वाशिम : शासकीय अनुदानाअभावी वाळलेल्या फळबागांमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम करण्याचे ठरविले असून त्यांच्या पत्रिका अधिकाऱ्यांना वाटल्या आहेत. प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना फळबाग व पीक विम्यासह अनेक योजनांच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय निसर्गही कोपल्यामुळे फळबाग वाळून गेली. त्यामुळे फळझाडे उखडून त्यांचा अंत्यविधी कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी सुशिला देवढे यांनी सांगितले. निमंत्रण पत्रिका छापून त्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मालेगाव तालुक्यातील दुबळवेल येथील सुशिला सुभाषराव देवढे, शालीकराम विश्वनाथ लादे, भवानी भाऊराव पोफळे व योगेश बाबाराव देवढे यांनी शेतामध्ये सहा वर्षांपूर्वी संत्रा, डाळिंब व आंबा यासारख्या फळपिकांची लागवड केली. दरम्यानच्या कालावधीत अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत, उसनवारी, कर्ज काढून फळबागांचे संगोपन केले. पाणीटंचाई व नैसर्गिक आपत्तीमुळे झाडांचे संगोपन करणे कठीण बनलेल्या शेतकऱ्यांनी फळबाग पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजविले मात्र शासकीय नियमातील आडकाठीमुळे दुबळवेल गावाचा समावेश असलेले मंडळ विम्यासाठी पात्र ठरले नाही. फळबाग पीक विमा लागू होण्यासाठी मंडळात किमान २० हेक्टर शेतजमिनीवर फळबाग लागवड असणे शासकीय नियमानुसार गरजेचे आहे. प्रत्यक्षात किन्हीराजा मंडळात ३९ हेक्टर एवढी फळबाग आहे, मात्र विभागाने फळबागेचे क्षेत्र कमी दाखविल्याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. २०१६ पासून फळ पीक विमा लागू होईल, असे कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्यांना कळविले आहे. (प्रतिनिधी)प्रशासकीय अधिकाऱ्यांची दिरंगाईप्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना फळबाग व पीक विम्यासह अनेक योजनांच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे.
अनुदानाअभावी वाळलेल्या फळबागेचा अंत्यविधी!
By admin | Updated: May 30, 2016 04:37 IST