शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

भूजल शोषितांना ‘जलधर’ची साथ

By admin | Updated: October 26, 2016 02:52 IST

भूजलाचा अतिउपसा होणाऱ्या, तसेच उन्हाळ््यात पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावात जलव्यवस्थापन करण्यासाठी जलधर भूजल व्यवस्थापन संघाची स्थापना करण्यात येणार आहे.

- विशाल शिर्के,  पुणेभूजलाचा अतिउपसा होणाऱ्या, तसेच उन्हाळ््यात पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावात जलव्यवस्थापन करण्यासाठी जलधर भूजल व्यवस्थापन संघाची स्थापना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुण्यासह राज्यातील सात जिल्ह्यातील २७० गावांची निवड करण्यात आली असून, जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भूजल व्यवस्थापन लोकसहभागातून करण्याचा निर्णय राज्य सरकारने हाती घेतला आहे. त्या नुसार प्रत्येक गावात जलधर भूजल व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार असून, त्याची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात येणार आहे. समितीच्या माध्यमातून गावात पडणारा पाऊस, सध्याचा भूजल वापर याचा आढावा घेण्यात येणार आहे. पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात पाण्याचा वापर किती होतो याचा आढावा घेऊन भूजलाची तूट आहे की नाही हे समिती ठरवेल. तूट आढळल्यास तसा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यास पाठविण्यात येईल. त्यानुसार जलपुनर्भरणाची योजना राबविण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून संबंधित गावाचा जलधर (पाणी धरुन ठेवणारा भाग) निश्चित करण्यात येणार आहे. तसेच पाणी उपलब्धतेवरुन कोणती पिकपद्धती अधिक किफायतशीर ठरेल, पिकांना पाणी देण्याची पद्धत कोणती असावी, याबाबतही समितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी संबंधित गावात उभारलेल्या रेन गेजमधून पाऊस कसा मोजायचा, निरीक्षण विहिरींची पातळी कशी तपासायची याचे प्रशिक्षण देखील संबंधितांना दिले जाईल, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक सुनील पाटील यांनी दिली. जानेवारीपासून याची माहिती संकलित करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे गावाचा जलनकाशा तयार होणार आहे. आत्तापर्यंत २७० पैकी १०८ गावांचे सखोल भू-जल सर्वेक्षण झाले असून, त्या गावांचा नकाशा देखील तयार झाला आहे. ही सर्व माहिती नकाशासह भूजल विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. अशी असेल समितीगावाच्या नावाने जलधर भूजल व्यवस्थापन संघाची नोंद चॅरिटी कमिश्नरकडे होईल. या संघाचा अध्यक्ष पंचायत समिती सदस्य असेल. तर गट विकास अधिकारी पदसिद्ध सचिव असतील. त्यात पाणी तज्ज्ञ, गावातील प्रतिनिधी, सिंचन, कृषी, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण, सर्कल या सदस्यांचा समावेश समितीत असेल. या योजनेंतर्गत जानेवारीपासून याची माहिती संकलित करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे गावाचा जलनकाशा तयार होणार आहे. जलधर योजनेतील जिल्हानिहाय गावेजिल्हागावे नगर ६५जळगाव ३३अमरावती ४९बुलडाणा ३९सातारा १३औरंगाबाद १९पुणे ५२