शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भूजल शोषितांना ‘जलधर’ची साथ

By admin | Updated: October 26, 2016 02:52 IST

भूजलाचा अतिउपसा होणाऱ्या, तसेच उन्हाळ््यात पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावात जलव्यवस्थापन करण्यासाठी जलधर भूजल व्यवस्थापन संघाची स्थापना करण्यात येणार आहे.

- विशाल शिर्के,  पुणेभूजलाचा अतिउपसा होणाऱ्या, तसेच उन्हाळ््यात पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावात जलव्यवस्थापन करण्यासाठी जलधर भूजल व्यवस्थापन संघाची स्थापना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुण्यासह राज्यातील सात जिल्ह्यातील २७० गावांची निवड करण्यात आली असून, जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भूजल व्यवस्थापन लोकसहभागातून करण्याचा निर्णय राज्य सरकारने हाती घेतला आहे. त्या नुसार प्रत्येक गावात जलधर भूजल व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार असून, त्याची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात येणार आहे. समितीच्या माध्यमातून गावात पडणारा पाऊस, सध्याचा भूजल वापर याचा आढावा घेण्यात येणार आहे. पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात पाण्याचा वापर किती होतो याचा आढावा घेऊन भूजलाची तूट आहे की नाही हे समिती ठरवेल. तूट आढळल्यास तसा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यास पाठविण्यात येईल. त्यानुसार जलपुनर्भरणाची योजना राबविण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून संबंधित गावाचा जलधर (पाणी धरुन ठेवणारा भाग) निश्चित करण्यात येणार आहे. तसेच पाणी उपलब्धतेवरुन कोणती पिकपद्धती अधिक किफायतशीर ठरेल, पिकांना पाणी देण्याची पद्धत कोणती असावी, याबाबतही समितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी संबंधित गावात उभारलेल्या रेन गेजमधून पाऊस कसा मोजायचा, निरीक्षण विहिरींची पातळी कशी तपासायची याचे प्रशिक्षण देखील संबंधितांना दिले जाईल, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक सुनील पाटील यांनी दिली. जानेवारीपासून याची माहिती संकलित करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे गावाचा जलनकाशा तयार होणार आहे. आत्तापर्यंत २७० पैकी १०८ गावांचे सखोल भू-जल सर्वेक्षण झाले असून, त्या गावांचा नकाशा देखील तयार झाला आहे. ही सर्व माहिती नकाशासह भूजल विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. अशी असेल समितीगावाच्या नावाने जलधर भूजल व्यवस्थापन संघाची नोंद चॅरिटी कमिश्नरकडे होईल. या संघाचा अध्यक्ष पंचायत समिती सदस्य असेल. तर गट विकास अधिकारी पदसिद्ध सचिव असतील. त्यात पाणी तज्ज्ञ, गावातील प्रतिनिधी, सिंचन, कृषी, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण, सर्कल या सदस्यांचा समावेश समितीत असेल. या योजनेंतर्गत जानेवारीपासून याची माहिती संकलित करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे गावाचा जलनकाशा तयार होणार आहे. जलधर योजनेतील जिल्हानिहाय गावेजिल्हागावे नगर ६५जळगाव ३३अमरावती ४९बुलडाणा ३९सातारा १३औरंगाबाद १९पुणे ५२