शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मैदान दत्तक धोरण; हे पाप युतीचेच!

By admin | Updated: January 19, 2016 03:57 IST

मुंबईतील मोकळी मैदाने आणि भूखंड लाटता यावेत यासाठीच सत्ताधारी शिवसेना-भाजपाने मैदान दत्तक धोरण आणल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली

मुंबई : मुंबईतील मोकळी मैदाने आणि भूखंड लाटता यावेत यासाठीच सत्ताधारी शिवसेना-भाजपाने मैदान दत्तक धोरण आणल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. सभागृहात प्रस्ताव आणायचा आणि बाहेर विरोधी भूमिका घ्यायची, हा तमाशा युतीने बंद करावा, असा टोलाही निरुपम यांनी लगावला. आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम म्हणाले की, मोकळी मैदाने आणि भूखंडाबाबतच्या धोरणाचा मसुदा जेव्हा प्रथम समोर आला तेव्हाच राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र, काँग्रेस नगरसेवक राहुल गांधींच्या दौऱ्यात व्यस्त असताना सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर धोरण मंजूर करून घेतले. सभागृहात प्रस्ताव मांडणाऱ्या पक्षांनी सभागृहाबाहेर मात्र विरोधाचा तमाशा चालविला असून, मुंबईकरांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे निरुपम म्हणाले.स्थानिक नेत्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी या धोरणाला स्थगिती दिल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. अद्याप आयुक्तांकडे याबाबत कोणतेच आदेश आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांना विमानतळावर गाठून एका साध्या निवेदनाच्या कागदावर सह्या घेण्यात आल्या, अशी टीका निरुपम यांनी केली. शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षांनी केवळ एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा पोरखेळ चालविला आहे, अशी टीका निरुपम यांनी केली. मुंबईतील सर्व मैदाने आणि भूखंड महापालिकेच्याच ताब्यात राहायला हवेत, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे केवळ स्थगितीची घोषणा करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी हे धोरणच रद्द करावे, अशी मागणीही निरुपम यांनी केली. मुंबईकरांच्या हिताला बाधा आणणारे मैदान धोरण रद्द करावे यासाठी काँग्रेस सर्व पर्याय तपासणार आहे. प्रसंगी पालिकेच्या मैदान धोरणाविरोधात आंदोलन तसेच न्यायालयीन लढाही देऊ, असे निरुपम यांनी स्पष्ट केले.> मुंबई दौऱ्यात राहुल गांधींसाठी सह्याद्री अतिथीगृहात व्यवस्था करण्यात यावी, अशी लेखी मागणी काँग्रेसने केली; शिवाय ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनीही मुख्यमंत्री कार्यालय तसेच अतिथिगृहातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाने अर्जाची पोच देण्याची किमान सभ्यता दाखविली नाही, असा आरोप निरुपम यांनी केला.