शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

थोर स्वातंत्र्यसैनिक भि.दा.भिलारे गुरुजींचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:40 IST

महात्मा गांधींवर झालेला खुनी हल्ला परतवून लावणारे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार भिकू दाजी भिलारे ऊर्फ भि. दा. भिलारे गुरुजी यांचे (वय ९८) बुधवारी पहाटे

- लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी (जि. सातारा) : महात्मा गांधींवर झालेला खुनी हल्ला परतवून लावणारे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार भिकू दाजी भिलारे ऊर्फ भि. दा. भिलारे गुरुजी यांचे (वय ९८) बुधवारी पहाटे तीन वाजता मुुंबई येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. भिलार (ता. महाबळेश्वर) या त्यांच्या मूळ गावी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, पाच मुली, सुना ,पुतणे, नातवडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.२६ नोव्हेंबर १९१९ रोजी भिलार येथील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भि. दा. भिलारे गुरुजी यांनी दुर्गम महाबळेश्वर परिसरात सामाजिक जीवनाचा श्रीगणेशा केला. सातवीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी विद्यादानाच्या कार्यात झोकून दिले. महात्मा गांधींच्या विचारातून प्रेरणा घेऊन ते स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण, आबासाहेब वीर यांचे ते विश्वासू सहकारी होते. महाबळेश्वर, वाई व जावळी तालुक्यांतील ९३ गावांचा ग्रामोन्नती संघ स्थापन करून अनिष्ठ रुढी, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य त्यांनी केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. गुरुजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्याकरिता महात्मा गांधी हे महाबळेश्वर येथे आले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते सक्रिय सभासद होते. जिल्हाध्यक्षपदाची धुराही त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. १९६२ ते १९७२ या कालावधीत ते जावळी मतदारसंघाचे आमदार होते. १९७८ ते १९८० दरम्यान विधानपरिषदेचे सदस्य होते. सातारा जिल्ह्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महात्मा गांधींच्या हत्येचा कट उधळला१९४४ मध्ये महात्मा गांधी पाचगणीत आले होते. त्यावेळी प्रार्थनेच्या वेळी नथुराम गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महात्मा गांधीजींवर केलेला खुनी हल्ला परतवण्यात भिलारे गुरुजी आघाडीवर होते. हल्ल््यासाठी पुढे आलेल्या व्यक्तीच्या हातातील सुरा गुरुजींनी हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला होता.