शहरं
Join us  
Trending Stories
1
फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
2
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
3
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
4
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
6
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्रा कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
7
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
8
दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
9
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
10
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
11
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
12
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
13
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
14
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
15
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
16
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
17
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
18
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
19
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
20
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील

टंचाईकाळात ग्रामसेवकाने गावात थांबावे

By admin | Updated: February 16, 2016 01:36 IST

विंधन विहिरींचा सर्व्हे करताना सर्वांना बरोबर घ्या... टंचाईकाळात ग्रामसेवक गावातच थांबवा... टे डू टे रिपोर्ट करा... जिल्हा परिषदेत टंचाई कक्ष तत्काळ सुरू करा...

पुणे : विंधन विहिरींचा सर्व्हे करताना सर्वांना बरोबर घ्या... टंचाईकाळात ग्रामसेवक गावातच थांबवा... टे डू टे रिपोर्ट करा... जिल्हा परिषदेत टंचाई कक्ष तत्काळ सुरू करा... आणि मतदभेद बाजूला ठेवून ग्रामस्थांनी एकत्रितपणे टंचाईचा सामना करावा... आदी महत्त्वपूर्ण सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सोमवारी केल्या. सध्या जिल्ह्यात ५० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी अद्याप एकही टँकर नव्हता, धरणं कोरडी पडली आहेत, पाणलोट क्षेत्रात पाण्यासाठी पायपीट सुरू असून, पाणी द्या पाणी म्हणत ग्रामस्थ रस्त्यावर उतरू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदने विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. यात काही महत्त्वपूर्ण ठरावही करण्यात आले.टंचाई परिस्थिती लक्षात घेता या वर्षी जिल्हा परिषदेने पहिल्यांदाच जानेवारीत ४० कोटी ९१ लाखांचा टंचाईकृती आराखडा तयार केला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. याचे सभेच्या सुरुवातीलाच सर्वांनी अभिनंदन केले. या टंचाई आराखड्यातून सध्या विंधन विहिरींचा सर्व्हे सुरू आहे. मात्र, हा सर्व्हे करताना अधिकारी, स्थानिक सभापती, पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता चुकीची माहिती देत आहेत. याबाबत सुरुवातीला सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत विंधन विहिरींच्या खोलीची मर्यादा वाढविण्याची मागणी केली. यावर जिल्हा परिषद अध्यक्षांनी विंधनविहिरींचा सर्व्हे करताना अधिकाऱ्यांनी तेथील पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी व पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांना बरोबर घेतल्याशिवाय सर्व्हे करू नये, अशा सूचना दिल्या. जिल्ह्यात सध्या ५० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, हा आकडा चुकीचा आहे. कारण मंजुरीसाठी निकष लावल्याने अनेक प्रस्ताव नामंजूर केले जात आहेत. त्यामुळे अटी शिथिल करून टँकरला मंजुरी द्या, अशी मागणी सदस्यांनी केली. या वेळी पाटबंधारे विभागाने धरणातील पाणीसाठ्याबाबत जाहीर केलेल्या आकडेवारीबाबत सदस्यांनी विरोध करीत चुकीचे आकडे सांगताहेत, असा आरोप केला. वास्तव परिस्थिती भयानक असून, पाणलोट क्षेत्रासाठी किती पाणी राखीव आहे, याची आकडेवारी व पुढील नियोजन जाहीर करावे, तरच पाण्यासाठीचे संघर्ष थांबतील, अशी मागणी माऊली खंडागळे यांनी केली. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांनी सर्वच सदस्यांना ज्या मागण्या आपल्या अखत्यारीत नाहीत त्या या परिस्थितीत करीत बसण्यापेक्षा टंचाईग्रस्त गावांतील पाणीटंचाई कायमस्वरूपी कशी दूर करता येईल, याचे नियोजन करावे, यासाठी जिल्हा परिषद मदत करेल, असे अश्वासन देत अधिकाऱ्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. (प्रतिनिधी)1महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे विभागामार्फत पुणे जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याकरिता नळ-पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. त्यांचे शासनाचे अधिसूचनेनुसार दिनांक १ जुलै २०१५ पासून या योजनेंच्या लाभार्थ्यांना सुधारित दर आकारणी सुरू केलेली आहे. सदरची दर आकारणी ही ग्रामीण भागामधील जनतेला परवडणारे नाहीत. त्यामुळे ते जुन्याच दराने आकारणी करा, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी केली. या विषयावर चर्चा होऊन तसा ठराव करण्यात येऊन मान्यतेकरिता शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शिवसेनेचे सदस्य कुलदीप कोंडे यांनी माणसांबरोबर जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न बिकट होत आहे. त्यामुळे त्यांचाही विचार व्हावा, अशी मागणी केली. यावर अध्यक्ष कंद यांनी पशुधन जगवणेही महत्त्वाचे आहे. माणसी २० लिटर पाणी आवश्यक आहे, तसे जनावरांसाठी ४0 लिटर पाणी गरजेचे आहे, अशी मागणी यापूर्वी आपण शासनाकडे केली असून, आजही तसा ठराव करून शासनाकडे पाठवू, असे सांगितले.