पुसद, उमरखेड, दारव्हा आणि बाभूळगाव या तालुक्यात भूजल पातळी खालावल्याचे दिसून येते. दारव्हा तालुक्यात सर्वाधिक ०.६८ मीटरने पातळी खालावली आहे. तर महागाव ०.४१, पुसद ०.३६ मीटर अशी पातळी खालावली आहे. विशेष हे कीे, या तालुक्यात वार्षिक सरासरीच्या केवळ २५ टक्के पाऊस झाला. त्यामुळेच भूगर्भातील पाण्याची पातळीच वाढली नाही. जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया दिसत आहे. अद्यापही तालुक्यातील पैनगंगा, पूस, वर्धा, अडाण या नद्यांचे पात्र कोरडे आहे.