शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतक-यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ, 89 लाख शेतक-यांना फायदा

By admin | Updated: June 24, 2017 16:54 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची घोषणा केली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची घोषणा केली. शेतक-यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले असून, त्यामुळे 90 टक्के शेतक-यांचा सातबारा कोरा होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे 
- शेतक-यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी 
- दीडलाखापर्यंतच कर्ज सरसकट माफ
- 90 टक्के शेतक-यांचा सातबारा कोरा होणार आहे 
- 40 लाख शेतक-यांचा सातबारा कोरा होणार.
- नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25 हजारांपर्यंत अनुदान मिळणार.
- राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचा-यांना कर्जमाफीमधून वगळल. 
- 30 जून 2016 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ  मिळेल.
- लोकप्रतिनिधी, आमदारांना कर्जमाफीच्या निर्णयातून वगळल. 
- हा अभूतपूर्व निर्णय असून, यापेक्षा कर्जमाफीचा बोजा उचण्याची क्षमता नाही. 
 
2012 पासून पडणा-या दुष्काळामुळे शेतकरी कर्जात बुडाला होता. शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी सुरु होती. आम्ही सभागृहात कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. कर्जमाफी संदर्भात आमची विविध घटकांशी चर्चा सुरु होती. कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक असल्याचे आम्ही आंदोलकांना सांगितले होते असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
 
कर्जमाफीसाठी मंत्रिगटाची उच्च समिती तयार करुन शेतक-यांच्या सुकाणू समितीशीही चर्चा केली. सुकाणू समितीबरोबर काही मुद्यांवर एकमत झाले काही मुद्यांवर एकमत होऊ शकले नाही. मी स्वत: शेतकरी नेते राजू शेट्टींबरोबर चर्चा केली. शरद पवारांबरोबर बोललो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवली. त्याचवेळी कर्जमाफीच्या निर्णयाची आज घोषणा होणार अशी चर्चा सुरु झाली होती. आज सकाळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत शेतकरी कर्जमाफीची मर्यादा 1 लाखावरून 2 लाख करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. महसूलमंत्री चंद्राकांत पाटील शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्यातील इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. काल रात्री त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. 
 
मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीत कर्जमाफीची नोट काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीसाठी निकष ठरवण्यासंदर्भात  गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत बैठक झाली. जवळपास तासभर झालेल्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी संदर्भातील निकषांवर चर्चा झाली.