शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

भूजल शोषितांना ‘जलधर’ची साथ

By admin | Updated: October 26, 2016 02:52 IST

भूजलाचा अतिउपसा होणाऱ्या, तसेच उन्हाळ््यात पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावात जलव्यवस्थापन करण्यासाठी जलधर भूजल व्यवस्थापन संघाची स्थापना करण्यात येणार आहे.

- विशाल शिर्के,  पुणेभूजलाचा अतिउपसा होणाऱ्या, तसेच उन्हाळ््यात पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावात जलव्यवस्थापन करण्यासाठी जलधर भूजल व्यवस्थापन संघाची स्थापना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुण्यासह राज्यातील सात जिल्ह्यातील २७० गावांची निवड करण्यात आली असून, जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भूजल व्यवस्थापन लोकसहभागातून करण्याचा निर्णय राज्य सरकारने हाती घेतला आहे. त्या नुसार प्रत्येक गावात जलधर भूजल व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार असून, त्याची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात येणार आहे. समितीच्या माध्यमातून गावात पडणारा पाऊस, सध्याचा भूजल वापर याचा आढावा घेण्यात येणार आहे. पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात पाण्याचा वापर किती होतो याचा आढावा घेऊन भूजलाची तूट आहे की नाही हे समिती ठरवेल. तूट आढळल्यास तसा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यास पाठविण्यात येईल. त्यानुसार जलपुनर्भरणाची योजना राबविण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून संबंधित गावाचा जलधर (पाणी धरुन ठेवणारा भाग) निश्चित करण्यात येणार आहे. तसेच पाणी उपलब्धतेवरुन कोणती पिकपद्धती अधिक किफायतशीर ठरेल, पिकांना पाणी देण्याची पद्धत कोणती असावी, याबाबतही समितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी संबंधित गावात उभारलेल्या रेन गेजमधून पाऊस कसा मोजायचा, निरीक्षण विहिरींची पातळी कशी तपासायची याचे प्रशिक्षण देखील संबंधितांना दिले जाईल, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक सुनील पाटील यांनी दिली. जानेवारीपासून याची माहिती संकलित करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे गावाचा जलनकाशा तयार होणार आहे. आत्तापर्यंत २७० पैकी १०८ गावांचे सखोल भू-जल सर्वेक्षण झाले असून, त्या गावांचा नकाशा देखील तयार झाला आहे. ही सर्व माहिती नकाशासह भूजल विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. अशी असेल समितीगावाच्या नावाने जलधर भूजल व्यवस्थापन संघाची नोंद चॅरिटी कमिश्नरकडे होईल. या संघाचा अध्यक्ष पंचायत समिती सदस्य असेल. तर गट विकास अधिकारी पदसिद्ध सचिव असतील. त्यात पाणी तज्ज्ञ, गावातील प्रतिनिधी, सिंचन, कृषी, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण, सर्कल या सदस्यांचा समावेश समितीत असेल. या योजनेंतर्गत जानेवारीपासून याची माहिती संकलित करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे गावाचा जलनकाशा तयार होणार आहे. जलधर योजनेतील जिल्हानिहाय गावेजिल्हागावे नगर ६५जळगाव ३३अमरावती ४९बुलडाणा ३९सातारा १३औरंगाबाद १९पुणे ५२