शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
2
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
3
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
4
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
6
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
7
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
8
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
9
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
10
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
11
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
12
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
13
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
14
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
15
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
16
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
17
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
18
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
19
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
20
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे ग्राम मिशन रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 04:59 IST

उद्योगपती रतन टाटा, महानायक अमिताभ बच्चन आणि काही नामवंत उद्योगपतींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेऊन जाहीर केलेल्या ग्राम संपूर्ण परिवर्तन मिशनची चार महिने

यदु जोशी, मुंबईउद्योगपती रतन टाटा, महानायक अमिताभ बच्चन आणि काही नामवंत उद्योगपतींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेऊन जाहीर केलेल्या ग्राम संपूर्ण परिवर्तन मिशनची चार महिने उलटले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही. एक हजार गावांच्या विकासाची योजना वाऱ्यावर सोडल्यात जमा आहे.कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून एक हजार गावांचा आमूलाग्र विकास करण्यासाठीचे हे मिशन, २५ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी पत्रपरिषदेत जाहीर केली होते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मिशन कौन्सिलची स्थापना करण्यात येणार होती, ती अद्याप झालेली नाही. सरकार आणि खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली कंपनी स्थापन करण्यात येणार होती, तीदेखील झालेली नाही. मिशनची अंमलबजावणी ग्रामविकास विभागामार्फत केली जाणार आहे. या मिशनच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मिशन कौन्सिलची स्थापना करण्यात येणार होती. त्याचाही मसुदा ग्रामविकास विभागाकडे महिनाभरापासून पडलेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या योजनेमध्ये आधी एक हजार खेडी घेण्यात येणार होती. मात्र, विविध कंपन्यांकडून तब्बल १५०० गावांच्या विकासाचे प्रस्ताव आले. २५ आॅगस्टच्या पहिल्या बैठकीत बडे उद्योगपतीच आलेले होते. त्यानंतर अनेक कंपन्या, बँकांनी मिशनमध्ये सहभागाची तयारी दर्शविल्याने, एक हजार गावांची यादी दीड हजारावर गेली. मात्र, ग्रामविकास विभागातील विशिष्ट अधिकारी पहिल्या टप्प्यात एक हजारच खेडी घेणार यावर अडून बसले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अतिरिक्त पाचशे गावांचा विकास पहिल्या टप्प्यात होण्याबाबत साशंकता आहे, तसेच जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा मिशनला फटका बसू शकतो. ग्रामविकासाचे हे मिशन आधी १०० गावांमध्ये २ आॅक्टोबरपासून सुरू होईल असेही जाहीर केले होते. तथापि, तेदेखील झालेले नाही. ग्रामविकास विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने, मुख्यमंत्र्यांच्या मिशनला पंकजा मुंडे यांचे खाते कोलदांडा घालत असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. यासाठी पन्नास टक्के निधी हा राज्य शासन देईल, असेही जाहीर करण्यात आले होते. मात्र, तशी तरतूद करण्यात नाही. मिशनच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी प्रत्येक गावात एक तरुण/तरुणीला मानधनावर नेमण्यासाठी अर्ज मागविले आहेत. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मुलाखती घेऊन निवड होणार आहे.